शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

स्थलांतरीत बालके आहारापासून वंचीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडींमधील १,३६९ स्थलांतरित बालके ही डिसेंबरमध्ये आहारापासून वंचित आहेत तर ३९ बालके गरोदर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अंगणवाडींमधील १,३६९ स्थलांतरित बालके ही डिसेंबरमध्ये आहारापासून वंचित आहेत तर ३९ बालके गरोदर मातांसोबत बाहेर गेल्याने वंचित असल्याची माहिती जिल्हा परिषद स्थायी समिती सभेत देण्यात आली. सभेत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नंदुरबार जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा अध्यक्षा अ‍ॅड. सीमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष राम रघुवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ.वर्षा फडोळ,  सदस्य भरत गावित, सी.के.पाडवी, देवमन पवार, मधुकर नाईक आदी उपस्थित होते.देवमन पवार यांनी अंगणवाडीतील लाभार्थी बालकांना आहारासंदर्भात विचारणा केली असता स्थलांतरीत बालकांचा आहार वाटप झाला नसल्याचे महिला व बालकल्याण अधिकारी कृष्णा राठोड यांनी माहिती दिली.  मधुकर नाईक यांनी मौजे लक्कडकोट व सोनपाडा तर भरत गावित यांनी नांदवण येथील उपकेंद्र इमारत बांधकामाची कमी दराची निविदा न स्वीकारता त्या रद्द करावेत असा ठराव करण्याची मागणी केली. सभेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सण २०२१-२२ चा नियोजन आराखडा व लेबर बजेट तसेच सन २०२०-२१  च्या पुरवणी आराखड्यास मंजुरी मिळणे बाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी भारूड यांनी माहिती सादर केली. जिल्हा परिषद नंदुरबार चे हस्तांतरण योजना जिल्हा परिषद सेस, अभिकरण, घसारा निधी, देखभाल व दुरुस्ती या खात्यातून विविध बँकेत २०३ कोटी ७ लक्ष ६९ हजार ८४६ रुपये गुंतवणूक रक्कमेस कार्योत्तर मंजुरी मिळण्याबाबत मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल कुमार गायकवाड यांनी माहिती सादर केली. कोविड लस बाबत आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके यांनी सांगितले, जिल्ह्याला १२ हजार ५०० डोस मिळाले असून चार केंद्रावर पाच हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व विभाग प्रमुख यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजनांची सदस्यांना सभागृहात माहिती द्यावी व व भूमिपूजन कार्यक्रमांना सदस्यांना  बोलवावे अशी मागणी भरत गावीत यांनी केली. २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी चे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाचे पत्र प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी वाचून दाखवले. बैठकीत इतरही विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

 महाल कडू येथे चार वर्षापासून पाणीपुरवठ्याची टाकी बांधली असून त्यात पाणी टाकले गेले नाही. चिखली येथे लघुसिंचनचे काम ग्रामपंचायतीने ठेकेदाराकडून करून घेतले. बॅकेतून सरपंचांनी पैसे काढून घेतले मात्र ठेकेदाराला बिल दिले नसल्याची तक्रार केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना चौकशी करण्याचे सांगितले. जिल्ह्यात काही गावांमध्ये घर जळालेले लाभार्थी व पुराच्या पाण्यात घर वाहून गेलेले लाभार्थ्यांना घरकुल योजनेत प्राधान्यक्रमाने घरे द्यावीत अशी मागणी भरत गावित व रतन पाडवी यांनी केली.