शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पुणे रेल्वेचे रडगाणे आणखी किती दिवस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

मनोज शेलार वर्षानुवर्षांपासून मागणी असलेल्या नंदुरबारमार्गे पुणे रेल्वेची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात आली असताना अचानक माशी शिंकली आणि स्वप्नपूर्ती होता होता ...

मनोज शेलार

वर्षानुवर्षांपासून मागणी असलेल्या नंदुरबारमार्गे पुणे रेल्वेची स्वप्नपूर्ती दृष्टीपथात आली असताना अचानक माशी शिंकली आणि स्वप्नपूर्ती होता होता राहिली. पुणे रेल्वेचे रडगाणे थेट रेल्वेमंत्र्यांपासून ते स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, रेल्वे सल्लागार समिती यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी गायिले आहे. परंतु रेल्वेने मात्र जिल्हावासीयांच्या मागणीला थारा दिलेला नाही. गेल्या आठवड्यात अशी रेल्वे सुरू होणार असल्याचे विविध माध्यमातून पुढे आले. परंतु लागलीच पश्चिम रेल्वेने अशी कुठलीही प्रवासी रेल्वे सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले आणि जिल्हावासीयांचा हिरमोड झाला.

नंदुरबार रेल्वेस्थानक हे पश्चिम रेल्वेच्या ताप्ती सेक्शनवरील मध्यवर्ती आणि मोठे स्थानक आहे. या मार्गावरील सर्वच रेल्वे गाड्यांना येथे थांबा आहे. दुहेरीकरणामुळे नंदुरबार स्थानकाचे महत्त्वदेखील वाढले आहे. त्यामुळे नंदुरबारमधून किंवा नंदुरबारमार्गे मुंबई आणि पुण्यासाठी रेल्वेसेवा सुरू करावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे. मुंबईसाठी एक एक्सप्रेस या मार्गाने सुरू झाली आहे. परंतु त्या एक्सप्रेसची वेळ नंदुरबारकरांना सोयीची होणारी नसल्याने फारसा प्रतिसाद नाही. पुण्यासाठीच्या एक्सप्रेसची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कुटुंबे नोकरी निमित्ताने पुण्यात स्थायिक झाली आहेत. अनेक विद्यार्थी पुणे येथे शिक्षण घेत आहेत. रोजगारासाठी अनेकजण स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पुण्याशी नंदुरबारकरांची नाळ मोठ्या प्रमाणावर जोडली गेली आहे. परिणामी प्रवासी संख्यादेखील वाढतच आहे. नंदुरबार व शहादा येथून दररोज आठ ते दहा खासगी लक्झरी बसेस पुण्यासाठी जातात. याशिवाय चारही आगारातील पाच ते सात एसटी बसेसदेखील पुण्याला जातात. त्यामुळे प्रवासी संख्या लक्षात घेता प्रवासी रेल्वे सुरू केल्यास मोठी सोय होणार आहे. परंतु आर्थिकदृष्ट्या प्रवासी रेल्वे परवडणारी नसल्याने या मागणीकडे रेल्वेने फारसे लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे. नंदुरबारहून सुरत, वसईमार्गे ही सेवा परवडू शकते. परंतु ते होणे शक्य नाही. त्यामुळे सुरतहून नंदुरबार, जळगाव, मनमाड, दौंडमार्गे पुणे ही रेल्वे सुरू करणे शक्य आहे. नंदुरबार ते पुणे रेल्वेने या मार्गाने अंतर जवळपास ६०० किलोमीटरपेक्षा अधिक जाते. जरी अशी रेल्वे सुरू झाली तरी तिची वेळ मात्र नंदुरबारकरांना सोयीची ठरेलच असे नाही. येत्या काळात ही रेल्वे सुरू होण्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीने प्रयत्नही सुरू आहेत.

पुणे रेल्वेप्रमाणेच नंदुरबारकरांसाठी दिल्ली कनेक्टीव्हीटीची रेल्वे देखील आवश्यक आहे. ताप्ती सेक्शनमार्गावर दिल्ली कनेक्ट एकही रेल्वे नाही. उत्तर भारतात जाणाऱ्या आठ ते दहा प्रवासी गाड्या या उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जाणाऱ्या आहेत. दिल्लीला जाण्याकरीता एकतर सुरत किंवा भुसावळ येथे जावे लागते. तेथून दिल्ली कनेक्ट एक्सप्रेस मिळवावी लागते. उत्तर प्रदेश किंवा बिहारमध्ये जाणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग दिल्लीमार्गे वळविला तर ते मोठे सोयीचे ठरणार आहे.

मनमाड-इंदूर रेल्वे लाईन झाल्यास नंदुरबारची कनेक्टीव्हीटी देशातील चारही कोपऱ्यांना होणार असे बोलले जात आहे. परंतु या रेल्वेमार्गाचे स्वप्न या पिढीच्या काळात पूर्ण होणे शक्य नाही अशीच एकंदर स्थिती आहे. त्यापेक्षा धुळे-नरडाणा हा ३५ किलोमीटरचा रेल्वे मार्ग जरी केला तरी ते मोठे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे पुणे किंवा हैद्राबाद व पुढे देशातील पूर्व भागात जाण्यासाठी जळगाव, चाळीसगाव असा फेरा मारणे टळून थेट नरडाणा, धुळेमार्गे चाळीसगाव असा शॉर्टकट मार्ग ताप्तीसेक्शनला मिळणार आहे. त्यामुळे धुळे-नरडाणा या मार्गासाठी आधी आग्रही राहिले पाहिजे.

एकूणच नंदुरबारमार्गे पुणे व दिल्ली कनेक्टीव्हीटी होणे आवश्यक आहे. त्याकरिता लोकप्रतिनिधींनीही दबाव टाकून या मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा जिल्हावासीयांची आहे.