शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
5
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
6
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
7
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
8
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
9
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
10
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
11
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
12
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
13
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
14
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
15
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
16
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
17
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
18
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
19
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
20
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी

तहान लागली की मगच प्या पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली ...

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली राहू शकते. अन्यथा व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. यामुळे तहान लागली की मगच पाणी प्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

गेल्या काही वर्षात जलजन्य आजार, किडनी स्टोन यासह इतर आजारांचा त्रास असलेले रुग्ण वाढीस लागले आहेत. दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यातून पाणी अधिक प्यावे असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होतात, परंतु हे संदेश पूर्ण माहिती नसलेले असल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त पाणी मूत्राशयाला बाधा देणारे ठरु शकते. किडनी एकाचवेळी एवढे पाणी बाहेर फेकू शकत नाही. किडनीचे विकार असलेल्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिणे कधीही योग्य असते, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.

प्रत्येक व्यक्तीने ऋतूमानानुसार तहान लागल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. सरासरी तीन लीटरपर्यंत पाणी दिवसभरात पिणे योग्य ठरते. त्यापेक्षा अधिक पाणी पिणे शरीराला हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकार, किडनी किंवा डायलिसीसवर असलेल्या रुग्णांनी योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन तसेच वैद्यकीय सल्ला घेऊन दिवसभरातील पाण्याचे नियोजन केले पाहिजे. जेवणानंतरही भरपूर पाणी पिऊ नये.

- डॉ. रोशन भंडारी, नंदुरबार.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाणी कमी पडले तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात मूत्राशयात संसर्ग होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.

किडनी विकार असणाऱ्यांनी घ्या काळजी

किडनीचे विकार असणाऱ्यांना मर्यादेतच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना ८०० मिली पर्यंत पाणी दिले जाते.