शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

तहान लागली की मगच प्या पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:34 IST

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली ...

नंदुरबार : पाणी हा शरीरासाठी सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटक आहे. असे असले तरी पाणीही मर्यादित पिल्यास शरीराची ठेवण चांगली राहू शकते. अन्यथा व्याधींचा त्रास जाणवण्याची शक्यता असते. यामुळे तहान लागली की मगच पाणी प्यावे असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.

गेल्या काही वर्षात जलजन्य आजार, किडनी स्टोन यासह इतर आजारांचा त्रास असलेले रुग्ण वाढीस लागले आहेत. दूषित पाणी तसेच क्षारयुक्त पाण्याचे सेवन केल्याने ही समस्या निर्माण होत आहे. यातून पाणी अधिक प्यावे असे संदेश सोशल मीडियात व्हायरल होतात, परंतु हे संदेश पूर्ण माहिती नसलेले असल्याने डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

शरीरात पाणी जास्त झाले तर त्याचाही शरीरावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. गरजेपेक्षा जास्त पाणी मूत्राशयाला बाधा देणारे ठरु शकते. किडनी एकाचवेळी एवढे पाणी बाहेर फेकू शकत नाही. किडनीचे विकार असलेल्यांनी डाॅक्टरांच्या सल्ल्याने पाणी पिणे कधीही योग्य असते, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता असते.

प्रत्येक व्यक्तीने ऋतूमानानुसार तहान लागल्यावर पाणी पिणे गरजेचे आहे. सरासरी तीन लीटरपर्यंत पाणी दिवसभरात पिणे योग्य ठरते. त्यापेक्षा अधिक पाणी पिणे शरीराला हानीकारक ठरु शकते. पोटाचे विकार, किडनी किंवा डायलिसीसवर असलेल्या रुग्णांनी योग्य त्या पद्धतीने माहिती घेऊन तसेच वैद्यकीय सल्ला घेऊन दिवसभरातील पाण्याचे नियोजन केले पाहिजे. जेवणानंतरही भरपूर पाणी पिऊ नये.

- डॉ. रोशन भंडारी, नंदुरबार.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीरात पाणी कमी पडले तर त्याचा किडनीवर दुष्परिणाम होतो. त्यात मूत्राशयात संसर्ग होणे, डिहायड्रेशन होणे, मुतखडा होणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांना आधीच मुतखड्याचा विकार आहे, त्यांनी पाणी घेतले तर त्यांना वारंवार मुतखडा होऊ शकतो.

किडनी विकार असणाऱ्यांनी घ्या काळजी

किडनीचे विकार असणाऱ्यांना मर्यादेतच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यांना ८०० मिली पर्यंत पाणी दिले जाते.