शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:18 IST

जनजागृती गरजेची : पाच वर्षात दीड हजार जणांना सर्पदंश, पावसाळ्यात समस्या

नंदुरबार : गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षागणिक हा आकडा वाढत जात असल्याचे चित्र समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े यात, सर्पदंशाच्या घटना विशेषत ग्रामीण भागात, शेतशिवारात अधिक घडत असल्याचे निरीक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आह़े 2013 पासूनच्या सर्पदंशाच्या घटनांची आकडेवारी बघता, वर्षनिहाय यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े वर्षनिहाय सर्पदंशाच्या घटना पुढील प्रमाण - 2013-2014  189, 2014-2015 288, 2015-2016  306, 2016-2017 317, 2017-2018 335 तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यात 25 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत़ अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झालेला आह़े सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये साप, इंगळी, विंचू आदी प्राणी जमिनीबाहेर पडत असतात़ त्यातच पावसाळ्यात शेक:यांची खरिप हंगामाची पेरणी, मशागत आदी शेती कामे जोमात असतात़ त्यामुळे शेतशिवारात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडताना दिसून येत असतात़ परंतु या घटनांची संख्या वर्षागणिक वाढतच असल्याने ही बाब चिंतेची ठरत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण होतात दाखलजिल्ह्यातील अक्कलकुवा तसेच धडगाव आदी तालुक्यांमधील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आल़े आधीच जंगली परिसर असल्याने या ठिकाणी सर्पाचा मोठय़ा संख्येने सुळसुळाट असतो़ त्यातच                या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची घरेसुध्दा उंचावर नसून जमिनीलगतच लाकडी बांबू, कौले आदींपासून बनवलेली असल्याने याठिकाणी घरात प्रवेश करणे सरपटणा:या जनावरांसाठी सहज सोपे असत़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे तसेच वीजेचा अभाव असल्याने अंधारात सर्पदंश होण्याच्या घटना अधिकच वाढताना दिसून येत           आह़े जनावरांनाही होताय सर्पदंशमनुष्यासह गोठय़ात बांधलेल्या गाय, बैल, बकरी आदी पाळीव जनावरांनाही सर्पदंश होऊन जनावरे दगावण्याच्या घटना दुर्गम भागात घडत असतात़ पशु दगावल्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत असत़े जनजागृतीची आवश्यकतादुर्गम भागात सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती किंवा माहिती नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक उपचार पध्दतीने उपचार घेण्यास प्राधान्य देत असतात़परंतु यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असत़े त्यामुळे आरोग्य विभागाकडून याची दखल घेत सर्पदंश झाल्यावर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती करणे गरजेचे आह़ेरुग्णवाहिकांअभावी अडचणीपावसाळी दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात़ सर्पदंशाचे रुग्ण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतात़ परंतु अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना नेण्याची वेळ येत असत़े परंतु काही वेळा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात़ लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यताही नकारता येत नाही़त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आह़े