शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कामांमध्ये दिरंगाई केल्यास कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:53 IST

नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा ...

नंदुरबार : बारा गाव पाणी योजनेचे भिजत घोंगडे लवकर दूर करा, यापूर्वी राबविलेल्या पाणी योजना बंद असतील किंवा त्यांचा वापर होत नसेल तर त्या तातडीने सुरू होतील याकडे लक्ष द्यावे. या कामांमध्ये दुर्लक्ष किंवा दिरंगाई करणा:यांवर थेट कारवाई करण्याच्या सुचना आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी नंदुरबार तालुका पाणी टंचाई आढावा बैठकीत बोलतांना दिल्या.यंदा जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यातील सर्वाधिक गावे ही पाणी टंचाईच्या सावटाखाली आहेत. पूर्व भागातील सर्वाधिक गावांना तीव्र पाणी टंचाई आहे. येत्या काळात अर्थात जानेवारी ते मे दरम्यान या गावांना टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेता टंचाईच्या कामांचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी पंचायत समिती सभागृहात बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी तहसीलदार नितीन पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता पी.टी.बडगुजर, जलसंपदा विभागाचे डी.डी.जोशी आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार डॉ.गावीत यांनी सांगितले, यंदा अत्यल्प पजर्न्यमानामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. नंदुरबार तालुक्यात दरवर्षी पूर्व भाग दुष्काळी असतो. यंदा तर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पाणी टंचाईची तीव्रता आहे. खरीप पिकाची उत्पादकता आधीच घटली, ते पीक वाया गेले. रब्बीचीही जेमतेमच आशा आहे. आता किमान पिण्यासाठी पाणी आणि जनावरांना चारा या दोन बाबींकडे गांभिर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. या दोन्ही कामांबाबत कुणी अधिकारी किंवा कर्मचा:याने दिरंगाई केल्यास कारवाई करावी. बारा गाव पाणी योजना सुरू होण्यात काय अडचणी आहेत. तांत्रिक अडचणी असतील तर त्या कशा सोडविल्या जातील याबाबत संबधीतांनी लक्ष घालावे. भुगर्भातील पाणी पातळी खोल गेली आहे. कुपनलिका, विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे पर्यायी उपाययोजना देखील स्थानिक पातळीवर होऊ शकणार नाहीत. अशावेळी तापीवरून पाईपलाईनने पाणी आणून अशा गावांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रय} करण्याचे निर्देश देखील आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांनी        दिले. आजच्या बैठकीत त्यांनी पूर्व व उत्तर भागातील 68 गावांचा आढावा घेतला. प्रत्येक गावातील सरपंच, ग्रामसेवक व संबधीत अधिकारी यांच्याकडून त्या त्या गावांची टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेतली. काय उपाययोजना          करता येतील यासंदर्भात मार्गदर्शन केले.