शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने तेल ओतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

देशात व राज्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान सुरू झाले. या कालावधीत भाजीपाला, खाद्यतेल, कडधान्य व मसाले ...

देशात व राज्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संक्रमणाचे थैमान सुरू झाले. या कालावधीत भाजीपाला, खाद्यतेल, कडधान्य व मसाले यांच्या किमतीत कमालीची वाढ झाली तर पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे दळण वाहनासह वाहतूक खर्च वाढल्याने महागाईचा भडका उडाला. यात सर्वसामान्य जनता व मध्यमवर्गीय नागरिक होरपळून निघत आहेत. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या भावात दीडपट वाढ झाली आहे तर त्या तुलनेत कोरोना विषाणू संक्रमणामुळे आजारपणाच्या खर्चासह बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढल्याने बाजारात आर्थिक परिस्थिती बिघडली व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय पातळीवर महागाईला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने आता जगावे तरी कसे या विवंचनेत नागरिक आहेत.

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला खर्च

खाद्यतेल - २८०

धान्य - २५०

शेंगदाणे - १२०

साखर - ४५

साबुदाणा ०

चहापूड - २००

डाळ - ५०

गॅस सिलेंडर - ८५०

पेट्रोल - ३६००

एकूण ५३७५

■ डाळी शिवाय वरण

दररोजच्या जेवणात वरण भाताचा व ग्रामीण भागात सायंकाळच्या जेवणात खिचडीचा समावेश असतो. एरवी ५० ते ६० रुपये प्रति किलो असलेली तुरदाळ मार्च २०२० नंतर आज अखेर १०० रुपये प्रति किलो झाली आहे. वरण व खिचडी बनविताना प्रामुख्याने तूर डाळीचा वापर केला जातो. पाच सदस्यांच्या एका कुटुंबाला साधारणतः महिन्यात दहा किलो तूर डाळ लागते. तूरडाळीचे भाव दुप्पट झाल्याने डाळी शिवाय वरण अथवा खिचडी करावी का अशी विवंचना गृहिणींना सतावत असते.

अशी वाढली महागाई जानेवारीतील दर प्रति किलो

शेंगदाणा तेल १२०

सोयाबीन तेल १००

शेंगदाणे ९०

साखर ३१

साबुदाणा ७०

मसाले १०००

चहापूड ४००

तूर डाळ १००

उडीद डाळ १२०

मूग डाळ ९०

हरभरा डाळ ६५

■ सध्याचे दर

शेंगदाणा तेल १६०

सोयाबीन तेल १४०

शेंगदाणे १२०

साखर ४०

साबुदाणा ७०

मसाले १०००

चहापूड ५००

तूर डाळ १००

उडीद डाळ १००

मूग डाळ ९०

हरभरा डाळ ६५

गॅस सिलेंडर हजाराच्या घरात

गेल्या काही वर्षापासून गॅस सिलिंडरचे दरमहा भाव वाढवत आहे. साधारण दुप्पट किंमत घरगुती वापराच्या गॅसची झाली आहे. सर्वसाधारण कुटुंबाला एका वर्षात १४ ते १६ गॅस सिलिंडर लागतात. गॅस सिलेंडरची वाटचाल हजार रुपयांकडे सुरू असल्याने सर्वसाधारण कुटुंबीयांचे वार्षिक बजेट सहा ते सात हजार रुपयांनी वाढले आहे. ग्रामीण भागात भयावह परिस्थिती असून, गॅसची दरवाढ झाल्याने अनेकांनी चुलीवर स्वयंपाकाला प्राधान्य दिले आहे. मात्र, चूल पेटवण्यासाठी रॉकेल हा महत्त्वाचा घटक असून, केंद्र शासनाने रॉकेलच्या विक्रीवर बंदी घातली असल्याने आता चूल पेटवावी कशी अशी विवंचना ग्रामीण भागातील महिलांना सतावत असते.