शहरं
Join us  
Trending Stories
1
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
2
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
3
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
4
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
5
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
6
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
7
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
8
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
9
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
10
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
11
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
13
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
14
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
15
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
16
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
17
Maharashtra Rain: साताऱ्यात पुन्हा वळीव बरसला; यवतेश्वर घाटात टॉवर कोसळला! 
18
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
19
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
20
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?

नंदुरबारातील तापमानात पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:56 IST

तापमान ४२ अंशावर : २५ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार

नंदुरबार : गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबारात उष्णतेच्या लाटेचे पुनर्रागमण झालेले दिसून येत आहे़ रविवारी नंदुरबारात ४२ अंश सेल्शिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली़मध्य व उत्तर महाराष्ट्रात १९ ते २५ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यानुसार अंदाजाच्या पहिल्याच दिवशी नंदुरबारातील तापमान ४२ अंशावर गेले दिसून आले़ दरम्यान, नंदुरबारात दिवसभर उष्ण लहरींचा प्रभाव जाणवत होता़ त्यामुळे साहजिकच सायंकाळी व रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या झळा जाणवत होत्या़नंदुरबारात रविवारी दुपारी काळी काळ उन्ह-सावलीचा खेळ सुरु होता़ तसेच वाऱ्यांचा प्रभावही अधिक जाणवत होता़ ताशी १२ किमी वेगाने वारे वाहत होते़ परंतु यामुळे उन्हतेत मात्र कुठलीही कमी झाली नाही़ या उलट घरातदेखील बाहेरील उष्ण लहरी येत असल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा त्रास सहन करावा लागत होता़ वाढत्या उष्णतेमुळे अनेक नागरिकांनी घरावर हिरवा कापडाचे आच्छादन केलेले आहेत़ दुपारच्या उकाड्यांपासून बचाव करण्यासाठी पंखे, कुलर, एसी आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे़ वाढत्या उष्णतेमुळे सर्वच दुपारच्या वेळी ऐरवी गजबजणारे रस्तेदेखील ओस पडत असल्याची स्थिती आहे़ त्यातच भर उन्हात भाजीपाला तसेच इतर वस्तूंची विक्री करताना फेरीवाल्यांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे़ पुढील तीन ते चार दिवस प्रचंड उष्णतेची राहणार असल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे़ संतुलित आहार घेत भरपूर पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे़