शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीसाठी वाढीव बियाण्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 12:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे रब्बी हंगामाच्या पेरणी  क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे. शेतक:यांना अपेक्षेनुसार बियाणे उपलब्ध व्हावे, यासाठी कृषी विागामार्फत बियाण्यांच्या मागणीत वाढ केली आहे. खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून नंदुरबार जिल्ह्यातील शेतक:यांनी देखील रब्बी हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामात शेती करणा:या शेतक:यांमध्ये भर पडणार असून पेरणीचे क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामात शेतक:यांना बियाण्यांची कमतरता भासू नये, यासाठी कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या मागणीत मोठी वाढ केली आहे. येत्या रब्बी हंगामात नंदुरबार जिल्ह्यातील 85 हजार 700 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार असल्याचे गृहीत धरुन मागणी वाढवली आहे. 2016 मधील रब्बी हंगामात 21 हजार 130, 2017 मधील रब्बी हंगामात 24 हजार 726 तर 2018 मधील रब्बी हंगामात 21 हजार 536 इतक्या बियाण्यांची विक्री झाली होती. या तिन्नही वर्षाचा आढावा घेत यंदाच्या रब्बी हंगामात ज्वारीसाठी 26 हजार 500 हेक्टर,  गहूसाठी 26 हजार हेक्टर, हरभरासाठी 24 हजार, करडईसाठी 150, मकासाठी चार हजार 100, सुर्यफुलसाठी 200 हेक्टर, बाजरीसाठी 50 हेक्टर, मूगसाठी 100 हेक्टर असे एकुण 85 हजार 700 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. रब्बी हंगामात पेरणीसाठी लागणा:या बियाण्यांसह खतांच्या मागणीचे नियोजन देखील कृषी विभागामार्फत करण्यात आले असून पेरणी क्षेत्रानुसार खताची मागणीही करण्यात आली आहे.  

रब्बी हंगामासाठी जिल्हा प्रशासनाने महाबिजकडूनही बियाणांची मागणी केली आहे. त्यात ज्वारी-689, गहू- सात हजार 280, हरभरा- तीन हजार 456, करडई- सहा, मका- 246, सुर्यफुल- सात, बाजरी- एक, मूग सहा क्विंटल असे एकुण 13 हजार 131 क्विंटलची मागणी करण्यात आली आहे. पाऊस नसताना देखील मागील वर्षी रब्बी हंगामाचे 69 हजार 458 एवढे क्षेत्र होते. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दोन पटीने पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा पेरणीचे क्षेत्रही वाढण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाकडून वर्तविण्यात आली असून त्यानुसार मागणीही वाढवली आहे.