शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:18 IST

जनजागृती गरजेची : पाच वर्षात दीड हजार जणांना सर्पदंश, पावसाळ्यात समस्या

नंदुरबार : गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षागणिक हा आकडा वाढत जात असल्याचे चित्र समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े यात, सर्पदंशाच्या घटना विशेषत ग्रामीण भागात, शेतशिवारात अधिक घडत असल्याचे निरीक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आह़े 2013 पासूनच्या सर्पदंशाच्या घटनांची आकडेवारी बघता, वर्षनिहाय यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े वर्षनिहाय सर्पदंशाच्या घटना पुढील प्रमाण - 2013-2014  189, 2014-2015 288, 2015-2016  306, 2016-2017 317, 2017-2018 335 तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यात 25 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत़ अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झालेला आह़े सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये साप, इंगळी, विंचू आदी प्राणी जमिनीबाहेर पडत असतात़ त्यातच पावसाळ्यात शेक:यांची खरिप हंगामाची पेरणी, मशागत आदी शेती कामे जोमात असतात़ त्यामुळे शेतशिवारात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडताना दिसून येत असतात़ परंतु या घटनांची संख्या वर्षागणिक वाढतच असल्याने ही बाब चिंतेची ठरत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण होतात दाखलजिल्ह्यातील अक्कलकुवा तसेच धडगाव आदी तालुक्यांमधील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आल़े आधीच जंगली परिसर असल्याने या ठिकाणी सर्पाचा मोठय़ा संख्येने सुळसुळाट असतो़ त्यातच                या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची घरेसुध्दा उंचावर नसून जमिनीलगतच लाकडी बांबू, कौले आदींपासून बनवलेली असल्याने याठिकाणी घरात प्रवेश करणे सरपटणा:या जनावरांसाठी सहज सोपे असत़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे तसेच वीजेचा अभाव असल्याने अंधारात सर्पदंश होण्याच्या घटना अधिकच वाढताना दिसून येत           आह़े जनावरांनाही होताय सर्पदंशमनुष्यासह गोठय़ात बांधलेल्या गाय, बैल, बकरी आदी पाळीव जनावरांनाही सर्पदंश होऊन जनावरे दगावण्याच्या घटना दुर्गम भागात घडत असतात़ पशु दगावल्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत असत़े जनजागृतीची आवश्यकतादुर्गम भागात सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती किंवा माहिती नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक उपचार पध्दतीने उपचार घेण्यास प्राधान्य देत असतात़परंतु यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असत़े त्यामुळे आरोग्य विभागाकडून याची दखल घेत सर्पदंश झाल्यावर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती करणे गरजेचे आह़ेरुग्णवाहिकांअभावी अडचणीपावसाळी दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात़ सर्पदंशाचे रुग्ण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतात़ परंतु अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना नेण्याची वेळ येत असत़े परंतु काही वेळा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात़ लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यताही नकारता येत नाही़त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आह़े