शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

महागाईने तेल ओतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

देशात व राज्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान सुरू झाले. या कालावधीत भाजीपाला, खाद्यतेल, कडधान्य व मसाले ...

देशात व राज्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान सुरू झाले. या कालावधीत भाजीपाला, खाद्यतेल, कडधान्य व मसाले यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली तर पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे दळण वाहनासह वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडाला. यात सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीय नागरिक होरपळून निघत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावात दीडपट वाढ झाली आहे तर त्या तुलनेत कोरोना विषाणू संक्रमणामुळे आजारपणाच्या खर्चासह बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात आर्थिक परिस्थिती बिघडली व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवर महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने आता जगावे तरी कसे या विवंचनेत नागरिक आहेत.

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च

खाद्यतेल - २८०

धान्य - २५०

शेंगदाणे - १२०

साखर - ४५

साबुदाणा ०

चहापूड - २००

डाळ - ५०

गॅस सिलेंडर - ८५०

पेट्रोल - ३६००

एकूण ५३७५

■ डाळी शिवाय वरण

दररोजच्या जेवणात वरण भाताचा व ग्रामीण भागात सायंकाळच्या जेवणात खिचडीचा समावेश असतो. एरवी ५० ते ६० रुपये प्रति किलो असलेली तुरदाळ मार्च २०२० नंतर आज अखेर १०० रुपये प्रति किलो झाली आहे. वरण व खिचडी बनविताना प्रामुख्याने तूर डाळीचा वापर केला जातो. पाच सदस्यांच्या एका कुटुंबाला साधारणतः महिन्यात दहा किलो तूर डाळ लागते. तूरडाळीचे भाव दुप्पट झाल्याने डाळी शिवाय वरण अथवा खिचडी करावी का अशी विवंचना गृहिणींना सतावत असते.

अशी वाढली महागाई जानेवारीतील दर प्रति किलो

शेंगदाणा तेल १२०

सोयाबीन तेल १००

शेंगदाणे ९०

साखर ३१

साबुदाणा ७०

मसाले १०००

चहापूड ४००

तूर डाळ १००

उडीद डाळ १२०

मूग डाळ ९०

हरभरा डाळ ६५

■ सध्याचे दर

शेंगदाणा तेल १६०

सोयाबीन तेल १४०

शेंगदाणे १२०

साखर ४०

साबुदाणा ७०

मसाले १०००

चहापूड ५००

तूर डाळ १००

उडीद डाळ १००

मूग डाळ ९०

हरभरा डाळ ६५

गॅस सिलेंडर हजाराच्या घरात

गेल्या काही वर्षापासून गॅस सिलिंडरचे दरमहा भाव वाढवत आहे. साधारण दुप्पट किंमत घरगुती वापराच्या गॅसची झाली आहे. सर्वसाधारण कुटुंबाला एका वर्षात १४ ते १६ गॅस सिलिंडर लागतात. गॅस सिलेंडरची वाटचाल हजार रुपयांकडे सुरू असल्याने सर्वसाधारण कुटुंबीयांचे वार्षिक बजेट सहा ते सात हजार रुपयांनी वाढले आहे. ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असून, गॅसची दरवाढ झाल्याने अनेकांनी चुलीवर स्वयंपाकाला प्राधान्य दिले आहे. मात्र, चूल पेटवण्यासाठी रॉकेल हा महत्त्वाचा घटक असून, केंद्र शासनाने रॉकेलच्या विक्रीवर बंदी घातली असल्याने आता चूल पेटवावी कशी अशी विवंचना ग्रामीण भागातील महिलांना सतावत असते.