शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नंदुरबारला जलसंधारणाच्या कामाचा आदर्श पायंडा

By admin | Updated: May 20, 2017 16:04 IST

गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 20 - निस्वार्थपणे काम केल्यास मदतीचे हात देखील पुढे येतात. तोच अनुभव येथील पूर्वीच्या सरदार पटेल सोशल ग्रृप व आताचे पी.के.अण्णा फाउंडेशनला आला. गेल्या दोन वर्षापासून जलसंधारणाच्या कामात झोकून दिलेल्या या फाउंडेशनच्या कक्षा लवकरच विस्तारण्यात येणार असल्याची माहिती पदाधिका:यांनी ‘लोकमत’संवाद उपक्रमात  दिली.नंदुरबारच्या पी.के.अण्णा फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी  ‘लोकमत’ कार्यालयात भेट दिली. यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी मुन्ना   पटेल, बाळू पटेल, संदीप पाटील, सुनील पाटील, प्रशांत पटेल व संजय पटेल हे सहभागी झाले होते. कामाला सुरुवातफाउंडेशनच्या उभारणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले,  2014 मध्ये सरदार पटेल यांच्या रन फॉर युनिटी हा उपक्रम देशभरात राबविण्यात आला होता. त्याचअंतर्गत गिरिविहार परिसरातील काही युवकांनी मिळून कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. याच काळात गिरिविहार चौकाचे नामकरण सरदार वल्लभभाई पटेल चौक असे करण्याची मागणी नगरपालिकेकडे करण्यात आली. आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी लागलीच होकार देत चौकाचे नामकरण केले. त्यामाध्यमातून मोठा कार्यक्रमही घडवून आणला गेला. त्यातून प्रेरणा घेत सरदार पटेल सोशल ग्रृपची निर्मिती करण्यात आली. याद्वारे रुग्णवाहिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्याकरीता समाजाच्या 28 गावांमध्ये जावून प्रत्येकी 100 रुपयांची देणगी अर्थात पावती फाडण्यात आली. निधी गोळा झाल्याने त्याचे फाउंडेशन करण्याचे पुढे निश्चित करण्यात आले. त्यानुसार पी.के.अण्णा पाटील फाउंडेशन असे नामकरण करण्यात आले. फाउंडेशनकडे आठ लाख गोळा झाले. अगदी गरिबातील गरिब व्यक्तीनेदेखील सहभाग दिला. कोरीट येथील एका दुकानदारकडे 50 रुपयेच होते, मात्र पावतीवर 100 रुपये छापलेले असल्यामुळे ते कसे द्यावे अशी विवंचना त्याला होती. परंतु त्याचे दातृत्त्व पहाता त्याला साधी पावती देवून त्याचेही योगदान घेण्यात आले. रुग्णवाहिका ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू आहे. नंदुरबार शहर व तालुका कार्यक्षेत्रात ती मोफत पुरविण्यात येते. फाऊंडेशनतर्फे काहीतरी वेगळे करावे या उद्देशाने पदाधिका:यांनी विचार सुरू केला. जलसंधारणात सहभागगेल्यावर्षी जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता होती. त्यामुळे जलसंधारण क्षेत्रात काम करावे अशी अपेक्षा काहींनी बोलून दाखविली. त्यानुसार पातोंडा गावाची निवड करण्यात आली. या गावातील 1972 मध्ये खोदण्यात आलेल्या तलावात मोठय़ा प्रमाणावर गाळ साचला होता. तो काढावा तसेच दोन चेक डॅममधीलही गाळ काढण्याचे ठरविण्यात आले. या ठिकाणी तीन जेसीबी मशिन व 35 ते 40 ट्रॅक्टरद्वारा गाळ काढण्यात आला. या ठिकाणी काम करणा:या लोकांना जेवनाचा डबा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने करीत होते. कोळदा येथे दोन व शिंदे येथे तीन चेक डॅम मधील देखील गाळ काढण्यात आला. एकुण साडेसात हजार ट्रॅक्टर गाळ गेल्यावर्षी फाउंडेशनतर्फे काढण्यात आला.  लोकांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी परिश्रम घेणार आहेत. यापुढे कार्यक्षेत्राचा विस्तार करून विविध कामे त्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचेही फाउंडेशनच्या पदाधिका:यांनी यावेळी स्पष्ट केले.