शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

नंदुरबार जिल्ह्यात दोन फळपिकांना विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला गारपीट किंवा वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सर्वत्र उपाय योजण्यात येत असले तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशा विमा संरक्षणाबाबत मात्र उदासिनता आह़े जिल्ह्यातील दोनच फळपिकांना विम्याचे सरंक्षण असल्याने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास, पुढे काय, असा प्रश्न शेतक:यांना सतावत आह़े  शासनाकडून प्रधानमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला गारपीट किंवा वादळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सर्वत्र उपाय योजण्यात येत असले तरी सर्वाधिक महत्त्वपूर्ण अशा विमा संरक्षणाबाबत मात्र उदासिनता आह़े जिल्ह्यातील दोनच फळपिकांना विम्याचे सरंक्षण असल्याने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास, पुढे काय, असा प्रश्न शेतक:यांना सतावत आह़े  शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामानावर आधारित विमा योजना राबवण्यात येत़े यात द्राक्ष, संत्रा, डाळींब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू या फळपीकांचा समावेश आह़े नैसर्गिक आपत्तीत नुकसानीनंतर सर्वात मोठा आधार असलेल्या विमा सरंक्षणासाठी मात्र नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि आंबा ही दोनच फळपिके पात्र आहेत़  दोघांचे हेक्टरी क्षेत्र हे मंडळनिहाय 20 हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक असल्याने त्यांना विमा सरंक्षण मिळू शकले आह़े  इतर फळबागांचे मंडळनिहाय क्षेत्र हे कमी असल्याने त्यांचा समावेश विमा संरक्षणात झालेला नाही़ परिणामी नैसर्गिक आपत्तीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणार कशी याबाबत कोणतीही तरतूद शासनाकडे नाही़ यामुळे जिल्ह्यात फळपिकांच्या लागवडीबाबत उदासिनता वाढून त्यांची लागवड घटण्याची भिती आह़े विशेष म्हणजे राज्यात दुस:या क्रमांकाचे पपई उत्पादन नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात येत़े मात्र राज्यासह जिल्ह्यातील पपई उत्पादन फलोत्पादन विमा संरक्षण कक्षेत नसल्याने शेतक:यांची घोर निराशा झाली आह़े हीच गत टरबूज उत्पादनाची आह़े ही दोन्ही उत्पादने प्रत्येक मंडळात किमान 30 हेक्टर्पयत घेतली जात आहेत़ जिल्ह्यात यंदा साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर केळीबागा आहेत़ या पिकाना नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी 11 हजार रूपये प्रतिहेक्टर विमा संरक्षण देण्यात आले आह़े निसर्ग कोपल्यानंतर जमिनदोस्त होणा:या केळी बागायतदारांना तात्काळ भरपाई देण्याचे नियोजन याद्वारे आह़े शेतकरी पिक कर्ज घेत असतानाच त्यांच्याकडून विम्याची रक्कम वसुल करण्याचा पायंडा शासनाने घालून दिला आह़े यामुळे मोठे क्षेत्र असलेल्या शेतक:यांनी तात्काळ विमा करून घेत असल्याचे निदर्शनास आह़े जिल्ह्यात दोन हजार हेक्टरवर आंबा बागा आहेत़ यातील 600 हेक्टर आंबा बागा ह्या नवापूर तर उर्वरित 1400 हेक्टर आंबा बागा ह्या तळोदा धडगाव आणि अक्कलकुवा यात तीन तालुक्यात आहेत़ तळोदा आणि नवापूर तालुका वगळता इतर तीन तालुक्यात विमा सरंक्षणच झालेले नसल्याची माहिती आह़े विशेष म्हणजे गतवर्षी 145 बागायतदार शेतक:यांनी विमा योजनेत सहभाग दिला होता़ यंदाही सरासरीने 150 बागायतदारांनी विमा संरक्षण घेतले आह़े हेक्टरी सहा हजार रूपये रक्कम शेतक:यांच्या बँक खात्यातून कपात झाली आह़े