शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी वाढीव बियाण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विागामार्फत बियाण्यांच्या मागणीत वाढ केली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी देखील रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ केली आहे. येत्या रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. 2016 मधील रब्बी हंगामात 21 हजार 130, 2017 मधील रब्बी हंगामात 24 हजार 726 तर 2018 मधील रब्बी हंगामात 21 हजार 536 इतक्या बियाण्यांची विक्री झाली होती. या तिन्नही वर्षाचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर,  गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.  

रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने महाबिजकडूनही बियाणांची मागणी केली आहे. त्यात ज्वारी-689, गहू- सात हजार 280, हरभरा- तीन हजार 456, करडई- सहा, मका- 246, सुर्यफुल- सात, बाजरी- एक, मूग सहा क्विंटल असे एकुण 13 हजार 131 क्विंटलची मागणी करण्यात आली आहे. पाऊस नसताना देखील मागील वर्षी रब्बी हंगामाचे 69 हजार 458 एवढे क्षेत्र होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन पटीने पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पेरणीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यानुसार मागणीही वाढवली आहे.