शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

सोने खरेदीतून गुंतवणूक वाढू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बऱ्यापैकी उलाढाल सुरू आहे.लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय अडचणीत आले आहेत. अनेकांना आर्थिकबाबीला सामोरे जावे लागत आहे. यातून सराफा व्यावसाय देखील सुटला नाही. तब्बल दोन महिने बंद राहिलेला हा व्यवसाय लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून सुरू झाला आहे. हळूहळू या व्यवसायाची गाडी रुळावर आली आहे. खरेदीसाठी देखील गर्दी होऊ लागली आहे. भाव लॉकडाऊनच्या आधीपेक्षा आता १० ते २० टक्के वाढला आहे. त्याचाही काही परिणाम व्यवसायावर दिसून येत नसल्याची स्थिती आहे.गुंतवणुकीकडे कललग्न समारंभांवर आलेली मर्यादा, त्यातून वाचलेला खर्च आता सोने खरेदीतून गुंतवला जात आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात असलेल्या लग्न समारंभातील कुटूंब सोने खरेदीसाठी गर्दी करीत आहे. याशिवाय इतरही जण सोने खरेदीकडे कल दाखवत असल्यामुळे सराफा बाजारात बºयापैकी उलाढाल सुरू आहे.येत्या दीड ते दोन महिन्यात उलाढाल कायम राहणार असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणने आहे. लॉकडाऊननंतर सराफा बाजारात गर्दी आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बाजार सुरू राहत आहे. सध्या सोने खरेदीतून त्यात गुंतवणूक करण्याचा कल वाढल्याचे नंदुरबार जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष मनोज दिनानाथ श्रॉफ यांनी सांगितले.कारागिरांना मदतलॉकडाऊनमुळे दोन महिने सराफा बाजार बंदच होता. व्यवहार ठप्प होते, त्यामुळे अनेक लहान व्यावसायिकांची आणि कारागिरांची उपासमार झाली. यासाठी मात्र सराफा असोसिएशन धावून गेले. त्यांना दोन महिने मदत देत त्यांना सावरले गेले. नंदुरबार जिल्ह्यात दागीने घडविणारे बंगाली कारागिर मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतू हे कारागिर परत आपल्या गावी गेले नाही. येथेच राहिले. असोसिएशनने त्यांना आधार दिला. त्यामुळे दागीने घडविण्यासाठी सद्य स्थितीत कुठलीही अडचण नसल्याचे असोसिएशनचे म्हणने आहे.चांदी उलाढालीवर परिणामजिल्ह्यातील आदिवासी चांदीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. होळीच्या काळात तसेच परराज्यातून मजुरी करून परत आल्यावर चांदी खरेदीकडे या कुटूंबांचा कल असतो. यंदा मात्र लॉकडाऊनमुळे या खरेदीवर पाणी फिरले गेले. सलग दोन महिने व्यवसाय बंद असल्यामुळे चांदी विक्रीत मोठी तूट झाली. आता खरीप हंगामानंतरच चांदी खरेदीकडे कल राहील असा अंदाज आहे.सोन्याच्या भावात लॉकडाऊनंतर १५ ते २० टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या भावात वाढ झाली असली तरी खरेदीमध्ये मात्र कुठलाही परिणाम झालेला नाही. जुलै अखेरपर्यंत सराफा बाजारात तेजी कायम राहणार आहे.लॉकडाऊनंतर सराफा व्यवसाय आता रुळावर आला आहे. सोन्यातील गुंतवणूक आता वाढीस लागली आहे. लग्न समारंभांवर आलेली खर्च मर्यादामुळे तो पैसा सोन्यात गुंतवणूक करण्याकडे आता लोकांचा कल वाढला असल्याचे चित्र आहे.-मनोज श्रॉफ, अध्यक्ष, जिल्हा सराफ असोसिएशन, नंदुरबार.