शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

७० जणांच्या चलबिचलतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रयोगशाळेतून अहवाल येत नाही आणि दुसरीकडे क्वॉरंटाईन होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या मनातील चलबिचलता वाढत आहे. शुक्रवारी घेतलेले ४२ स्वॅब आणि शनिवारी घेतलेले २८ स्वॅब असे एकुण ७० अहवालांची प्रतिक्षा लागून आहे. यात रजाळे, नंदुरबार, कन्साई येथील रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींसह जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या स्वॅब अहवालांचा देखील समावेश आहे.नंदुरबारातील कोरोनाग्रस्त सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतलेले असतांना मुंबई रिटर्न कुटूंबाने जिल्ह्यात पुन्हा कोरनाचा शिरकाव केला. त्यातच सिव्हीलच्या दोन कर्मचाºयांना देखील त्याची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे कोरोनाचा फैलाव जिल्ह्यात झाला. आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. त्यामुळे मुंबईचा कोरोना जिल्ह्यात धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. प्रलंबीत अहवालातून आणखी कितीजण पॉझिटिव्ह निघतात किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे.अहवालांची संख्या वाढलीशुक्रवारी कोरोना रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यांच्या अहवालाची प्रतिक्षा असतांना आणखी २८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यामुळे एकुण संख्या आता ७० झाली आहे. काहीजण भितीपोटी देखील तपासणीसाठी येत असून स्वॅब घेण्याचा आग्रह करीत आहेत. परंतु कुठलेही लक्षणे नसतांना स्वॅब घेवून संख्या वाढविण्यापेक्षा अशा व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे.नऊ पैकी सात मुंबई रिटर्नकोरोनामुक्तीनंतर जिल्ह्यात आढळून आलेल्या नऊ रुग्णांपैकी सात रुग्ण हे मुंबई रिटर्न आहेत. दोन रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी आहेत. मुंबई रिटर्न आलल्यांमध्ये रजाळे, ता.नंदुरबार येथील सहाजण तर मुळचे दत्तवायपूर, ता.शिंदखेडा येथील एकाचा समावेश आहे. दत्तवायपूर येथील रुग्ण मुंबई येथून आल्यावर गावी थांबला, तेथून शहादा तालुक्यातील कन्साई गावी नातेवाईकांकडे गेला.त्रास होऊ लागल्याने त्यांनी स्थानिक ठिकाणी डॉक्टरांकडे तपासणी केल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यात ते पॉझिटिव्ह आढळले. संबधीत कन्साई येथे थांबल्याने प्रशासनाने कन्साई गावात देखील उपाययोजना केल्या आहेत.रजाळे येथील रुग्ण देखील मुंबई येथून आलेले आहेत. त्यांच्या संपर्कातील ते स्वत: सहाजण पॉझिटिव्ह आढळले असून संपर्कातील इतरांचे अहवाल येण्याची प्रतिक्षा आहे. शनिवारी रात्री उशीरा किंवा रविवारी हे अहवाल येणार आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेकांना आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलेले आहे. काहींना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.सिव्हीलमध्ये दक्षतासिव्हीलमधील कर्मचाºयांच्या स्वॅबची संख्या देखील वाढविली आहे. दोन रुग्ण रुग्णालयात आढळल्याने ही दक्षता घेतली जात आहे. कर्मचाºयांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांना हातमोजे व मास्क पुरविले जात आहे. येत्या काळात अधीक लागण्याची शक्यता लक्षात घेता मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.नवापूर : शहराच्या गुजरात वेशीवर कोरोनाने धडक दिल्याने नवापूर शहराची धकधक वाढली आहे. उच्छल येथील २४ वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. गोमतीपूर (अहमदाबाद) येथून १८ मे रोजी शहरालगतच्या हनुमानफळी उच्छल येथील २४ वर्षीय महिला परतली होती. सावधगिरीचा पवित्रा म्हणून महिलेस घरातच होम क्वॉरंटाईन करण्यात येऊन आरोग्य तपासणी केली जात होती. २२ मे रोजी तापाची लक्षणे दिसून आल्याने महिलेचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल प्राप्त होताच सायंकाळी सहा वाजता तातडीने महिलेस तापी जिल्ह्याच्या मुख्यालयी व्यारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. शहराजवळ रेल्वेस्थानक वसाहतीला लागून उच्छल व त्याचे पाडे आहेत. हनुमानफळी असाच एक भाग आहे. महामार्गाच्या एका बाजूला हनुमानफळी असून त्याच्यासमोरील भागात करंजी खुर्द ग्रामपंचायतीअंतर्गत वाकीपाडा येथील वस्ती असून या प्रकारामुळे तेथील लोकांनी हनुमानफळी व वाकीपाडा दरम्यानचा रस्ता सील केला आहे. महिलेस एक वर्षीय बालक असून त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे सूत्रांनी सांगितले. महिलेचा अहवाल येताच उच्छल येथील वैद्यकीय यंत्रणा लागलीच कामाला लागली आहे. औषध फवारणी करुन महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. शहरातील रेल्वेस्थानक भागास लागून हा भाग असल्याने स्थानिक प्रशासनाकडूनही घटनेची दखल घेत आवश्यक पावले उचलली जात आहेत.