शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:36 IST

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जिल्ह्यात वेगात सुरू आहे. या एकूण सात लाख नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात ...

नंदुरबार : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण जिल्ह्यात वेगात सुरू आहे. या एकूण सात लाख नागरिकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीकरणाचा हा वेग वाढता असला तरीही अनेकजण अद्यापही ताप न आल्यास लस खरी की खोटी अशी पडताळणी करत आहेत. परंतु ताप येणे किंवा न येणे ही लस घेतल्याचे प्रमाण ठरू शकत नसल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यात लसीकरण मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात झाली होती. यातून आरोग्य विभागाने केंद्रांमध्ये वाढ करत लसीकरण सुरू ठेवले होते. यातून आजअखेरीस जिल्ह्यात सहा लाख ८३ हजार ६७० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या एकूण ४५ टक्के नागरिकांना पहिला किंवा दुसरा डाेस दिला आहे. एकीकडे लसीकरण वेगात सुरू असताना दुसरीकडे लस घेण्याबाबत समज-गैरसमज अद्यापही दूर झालेले नाहीत.

वैद्यकीय तज्ज्ञांनुसार लस घेतल्यानंतर ताप येणे हे चांगले असल्याचे; परंतु ताप आलाच पाहिजे हे गरजेचे नसल्याचेही सांगण्यात येते. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार अनेक बाबी या वेगळ्या ठरू शकतात. यातून लस घेतल्यानंतरचे परिणाम वेगवेगळे असू शकतात. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी कोविशिल्ड लस घेतल्यानंतर ताप आल्याचे सांगितले तर काहींनी ताप न आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाऊन विचारणा करत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या बहुतांश जणांना ताप किंवा इतर त्रास जाणवलेला नाही.

गेल्या आठवड्यात लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतु लस घेतल्यावर कोणताही त्रास जाणवला नाही. याबाबत संबंधित वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांना संपर्क केला होता. परंतु नाॅर्मल असल्याचे त्यांनी सांगितल्याने विश्वास बसला.

- लसीकरण झालेला युवक, नंदुरबार

मुलाने लस घेतल्यानंतर त्याला ताप आला नाही. लस बोगस आहे की, काय म्हणून डाॅक्टरांना विचारणा केली. परंतु मुलाची शारीरिक क्षमता ही चांगली असल्याने त्याला ताप आला नसावा, असे सांगण्यात आले. शंकेचे समाधान झाले.

-योगिता पाटील, नंदुरबार

ताप आलाच पाहिजे हे काही प्रमुख लक्षण नाही. लस घेतल्यानंतर तिचा प्रभाव हा राहणारच आहे. नागरिकांनी शंका-कुशंकांपेक्षा लसीकरण करून घेणे योग्य राहील. लस सुरक्षित आहे.

-डाॅ. के. डी. सातपुते, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक.