शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

अजून कितला दिन शाळा बंद रातीन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला ...

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला दिन शाळा बंद रातीन? असा प्रश्न पडत आहे. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सर्व परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असताना अजूनही प्राथमिक शाळा चालू होत नसल्यामुळे असा प्रश्न पालकांना पडणे स्वाभाविक आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्राथमिक शाळेतील वर्ग बंदच आहेत. अजूनही हे वर्ग चालू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा चालू होण्याचे वेध लागले आहे. कारण कोरोनामुळे अजूनही बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, दोन अक्षय तृतीया गेल्या तरी शाळा चालू होत नाहीये. आता कोरोना काळातली सलग दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी शाळा चालू होण्याचे कोणतेच सकारात्मक चिन्हे दिसत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत आहेत.

सलग १८ महिन्यांपासून मुले घरीच बसून आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग चालू झाल्यामुळे अनेक मुले आपापल्या आश्रमशाळेत किंवा बाहेरगावी माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. ही मुले घरीच असल्यामुळे केवळ खेळ खेळूनही कंटाळली आहेत.

शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकही मुले सध्या घरी असल्यामुळे त्यांना कापूस वेचणीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुले शाळा बंद असल्यामुळे वही-पेन, पाटी-पेन्सिल या शैक्षणिक वस्तू हाताळताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणाचे वास्तव चित्र निदर्शनास येत आहे. खेळ खेळण्याबरोबर शेतीकामासोबत मुले गुरे-ढोरे, शेळ्या चारतानाही दुर्गम आदिवासी भागात दिसत आहेत.

देशातील सर्व खासगी, सरकारी कार्यालये चालू आहेत. किराणा दुकाने, मॉल्स, व्यवसाय - उद्योगधंदे सगळे काही सुरळीतपणे चालू आहे. मग शाळा अजूनही का बंद आहेत? असा प्रश्न सध्या ग्रामीण व आदिवासी भागातील निरक्षर व स्मार्टफोनची ओळख नसलेल्या पालकांना पडत आहे. कारण शासन ऑनलाइन शिक्षणाचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभ्यासाची पीडीएफ स्मार्ट फोनवर पाठवत असले तरी अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे आपल्या मुलासाठी अभ्यास आला आहे हेही समजत नाही. किंवा स्मार्ट फोन असल्यासही त्याच्यातील काहीच उमजत नसल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा चालू होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील.