शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
4
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
5
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
6
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
7
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
8
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
9
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
10
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
11
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
12
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
13
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
14
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
15
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
16
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
17
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
18
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
19
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
20
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?

काही दिवसांपूर्वी परत आले ्रपुन्हा लॉकडाऊन होताच गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरात बऱ्याच वर्षांपासून स्थिर स्थावर झालेले राजस्थानी आणि उत्तर भारतीय मजूर लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच आपआपल्या गावी निघून गेले होते़ यातील काही जून महिन्यात परतले होते़ परंतु पुन्हा लॉकडाऊन आणि कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने पाहून अनेकजण पुन्हा घरी रवाना झाले आहेत़जिल्ह्यात खाद्यपदार्थ आणि बांधकाम व्यवसायात राजस्थानी, मेहनत आणि मजूरीच्या कामासाठी उत्तर प्रदेश तर रेल्वेच्या किरकोळ कामांत बिहारी मजूर गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत़ यात मध्यप्रदेशातून येणारे मजूरही शहरात काम मिळवू लागले आहेत़ रेल्वेने येथे येणे सोयीस्कर असल्याने अनेकांनी याठिकाणी बस्तान मांडले आहे़ यातील काही हे येथीलच रहिवासी झाले आहेत़ तर काहींचा परिवार आजही गावीच आहे़ यातून वर्षातून दोन महिने गावी जावून हे मजूर व व्यावसायिक कुटंूबासोबत घालवतात़ मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी यातील बºयाच जणांनी स्वत:ची सोय करुन घेत गावाचा रस्ता धरला होता़ स्थानिक ठेकेदाराकडे हिशोब करुन ते रवाना झाले आहेत़ दोन महिने घरी राहिल्यानंतर जूनच्या मध्यात यातील काही परत आले होते़ परंतु कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि दीड महिन्यात दोन वेळा झालेले किरकोळ लॉकडाऊन यामुळे त्यांनी पुन्हा घरी जाणे पसंत केले आहे़ परिणामी घराचे बांधकाम पूर्ण होऊनही अनेकांचे छताचे पीओपी, फ्लोरींग, कोटा फरशीची कटाई आणि बसवणे यासह किरकोळ बांधकाम व दुरूस्त्या बंद पडल्या आहेत़ दुसरीकडे नंदुरबारसह इतर शहरी भागात राजस्थानी चवीचे ‘इन्सस्टंट’ खाद्य पदार्थ आणि मिठाई तयार करणारे राजस्थानी कारागिरही परत गेले असल्याने या दुकानांनाही घरघर लागली आहे़ अनेकांची खाद्य पदार्थ विक्रीची दुकाने सुरू झाली असली तरी त्यात ‘ती’ चव नसल्याने व्यवसाय बंद पडले आहेत़सोबत शहरातील विविध भागात पाणीपुरी, शेंगदाणे-फुटाणे यासह इतर खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणारेही दिसून येत नाहीत़ बहुतांश उत्तर भारतीय मजूर हे गावी गेल्याने मेहनतीचे काम असलेली बांधकाम, रेल्वेची खडी रचण्याची कामे, सिमेंट व्लॉक तयार करण्याची कामेही बंद पडली आहेत़४नंदुरबार शहरात सुमारे दीड हजार राजस्थानी कारागीर आहेत़ यातील बहुतांश हे बांधकाम क्षेत्राशी तर ५०० च्या जवळपास कारागीर हे हॉटेल व्यवसायात आहेत़४बांधकाम क्षेत्रातील कारागिर घरी गेले असल्याने अनेकांच्या घरांची काम पूर्ण होवू शकलेली नाहीत़ हे कारागिर रक्षाबंधननंतर परत येतील असा अंदाज आहे़४उत्तर प्रदेशातील बहुतांश कामगार हे बांधकामावर मजूरीसह चौकीदारी, रस्ते काम तसेच इतर मजूरीच्या कामात सक्रीय होते़ हे सर्वच परत गेले आहेत़ मजूरांना येण्यासाठी साधने मिळत नसल्याने त्यांचा म्हणून तेवढा राबता अद्याप नाही़ किमान एक हजारच्या जवळपास कामगार कुटूंबांसह परत येतील़ सोबत बिहारी मजूरही परत येणार आहेत़४हॉटेल्समध्ये सफाई, वेटर तसेच पदार्थ तयार करणाºया राजस्थानी आणि उत्तरप्रदेशातील कामगारांना मोठी मागणी असते़ शहरातील परप्रांतीयांची ७० टक्के खाद्यपदार्थ दुकाने आणि हॉटेल्स यात मनुष्यबळ नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे़ यातून त्यावर आधारित व्यवसायांचिही घडी विस्कटली आहे़