शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागली की मगच प्या पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली ...

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली राहू शकते. अन्यथा व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. यामुळे तहान लागली की मगच पाणी प्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

गेल्या काही वर्षात जलजन्य आजार, किडनी स्टोन यासह इतर आजारांचा त्रास असलेले रुग्ण वाढीस लागले आहेत. दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यातून पाणी अधिक प्यावे असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होतात, परंतु हे संदेश पूर्ण माहिती नसलेले असल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त पाणी मूत्राशयाला बाधा देणारे ठरु शकते. किडनी एकाचवेळी एवढे पाणी बाहेर फेकू शकत नाही. किडनीचे विकार असलेल्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिणे कधीही योग्य असते, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.

प्रत्येक व्यक्तीने ऋतूमानानुसार तहान लागल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. सरासरी तीन लीटरपर्यंत पाणी दिवसभरात पिणे योग्य ठरते. त्यापेक्षा अधिक पाणी पिणे शरीराला हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकार, किडनी किंवा डायलिसीसवर असलेल्या रुग्णांनी योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन तसेच वैद्यकीय सल्ला घेऊन दिवसभरातील पाण्याचे नियोजन केले पाहिजे. जेवणानंतरही भरपूर पाणी पिऊ नये.

- डॉ. रोशन भंडारी, नंदुरबार.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाणी कमी पडले तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात मूत्राशयात संसर्ग होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.

किडनी विकार असणाऱ्यांनी घ्या काळजी

किडनीचे विकार असणाऱ्यांना मर्यादेतच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना ८०० मिली पर्यंत पाणी दिले जाते.