शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

अजून कितला दिन शाळा बंद रातीन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला ...

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला दिन शाळा बंद रातीन? असा प्रश्न पडत आहे. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सर्व परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असताना अजूनही प्राथमिक शाळा चालू होत नसल्यामुळे असा प्रश्न पालकांना पडणे स्वाभाविक आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्राथमिक शाळेतील वर्ग बंदच आहेत. अजूनही हे वर्ग चालू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा चालू होण्याचे वेध लागले आहे. कारण कोरोनामुळे अजूनही बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, दोन अक्षय तृतीया गेल्या तरी शाळा चालू होत नाहीये. आता कोरोना काळातली सलग दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी शाळा चालू होण्याचे कोणतेच सकारात्मक चिन्हे दिसत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत आहेत.

सलग १८ महिन्यांपासून मुले घरीच बसून आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग चालू झाल्यामुळे अनेक मुले आपापल्या आश्रमशाळेत किंवा बाहेरगावी माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. ही मुले घरीच असल्यामुळे केवळ खेळ खेळूनही कंटाळली आहेत.

शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकही मुले सध्या घरी असल्यामुळे त्यांना कापूस वेचणीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुले शाळा बंद असल्यामुळे वही-पेन, पाटी-पेन्सिल या शैक्षणिक वस्तू हाताळताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणाचे वास्तव चित्र निदर्शनास येत आहे. खेळ खेळण्याबरोबर शेतीकामासोबत मुले गुरे-ढोरे, शेळ्या चारतानाही दुर्गम आदिवासी भागात दिसत आहेत.

देशातील सर्व खासगी, सरकारी कार्यालये चालू आहेत. किराणा दुकाने, मॉल्स, व्यवसाय - उद्योगधंदे सगळे काही सुरळीतपणे चालू आहे. मग शाळा अजूनही का बंद आहेत? असा प्रश्न सध्या ग्रामीण व आदिवासी भागातील निरक्षर व स्मार्टफोनची ओळख नसलेल्या पालकांना पडत आहे. कारण शासन ऑनलाइन शिक्षणाचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभ्यासाची पीडीएफ स्मार्ट फोनवर पाठवत असले तरी अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे आपल्या मुलासाठी अभ्यास आला आहे हेही समजत नाही. किंवा स्मार्ट फोन असल्यासही त्याच्यातील काहीच उमजत नसल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा चालू होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील.