शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

तहान लागली की मगच प्या पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली ...

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली राहू शकते. अन्यथा व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. यामुळे तहान लागली की मगच पाणी प्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

गेल्या काही वर्षात जलजन्य आजार, किडनी स्टोन यासह इतर आजारांचा त्रास असलेले रुग्ण वाढीस लागले आहेत. दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यातून पाणी अधिक प्यावे असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होतात, परंतु हे संदेश पूर्ण माहिती नसलेले असल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त पाणी मूत्राशयाला बाधा देणारे ठरु शकते. किडनी एकाचवेळी एवढे पाणी बाहेर फेकू शकत नाही. किडनीचे विकार असलेल्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिणे कधीही योग्य असते, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.

प्रत्येक व्यक्तीने ऋतूमानानुसार तहान लागल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. सरासरी तीन लीटरपर्यंत पाणी दिवसभरात पिणे योग्य ठरते. त्यापेक्षा अधिक पाणी पिणे शरीराला हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकार, किडनी किंवा डायलिसीसवर असलेल्या रुग्णांनी योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन तसेच वैद्यकीय सल्ला घेऊन दिवसभरातील पाण्याचे नियोजन केले पाहिजे. जेवणानंतरही भरपूर पाणी पिऊ नये.

- डॉ. रोशन भंडारी, नंदुरबार.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाणी कमी पडले तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात मूत्राशयात संसर्ग होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.

किडनी विकार असणाऱ्यांनी घ्या काळजी

किडनीचे विकार असणाऱ्यांना मर्यादेतच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना ८०० मिली पर्यंत पाणी दिले जाते.