शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

खाण्याचा सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

नंदुरबार : यंदा नदी, नाले, तलावांमध्ये पाणीच नसल्याने गणपतींच्या पोअीपीपासून तयार केलेल्या मूर्ती कशा विरघळणार याबाबत शंकाच आहे. त्यामुळे ...

नंदुरबार : यंदा नदी, नाले, तलावांमध्ये पाणीच नसल्याने गणपतींच्या पोअीपीपासून तयार केलेल्या मूर्ती कशा विरघळणार याबाबत शंकाच आहे. त्यामुळे आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मूर्ती विसर्जन करता येणार आहे. त्यासाठी केवळ खाण्याचा सोडा आणि पाण्याचा वापर केल्यास मूर्ती दीड ते दोन दिवसांत विरघळते. काही मूर्तिकारांनी देखील या पद्धतीचे स्वागतच केले आहे.

गणेशोत्सवात यंदा मोठ्या मूर्तींना परवानगी नाही. केवळ चार फुटांपर्यंतच्या मूर्तींची मर्यादा घालून देण्यात आली आहे. असे असले तरी शाडूमातीपासून बनविण्यात आलेल्या मूर्तींसोबतच पीओपीपासून बनविण्यात येणाऱ्या मूर्तींचे प्रमाण देखील जास्त आहे. अशा मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे नदी, तलावांमध्ये अशा मूर्ती उघड्यावर पडून असतात. यंदा तर पाऊसच नसल्यामुळे नदी, तलाव यांच्यात पाणी नाही. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी कसरत होणार आहे. त्यात खाण्याच्या सोड्याद्वारे घरच्या घरी मूर्तीचे विसर्जन सहज शक्य आणि सोयीचे ठरणार आहे.

पीओपीच्या मूर्तीचीच अधिक विक्री

n यंदाच्या गणेशोत्सवातदेखील पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री होत असल्याचे चित्र आहे.

n शाडू मातीपासून तयार करण्यात येणाऱ्या मूर्तींना मागणी असली तरी त्या विक्रीसाठी कमी असतात. त्यामुळे अनेकांचा कल हा पीओपीच्या मूर्तींकडेच असतो.

n खाण्याच्या सोड्यात मूर्ती विरघळल्यानंतर गाळ तयार होतो. हा गाळ अगदी पातळ असतो. त्यामुळे त्याचा उपयोग नंतर खत म्हणूनदेखील केला जाऊ शकतो. त्यासाठी कुठल्याही प्रक्रियेची गरज नाही.

n शाडूच्या मातीच्या मूर्तीचेदेखील घरगुती स्वरूपात विसर्जन केल्यास सोयीचे होते. साध्या पाण्यात अशा मूर्ती विसर्जित केल्यास एका दिवसात विरघळून ती माती घरगुती झाड्याच्या कुंडीमध्ये वापरता येऊ शकते.

मूर्तिकार काय म्हणतात

n मूर्तिकारांच्या म्हणण्यानुसार ही पद्धती सोयीची आणि सुटसुटीत आहे. कृत्रिम तलाव आणि नदीच्या पाण्यात मूर्ती लवकर विरघळत नाही.

n यंदा लहान मूर्ती असल्यामुळे अर्थात चार फुटांपर्यंतच्या मूर्ती असल्यामुळे त्या घरच्या घरी विसर्जित करण्यासाठी सोयीचे ठरणार असल्याचेही मूर्तिकारांचे म्हणणे आहे.

n खाण्याचा सोडा पाण्यात मिसळून त्यात पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन केल्यास त्या किमान ४० ते ४८ तासात विरघळतात.

n त्यासाठी पाण्याचे प्रमाण आणि खाण्याच्या सोड्याचे प्रमाण हे मर्यादित असावे. तसे झाल्यास ते सोयीचे ठरते.