शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

मेरे पास सिर्फ माँ है..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा ...

नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या मागे शिल्लक असलेले वारस हे आर्थिक संकटात आले असून त्यातून मार्ग काढावा कसा, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२१ या काळात कोरोनामुळे ८२१ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग वाढत गेल्याने तब्ब्येत खालावून, वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच उपचारानंतरही बरे होऊन अचानक मृत्यू ओढावलेल्या मयतांमागे त्यांचे कुटुंब आहेत. जिल्ह्यात मयत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे वय ४० च्या पुढे होते. घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांचे मागे पत्नी, मुले, मुली, आई-वडील असा परिवार आहे. उपवर-मुले, मुली विवाहयोग्य असल्याने घरातील कर्ता गेल्याने त्यांचे विवाह थांबले आहेत. शेतकरी कुटुंबातील काहींच्या घरी खरीप हंगामाची जबाबदारी घेणाराही कुणी नसल्याने त्या घरांची जबाबदारी महिलांवर पडली आहे. बहुतांश ठिकाणी ‘आई’ हा एकच आधार असल्याने पुढे काय, असा प्रश्न भेडसावत आहे. नोकरदार, हातमजुरी करणारे यांच्याही घरात सारखीच स्थिती आहे. अद्याप कर्त्या पुरुषांच्या मृत्यूला दोन महिनेही झालेले नसल्याने अनेक घरांमध्ये स्मशान शांतता असल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. अनेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते.

शेतीला आकार कसा द्यावा हाच प्रश्न

तळोदा तालुक्यातील मोड या गावात तब्बल १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या सर्वांच्या शोकात त्यांचे कुटुंबीय बुडाले आहेत. यातील तीन ठिकाणी भेट दिली असता, कुटुंब प्रमुख गेल्यानंतर त्यांचे हाल सुरू असल्याचे समोर आले. शेती कसणारा कर्ता पुरुषच गेल्याने आता काय, प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुले लहान असल्याने महिलांवर घरची जबाबदारी आली आहे. शेतीचे व्यवहार कसे सुरू करावेत, खते आणि बियाणे कुठून आणावे, शेती कसावी कशी, त्यासाठीचा पैसा येणार तरी कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

पती गेले, मुलांच्या भवितव्याचे काय..

शहादा शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कारही करता आले नव्हते. काहींचे अंत्यविधी ज्याठिकाणी उपचार सुरू होते तेथेच झाले. यातून दवाखान्यात निघालेल्या कर्त्या पुरुषाचे मी येतो बरा होऊन हे शब्द आजही त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहेत. शहादा शहरातील शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची विवाहयोग्य मुली, शिक्षण घेणारा मुलगा यांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न त्यांच्या आईसमोर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते.

मुलांना वडिलांचा चेहरा आठवणार तरी कसा..

एक मुलगी, एक दीड वर्षाचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार सोडून अवघ्या पस्तीशीतच एक कर्ता पुरुष कोरोनामुळे मृत झाला. त्याची पत्नी त्याच्या पश्चात घर सांभाळण्याचा प्रयत्न करत असली तरीही मुलांना मोठेपणी वडिलांचा चेहरा तरी आठवेल का, असा प्रश्न तिला सतावत आहे. तांत्रिक व्यवसाय करणारा आपला पती गेल्यानंतर उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शिक्षण असल्याने घराबाहेर पडून मुलांसाठी काही तरी करावा असा मानस या मातेने व्यक्त केला आहे.

१११ बालकांचे हरपले मातृ किंवा पितृछत्र

नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ० ते १८ वयोगटातील १११ बालकांचे मातृ किंवा पितृछत्र हरपले आहे. त्यानंतर १९ ते ३९ वयोगटात १९९ जणांचे मातृ किंवा पितृछत्र हरपल्याचे समोर आले आहे. विभागाकडून जिल्ह्यातील विविध भागात सर्वेक्षण गतिमान करण्यात आले असून बालकांना शासनाकडून मदत देणार आहेत.