शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

नवसंजीवनी योजनेसाठी कृती आराखडे पाठविण्याबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:31 IST

सातपुड्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगार, चांगला पोषण आहार, आरोग्य सेवा, दळणवळण सुविधा, शुध्द पिण्याचे पाणी, धान्य ...

सातपुड्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील आदिवासी जनतेला रोजगार, चांगला पोषण आहार, आरोग्य सेवा, दळणवळण सुविधा, शुध्द पिण्याचे पाणी, धान्य पुरवठा, खावटी कर्ज आदी शासकीय योजनांच्या माध्यमातून त्यांचा विकास करण्यासाठी शासनाने सन १९९५ मध्ये नवसंजीवनी योजना सुरू केली आहे. या योजनेत अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्यातील आदिवासी गावे योजनेत घेण्यात आली आहेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दरवर्षी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सबंधित यंत्रणांकडून कामांचा कृती आराखडा मगविला जात असतो. त्यानंतर तो आराखडा शासनाला सादर केला जातो. तथापि, याबाबत यंत्रणांकडून सातत्याने उदासीन भूमिका घेतली जात असते. कारण गेल्यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उशिरा कृती आराखडा सादर करण्याचे पत्र यंत्रणांना दिले होते. त्या उपरातही काही यंत्रणांनी प्रकल्पाच्या पत्राला केराची टोपली दाखवत आपल्या विभागाचा अहवाल पाठवला नव्हता. मिळालेल्या माहितीनुसार, येथील प्रकल्प प्रशासनाने नंदुरबार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी (नंदुरबार), कार्यकारी अभियंता जि.प. नंदुरबार, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा (जि.प. नंदुरबार), शिक्षणाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सक (नंदुरबार), उपजिल्हाधिकारी रोहयो (नंदुरबार), जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, ग्रामपंचायत विभाग जि.प. नंदुरबार, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. नंदुरबार, मनरेगा जि.प. नंदुरबार, आदिवासी विकास महामंडळ नंदुरबार अशा १३ यंत्रणांना पत्र पाठवून आपला कृती आराखडा ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन केले होते. परंतु यातील काही यंत्रणांनीच प्रकल्पाकडे कृती आराखडा सादर केला होता. यावरून विभाग प्रमुखांची आदिवासींच्या विकास योजनांची संवेदनशीलता दिसून येते. वास्तविक आदिवासी विकास प्रकल्पाकडे यंत्रणांकडून आलेल्या आरखड्यानंतरच तो शासनास सादर केला जात असतो. मात्र आराखडाच आला नसल्यामुळे प्रशासनालाही सादर करता आला नाही. एकीकडे शासन आदिवासींच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना आणत असते. तर दुसरीकडे यंत्रणाच त्याला हरताळ फासण्याचे काम करीत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे कृती आराखडा न पाठवणाऱ्या यंत्रणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आदिवासी जनतेने केली आहे.

शासनाच्या नवसंजीवनी योजनेत घेण्यात आलेल्या तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील गावांच्या कामांचा कृती आराखडा सादर करण्याची कार्यवाही सुरू असून आराखडेदेखील झाले आहेत. उर्वरितदेखील लवकरच जमा केले जाणार आहेत.

-निर्मल तोरवणे, सहायक प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा

नंदुरबारसारख्या जिल्ह्यात ज्यात बालमृत्यू व मातामृत्यू यांचे प्रमाण जास्त आहे. अशा जिल्ह्यात २०२०-२१ चा आराखडा इतक्या उशिरा तयार होणं हे अतिशय गंभीर आहे. नवसंजीवनी व गाभा समितीत नियोजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे. कृती आराखडाच न बनणे म्हणजे नियोजनाचा अभाव व पर्यायी अंमलबजावणीचाही अभाव आहे. पुढच्या म्हणजेच २०२१-२२ यावर्षी तरी वेळेत नियोजन होऊन अंमलबजावणी होईल ही अपेक्षा.

-लतिका राजपूत, नर्मदा बचाओ आंदोलन, धडगाव व अशासकीय सदस्य जिल्हा व राज्य गाभा समिती