शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

वाढत्या अतिक्रमणाला कुणाचा अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 11:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहाद्यातील अतिक्रमण हटावनंतर तळोद्यात प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु नंदुरबारात गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असूनही तसेच पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्षभरापूर्वी पत्र देवूनही नंदुरबारातील अतिक्रमणांना अभय दिला जात असल्याच्या प्रतिक्रीया शहरवासीयांच्या आहेत.जिल्हा मुख्यालयाचे शहर असल्यामुळे पालिकेतर्फे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु वाढत्या अतिक्रमणामुळे शहराला बकाल स्वरूप आले आहे. अतिक्रमण काढण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी होऊनही त्याकडे पालिका आणि जिल्हा प्रशासन लक्ष देत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे चागलेच फावले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शहादा व तळोद्याबाबत मनावर घेतल्यानंतर आता नंदुरबारबाबतही सक्त पाऊल उचलावे अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे.रस्ते झाले अधिकच अरुंदशहरातील रस्ते आधीच अरुंद व चिंचोळे आहेत. त्यात अतिक्रमण अधीक वाढल्याने या रस्त्यांवरून दोन वाहने निघणेही मोठे जिकरीचे ठरते. त्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी होणे, लहान, मोठे अपघात होणे असे प्रकार होतात. अनेकांनी घराचे, दुकानांचे ओटे वाढवून घेतले, पुढेपर्यंत पायºया आणल्या आहेत. काहींनी पत्र्यांचे शेड तयार करून घेतले आहे.बºयाच दुकानदारांनी दुकानासमोर विक्रीचा माल ठेवला आहे. त्यामुळे रस्ते पुर्ण ब्लॉक होत आहेत. वाहनचालकांना वाहन चालवितांना मोठी कसरत होते. या बाबी पालिकेच्या अख्त्यारीतील असतांनाही पालिका याबाबत नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.चौकांना आले बकालपणशहरातील मुख्य चौकांना फेरीवाल्यांनी बकाल स्वरूप आणले आहे. कुठलीही शिस्त न ठेवता कुठेही आणि कशाही पद्धतीने लॉरी व वस्तू आणि भाजीपाला विक्रीची दुकाने लावली जात आहेत. त्यात जुनी पालिका चौक ते नेहरू चौक, दिनदयाल चौक रस्ता, सुभाष चौक, अमृत चौक, मंगळ बाजार, तूप बाजार, शास्त्री मार्केट, जळकाबाजार, सिंधी कॉलनी या भागाचा समावेश आहे. अशा ठिकाणी बाजारात जाण्यासाठी महिला वर्ग धजावत नसल्याची स्थिती आहे.बाजाराच्या दिवशी तर मोठी समस्या निर्माण होते. बाजारात दुचाकी व तिनचाकी वाहने नेण्यास बंदी घालणे अपेक्षीत असतांना त्याबाबत कुठलीही कार्यवाही केली जात नाही. पूर्वी बाजाराच्या दिवशी वाहनांना बंदी राहत होती. आता मात्र सर्रास वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे वाद होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत देखील जाते.पोलीस चौकी हरवलीमंगळ बाजारात मंगळ गेट पोलीस चौकी आहे. या चौकीलाच विविध वस्तू, भाजीपाला, फळे विक्रेत्यांनी वेढा घातला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस चौकी आहे की नाही हाच प्रश्न निर्माण होतो. पोलिसांनाच अतिक्रमणधारकांनी वेठीस धरले तर सर्वसामान्यांची काय गत अशी स्थिती येथे आहे. हीच परिस्थिती जळका बाजार पोलीस चौकीच्या परिसरात देखील आहे.पक्के अतिक्रमणेही...शहरात कच्चे अतिक्रमणाबरोबर पक्के अतिक्रमण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अनेकांनी परवाणगी नसतांना बांधकाम केले आहेत. दादागिरी, राजकीय वरदहस्त आणि पालिकेला न जुमानणाºयांचे हे अतिक्रमण आहे.पालिका कारवाई करतांना लहान व कच्चे अतिक्रमणांवर कारवाई करते. परंतु पक्के अतिक्रमण धारकांवर कारवाईची हिंमत पालिकेची होत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटवितांना सर्वांनाच समान न्याय दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

वर्षभरापूर्वी पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागणी केली होती. परंतु जिल्हाधिकारी कार्यलय स्तरावरून वर्षभरापासून काहीही हालचाल झाली नसल्याचे दिसून येते.अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पालिकेची असतांना पालिका मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे टोलवत आहे. यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न नंदुरबारात निकाली लागणे मोठे जिकरीचे असल्याचे दिसून येत आहे.आतातरी पालिकेने आणि जिल्हाधिकाºयांनी गांभिर्याने घेवून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कडक कार्यवाही करून निर्णय घ्यावा अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.