शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

अजून कितला दिन शाळा बंद रातीन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला ...

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला दिन शाळा बंद रातीन? असा प्रश्न पडत आहे. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सर्व परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असताना अजूनही प्राथमिक शाळा चालू होत नसल्यामुळे असा प्रश्न पालकांना पडणे स्वाभाविक आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्राथमिक शाळेतील वर्ग बंदच आहेत. अजूनही हे वर्ग चालू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा चालू होण्याचे वेध लागले आहे. कारण कोरोनामुळे अजूनही बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, दोन अक्षय तृतीया गेल्या तरी शाळा चालू होत नाहीये. आता कोरोना काळातली सलग दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी शाळा चालू होण्याचे कोणतेच सकारात्मक चिन्हे दिसत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत आहेत.

सलग १८ महिन्यांपासून मुले घरीच बसून आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग चालू झाल्यामुळे अनेक मुले आपापल्या आश्रमशाळेत किंवा बाहेरगावी माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. ही मुले घरीच असल्यामुळे केवळ खेळ खेळूनही कंटाळली आहेत.

शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकही मुले सध्या घरी असल्यामुळे त्यांना कापूस वेचणीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुले शाळा बंद असल्यामुळे वही-पेन, पाटी-पेन्सिल या शैक्षणिक वस्तू हाताळताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणाचे वास्तव चित्र निदर्शनास येत आहे. खेळ खेळण्याबरोबर शेतीकामासोबत मुले गुरे-ढोरे, शेळ्या चारतानाही दुर्गम आदिवासी भागात दिसत आहेत.

देशातील सर्व खासगी, सरकारी कार्यालये चालू आहेत. किराणा दुकाने, मॉल्स, व्यवसाय - उद्योगधंदे सगळे काही सुरळीतपणे चालू आहे. मग शाळा अजूनही का बंद आहेत? असा प्रश्न सध्या ग्रामीण व आदिवासी भागातील निरक्षर व स्मार्टफोनची ओळख नसलेल्या पालकांना पडत आहे. कारण शासन ऑनलाइन शिक्षणाचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभ्यासाची पीडीएफ स्मार्ट फोनवर पाठवत असले तरी अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे आपल्या मुलासाठी अभ्यास आला आहे हेही समजत नाही. किंवा स्मार्ट फोन असल्यासही त्याच्यातील काहीच उमजत नसल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा चालू होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील.