शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

अजून कितला दिन शाळा बंद रातीन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:35 IST

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला ...

जयनगर : सध्या सगळीकडे ऑनलाइन शिक्षणाचा उदो उदो होत असताना शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील पालकांना अजून कितला दिन शाळा बंद रातीन? असा प्रश्न पडत आहे. सध्या जिल्ह्यासह शहादा तालुक्यात सर्व परिस्थिती ‘ऑल इज वेल’ असताना अजूनही प्राथमिक शाळा चालू होत नसल्यामुळे असा प्रश्न पालकांना पडणे स्वाभाविक आहे.

मार्च २०२० पासून कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून प्राथमिक शाळेतील वर्ग बंदच आहेत. अजूनही हे वर्ग चालू होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकांना आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा चालू होण्याचे वेध लागले आहे. कारण कोरोनामुळे अजूनही बंद असलेल्या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, दोन अक्षय तृतीया गेल्या तरी शाळा चालू होत नाहीये. आता कोरोना काळातली सलग दुसरी दिवाळी तोंडावर आली तरी शाळा चालू होण्याचे कोणतेच सकारात्मक चिन्हे दिसत नसल्यामुळे पालक आपल्या मुलांच्या भवितव्याबाबत खूपच चिंतेत आहेत.

सलग १८ महिन्यांपासून मुले घरीच बसून आहेत. आठवी ते बारावीचे वर्ग चालू झाल्यामुळे अनेक मुले आपापल्या आश्रमशाळेत किंवा बाहेरगावी माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जात आहेत. मात्र, पहिली ते सहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अजूनही अंधारातच आहे. ही मुले घरीच असल्यामुळे केवळ खेळ खेळूनही कंटाळली आहेत.

शहादा तालुक्यातील ग्रामीण तसेच आदिवासी गावातील पालकही मुले सध्या घरी असल्यामुळे त्यांना कापूस वेचणीसाठी घेऊन जाताना दिसत आहेत. ग्रामीण तसेच आदिवासी भागातील मुले शाळा बंद असल्यामुळे वही-पेन, पाटी-पेन्सिल या शैक्षणिक वस्तू हाताळताना दिसत नसल्याचे अनेक ठिकाणाचे वास्तव चित्र निदर्शनास येत आहे. खेळ खेळण्याबरोबर शेतीकामासोबत मुले गुरे-ढोरे, शेळ्या चारतानाही दुर्गम आदिवासी भागात दिसत आहेत.

देशातील सर्व खासगी, सरकारी कार्यालये चालू आहेत. किराणा दुकाने, मॉल्स, व्यवसाय - उद्योगधंदे सगळे काही सुरळीतपणे चालू आहे. मग शाळा अजूनही का बंद आहेत? असा प्रश्न सध्या ग्रामीण व आदिवासी भागातील निरक्षर व स्मार्टफोनची ओळख नसलेल्या पालकांना पडत आहे. कारण शासन ऑनलाइन शिक्षणाचा दावा करत असली तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील परिस्थिती मात्र, खूपच वेगळी आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षक अभ्यासाची पीडीएफ स्मार्ट फोनवर पाठवत असले तरी अनेक पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे आपल्या मुलासाठी अभ्यास आला आहे हेही समजत नाही. किंवा स्मार्ट फोन असल्यासही त्याच्यातील काहीच उमजत नसल्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात शाळा चालू होत नाही, तोपर्यंत त्यांच्या मुलांचे भवितव्य अंधारातच राहील.