शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आठवी ते १२ वी पर्यंत शासकीय आश्रमशाळा सुरू करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

तळोदा : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता शासनाने शासकीय, अनुदानित आश्रमशाळा बरोबरच एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल या निवासी शाळा पुढील महिन्याच्या ...

तळोदा : कोरोनाची लाट ओसरल्यानंतर आता शासनाने शासकीय, अनुदानित आश्रमशाळा बरोबरच एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल या निवासी शाळा पुढील महिन्याच्या २ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि यासाठी शासनाने अतिशय कडक निर्देश दिले असून, त्याची अंमलबजावणी करताना या शाळांपुढे एक दिव्यच आहे.

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. शिवाय कोरोनाची दुसरी लाट देखील कमी झाल्याने आदिवासी विकास प्रकल्पामार्फत चालविण्यात येणाऱ्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळा बरोबरच एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल चालविण्याचा निर्णय घेतला असून, या शाळा पुढील महिन्याचा २ तारखेपासून इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. तथापि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित गावांना तसा ठराव करण्याचा सूचना दिल्या आहेत. या शिवाय शाळेच्या इमारतीचे निर्जंतुकीकरण, मुला-मुलींच्या निवासाची स्वच्छता करावी. त्याच बरोबर दररोज विद्यार्थ्यांचे तापमान, ऑक्सिजन घेण्याची ताकीद देऊन यावर हायगय केल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तथापि शाळा सुरू करण्याचा निर्णय संबंधित प्रकल्प अधिकारी यांच्यावर राहील.

प्रकल्प स्तरीय समिती

शाळा सुरू करण्यासाठी त्यावर देखरेख करण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प स्तरीय समिती गठित करण्यात आली असून, ही समिती शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेईल. समितीत खुद प्रकल्प अधिकारी अध्यक्ष तर सहायक प्रकल्प अधिकारी शिक्षण हे सचिव राहतील. सदस्य म्हणून सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, दोन मुख्याध्यापक, कोविड मुक्त गावाचे दोन सरपंच, दोन ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समितीचे दोन सदस्य असे १४ जणांची ही समिती असेल. या समितीने शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य स्वच्छता व कोविड संदर्भात सुरक्षा विषयक उपाययोजनांचा आढावा घेतील.

शिक्षकांना लसीकरण सक्तीचे

आश्रमशाळा सुरू करण्यापूर्वी आश्रमशाळा मधील सर्व शिक्षकांना लसीकरण करणे सक्तीचे आहे. म्हणून सर्वांनी लसीकरण करून घ्यावे. ज्यांचा एक डोस पूर्ण झाला आहे त्यांनाच अध्यापनाचे कार्य द्यावे. ज्या कर्मचाऱ्यांनी शाळा सुरू झाल्याच्या १५ दिवसानंतर ही लसीकरणाचा किमान एक डोस घेतला नसेल अशा कर्मचाऱ्यांना विना वेतन रजेवर पाठवण्यात यावे, अशी सक्त ताकीद ही देण्यात आली आहे. त्यांना लसीकरण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच शाळेत रूजू करून घेण्याची सूचना दिली आहे. याशिवाय अभ्यासक्रम संदर्भात शालेय शिक्षण विभागाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. अन्यथा मुख्याध्यापकांवर ही कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुख्याध्यापकांनी लागणारा खर्च व्यवस्थापन समितीमधून उपलब्ध करावा

शाळा सुरू केल्यानंतर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या निधी मधून उपलब्ध करावा. मात्र, रोजच काेरोनाचे नियम पाळावे. शिवाय शाळेत झाडू ब्रश, फिनाईल या साहित्य बरोबर थर्मल स्कॅनिंग प्लस ऑक्सिमीटर, थर्मामिटर, साबण, हॅण्ड वॉश व सॅनिटायझर या वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात. दरम्यान शाळेत परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा इत्यादी तत्सम कार्यक्रम घेऊ नये यावर कडक निर्बंध असतील.