शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

स्थलांतरीत बालके आहारापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडींमधील १,३६९ स्थलांतरित बालके ही डिसेंबरमध्ये आहारापासून वंचित आहेत तर ३९ बालके गरोदर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडींमधील १,३६९ स्थलांतरित बालके ही डिसेंबरमध्ये आहारापासून वंचित आहेत तर ३९ बालके गरोदर मातांसोबत बाहेर गेल्याने वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.वर्षा फडोळ,  सदस्य भरत गावित, सी.के.पाडवी, देवमन पवार, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.देवमन पवार यांनी अंगणवाडीतील लाभार्थी बालकांना आहारासंदर्भात विचारणा केली असता स्थलांतरीत बालकांचा आहार वाटप झाला नसल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांनी माहिती दिली.  मधुकर नाईक यांनी मौजे लक्कडकोट व सोनपाडा तर भरत गावित यांनी नांदवण येथील उपकेंद्र इमारत बांधकामाची कमी दराची निविदा न स्वीकारता त्या रद्द करावेत असा ठराव करण्याची मागणी केली. सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सण २०२१-२२ चा नियोजन आराखडा व लेबर बजेट तसेच सन २०२०-२१  च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी मिळणे बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भारूड यांनी माहिती सादर केली. जिल्हा परिषद नंदुरबार चे हस्तांतरण योजना जिल्हा परिषद सेस, अभिकरण, घसारा निधी, देखभाल व दुरुस्ती या खात्यातून विविध बँकेत २०३ कोटी ७ लक्ष ६९ हजार ८४६ रुपये गुंतवणूक रक्कमेस कार्योत्तर मंजुरी मिळण्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल कुमार गायकवाड यांनी माहिती सादर केली. कोविड लस बाबत आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी सांगितले, जिल्ह्याला १२ हजार ५०० डोस मिळाले असून चार केंद्रावर पाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विभाग प्रमुख यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची सदस्यांना सभागृहात माहिती द्यावी व व भूमिपूजन कार्यक्रमांना सदस्यांना  बोलवावे अशी मागणी भरत गावीत यांनी केली. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी वाचून दाखवले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

 महाल कडू येथे चार वर्षापासून पाणीपुरवठ्याची टाकी बांधली असून त्यात पाणी टाकले गेले नाही. चिखली येथे लघुसिंचनचे काम ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून करून घेतले. बॅकेतून सरपंचांनी पैसे काढून घेतले मात्र ठेकेदाराला बिल दिले नसल्याची तक्रार केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना चौकशी करण्याचे सांगितले. जिल्ह्यात काही गावांमध्ये घर जळालेले लाभार्थी व पुराच्या पाण्यात घर वाहून गेलेले लाभार्थ्यांना घरकुल योजनेत प्राधान्यक्रमाने घरे द्यावीत अशी मागणी भरत गावित व रतन पाडवी यांनी केली.