शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

मेरे पास सिर्फ माँ है..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:23 IST

नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा ...

नंदुरबार : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तब्बल ६२१ जणांचा बळी गेला आहे. बळी गेलेले अनेक जण कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या मागे शिल्लक असलेले वारस हे आर्थिक संकटात आले असून त्यातून मार्ग काढावा कसा, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

जिल्ह्यात एप्रिल २०२० ते जून २०२१ या काळात कोरोनामुळे ८२१ जणांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग वाढत गेल्याने तब्ब्येत खालावून, वेळेवर उपचार न मिळाल्याने तसेच उपचारानंतरही बरे होऊन अचानक मृत्यू ओढावलेल्या मयतांमागे त्यांचे कुटुंब आहेत. जिल्ह्यात मयत झालेल्या ९० टक्के नागरिकांचे वय ४० च्या पुढे होते. घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांचे मागे पत्नी, मुले, मुली, आई-वडील असा परिवार आहे. उपवर-मुले, मुली विवाहयोग्य असल्याने घरातील कर्ता गेल्याने त्यांचे विवाह थांबले आहेत. शेतकरी कुटुंबातील काहींच्या घरी खरीप हंगामाची जबाबदारी घेणाराही कुणी नसल्याने त्या घरांची जबाबदारी महिलांवर पडली आहे. बहुतांश ठिकाणी ‘आई’ हा एकच आधार असल्याने पुढे काय, असा प्रश्न भेडसावत आहे. नोकरदार, हातमजुरी करणारे यांच्याही घरात सारखीच स्थिती आहे. अद्याप कर्त्या पुरुषांच्या मृत्यूला दोन महिनेही झालेले नसल्याने अनेक घरांमध्ये स्मशान शांतता असल्याचे या भेटीदरम्यान दिसून आले. अनेकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, ते बोलण्याच्या स्थितीतही नव्हते.

शेतीला आकार कसा द्यावा हाच प्रश्न

तळोदा तालुक्यातील मोड या गावात तब्बल १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मयत झालेल्या सर्वांच्या शोकात त्यांचे कुटुंबीय बुडाले आहेत. यातील तीन ठिकाणी भेट दिली असता, कुटुंब प्रमुख गेल्यानंतर त्यांचे हाल सुरू असल्याचे समोर आले. शेती कसणारा कर्ता पुरुषच गेल्याने आता काय, प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुले लहान असल्याने महिलांवर घरची जबाबदारी आली आहे. शेतीचे व्यवहार कसे सुरू करावेत, खते आणि बियाणे कुठून आणावे, शेती कसावी कशी, त्यासाठीचा पैसा येणार तरी कुठून असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

पती गेले, मुलांच्या भवितव्याचे काय..

शहादा शहरातील कोरोनाबाधितांचे मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना त्यांच्यावर नीट अंत्यसंस्कारही करता आले नव्हते. काहींचे अंत्यविधी ज्याठिकाणी उपचार सुरू होते तेथेच झाले. यातून दवाखान्यात निघालेल्या कर्त्या पुरुषाचे मी येतो बरा होऊन हे शब्द आजही त्याच्या कुटुंबीयांना सतावत आहेत. शहादा शहरातील शिक्षकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची विवाहयोग्य मुली, शिक्षण घेणारा मुलगा यांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न त्यांच्या आईसमोर असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. यावेळी त्यांचे डोळेही पाणावले होते.

मुलांना वडिलांचा चेहरा आठवणार तरी कसा..

एक मुलगी, एक दीड वर्षाचा मुलगा, आई, भाऊ असा परिवार सोडून अवघ्या पस्तीशीतच एक कर्ता पुरुष कोरोनामुळे मृत झाला. त्याची पत्नी त्याच्या पश्चात घर सांभाळण्याचा प्रयत्न करत असली तरीही मुलांना मोठेपणी वडिलांचा चेहरा तरी आठवेल का, असा प्रश्न तिला सतावत आहे. तांत्रिक व्यवसाय करणारा आपला पती गेल्यानंतर उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. शिक्षण असल्याने घराबाहेर पडून मुलांसाठी काही तरी करावा असा मानस या मातेने व्यक्त केला आहे.

१११ बालकांचे हरपले मातृ किंवा पितृछत्र

नंदुरबार जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ० ते १८ वयोगटातील १११ बालकांचे मातृ किंवा पितृछत्र हरपले आहे. त्यानंतर १९ ते ३९ वयोगटात १९९ जणांचे मातृ किंवा पितृछत्र हरपल्याचे समोर आले आहे. विभागाकडून जिल्ह्यातील विविध भागात सर्वेक्षण गतिमान करण्यात आले असून बालकांना शासनाकडून मदत देणार आहेत.