शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

सर्पदंशाच्या घटनांचा वाढता आलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 12:18 IST

जनजागृती गरजेची : पाच वर्षात दीड हजार जणांना सर्पदंश, पावसाळ्यात समस्या

नंदुरबार : गेल्या पाच वर्षात नंदुरबार जिल्ह्यात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ विशेष म्हणजे वर्षागणिक हा आकडा वाढत जात असल्याचे चित्र समोर आलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े यात, सर्पदंशाच्या घटना विशेषत ग्रामीण भागात, शेतशिवारात अधिक घडत असल्याचे निरीक्षण जिल्हा सामान्य रुग्णालयाचे आह़े 2013 पासूनच्या सर्पदंशाच्या घटनांची आकडेवारी बघता, वर्षनिहाय यात वाढ झाल्याचे दिसून येत आह़े वर्षनिहाय सर्पदंशाच्या घटना पुढील प्रमाण - 2013-2014  189, 2014-2015 288, 2015-2016  306, 2016-2017 317, 2017-2018 335 तर एप्रिल-मे 2018 या दोन महिन्यात 25 सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत़ अशा प्रकारे गेल्या पाच वर्षात 1 हजार 460 जणांना सर्पदंश झालेला आह़े सध्या पावसाळा असल्याने या दिवसांमध्ये साप, इंगळी, विंचू आदी प्राणी जमिनीबाहेर पडत असतात़ त्यातच पावसाळ्यात शेक:यांची खरिप हंगामाची पेरणी, मशागत आदी शेती कामे जोमात असतात़ त्यामुळे शेतशिवारात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडताना दिसून येत असतात़ परंतु या घटनांची संख्या वर्षागणिक वाढतच असल्याने ही बाब चिंतेची ठरत आह़े जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्ण होतात दाखलजिल्ह्यातील अक्कलकुवा तसेच धडगाव आदी तालुक्यांमधील दुर्गम भागात मोठय़ा संख्येने सर्पदंशाच्या घटना घडत असल्याचे सांगण्यात आल़े आधीच जंगली परिसर असल्याने या ठिकाणी सर्पाचा मोठय़ा संख्येने सुळसुळाट असतो़ त्यातच                या ठिकाणच्या आदिवासी बांधवांची घरेसुध्दा उंचावर नसून जमिनीलगतच लाकडी बांबू, कौले आदींपासून बनवलेली असल्याने याठिकाणी घरात प्रवेश करणे सरपटणा:या जनावरांसाठी सहज सोपे असत़े रात्रीच्या वेळी या ठिकाणी पथदिवे तसेच वीजेचा अभाव असल्याने अंधारात सर्पदंश होण्याच्या घटना अधिकच वाढताना दिसून येत           आह़े जनावरांनाही होताय सर्पदंशमनुष्यासह गोठय़ात बांधलेल्या गाय, बैल, बकरी आदी पाळीव जनावरांनाही सर्पदंश होऊन जनावरे दगावण्याच्या घटना दुर्गम भागात घडत असतात़ पशु दगावल्यामुळे यातून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसानही होत असत़े जनजागृतीची आवश्यकतादुर्गम भागात सर्पदंश झाल्यानंतर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती किंवा माहिती नसल्याने ग्रामीण भागातील आदिवासी बांधव पारंपारिक उपचार पध्दतीने उपचार घेण्यास प्राधान्य देत असतात़परंतु यातून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचीच शक्यता अधिक असत़े त्यामुळे आरोग्य विभागाकडून याची दखल घेत सर्पदंश झाल्यावर करण्यात येणा:या उपचार पध्दतींबाबत जनजागृती करणे गरजेचे आह़ेरुग्णवाहिकांअभावी अडचणीपावसाळी दिवस असल्याने सर्पदंशाच्या घटना समोर येत असतात़ सर्पदंशाचे रुग्ण जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी जात असतात़ परंतु अनेक वेळा जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना नेण्याची वेळ येत असत़े परंतु काही वेळा रुग्णवाहिका नसल्याने रुग्णाची वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात़ लवकर उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यताही नकारता येत नाही़त्यामुळे दुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांची संख्या वाढवावी अशी मागणी ग्रामीण भागातून करण्यात येत आह़े