शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

कसा रोखणार कोरोना, कोठेच तपासणी होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजनांना गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

या अनुषंगाने नंदुरबार व शहादा येथील बसस्थानक, नंदुरबार रेल्वे स्थानक आणि खेड दिगर (ता. शहादा) येथील सीमा तपासणी नाक्यावर पाहणी केली असता, उपाययोजनांचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. केवळ नंदुरबार रेल्वे स्थानकावरच येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी होत असल्याचे दिसून आले. उर्वरित ठिकाणी मात्र पुणे, मुंबई, नाशिकसह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या तसेच राज्याबाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कोणतीही तपासणी होत नसल्याचे दिसून आले. यामुळे कोरोना वाढण्याची शक्यता बळावली आहे.

मार्च २०२०मध्ये लाॅकडाऊन सुरु होण्यापूर्वी गुजरात सीमेवरील राज्य सीमा तपासणी नाका व खेडदिगर येथील तपासणी नाका येथे तपासणी होत होती. सुमारे ९ महिने हा उपक्रम सुरु होता. तूर्तास या दोन्ही ठिकाणी तपासण्या बंद आहेत.

जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार प्रवाशांची तपासणी करण्याचे सूचित करण्यात आले होते. परंतु, बसस्थानकांमध्ये येणाऱ्या कोणत्याही बसमधील प्रवाशांची तपासणी होत नाही. दरम्यान, खासगी बसेसमधूनही तेवढ्याच संख्येने प्रवासी येतात. त्यांचीही तपासणी होत नाही.

मोठ्या शहरातून येणाऱ्या प्रवाशांची नियमित तपासणी करणे आवश्यक असतानाही कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून येत आहे. खासगी वाहनांतूनही अनेकजण सर्रासपणे जिल्ह्यात प्रवेश करत आहेत.

प्रवासी उतरुन सरळ घरी जातात

नंदुरबार बसस्थानकातून पुणे, मुंबई, कल्याण, नाशिक, सुरत, अहमदाबाद, पंढरपूर या बसेसच्या नियमित फेऱ्या सुरु आहेत. या बसेस परतल्यानंतर त्यातील प्रवाशांची तपासणी होत नाही. बसमधून उतरल्यानंतर प्रवासी सरळ घरी निघून जातात. दरम्यान, सकाळच्या वेळी शहरात ११ विविध खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस पुणे व मुंबई येथून तपासणीविनाच येतात.

रेल्वे स्थानकात मात्र दक्षता

उधना - जळगाव मार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानक असलेल्या नंदुरबार येथे प्रवाशांची कायम वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने याठिकाणी एमपीडब्ल्यू कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले आहे. तीनजणांच्या या पथकाकडून प्रवासी गाडीतून उतरल्यानंतर प्रत्येक प्रवाशाची तपासणी करुनच त्याला स्थानकाबाहेर सोडले जाते. याठिकाणी हा उपक्रम २४ तास सुरु आहे.

जिल्हा सीमा अक्षरश: वाऱ्यावर

ठाणेपाडा (ता. नंदुरबार), न्याहली (ता. नंदुरबार), हिंगणी, सारंगखेडा व खेडदिगर (ता. शहादा), गव्हाली (ता. अक्कलकुवा) व नवापूर येथील राज्य व जिल्हा सीमेवर गेल्यावर्षी येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरोग्य तपासणी होत होती. परंतु, गेल्या चार महिन्यांत या सीमा अक्षरश: वाऱ्यावर आहेत. या सीमांवर प्रशासनाने नियुक्त केलेला एकही कर्मचारी आढळला नाही.