शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

निधीमुळे आवास योजनांना आला वेग : अक्कलकुवा तालुक्यात स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 12:57 IST

प्रधानमंत्री आवाससाठी 11 हजार लाभार्थी निधीमुळे आवास योजनांना आला वेग

लोकमत ऑनलाईनअक्कलकुवा, दि़ 19 : तालुक्यातील विविध 11 हजारांच्यावर लाभार्थीनी गेल्या 10 वर्षात आवास योजनांचा लाभ घेतला असून 2017-18 या आर्थिक वर्षात तब्बल 3 हजार 461 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत़ शबरी आवास, रमाई घरकूल आणि प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थीनी सहभाग घेतला आह़े पंचायत समितीकडून दुर्गम व अतिदुर्गम भागात आवास योजना यशस्वी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत़ लाभार्थीना घरकूल मंजूर झाल्यानंतर पहिला आणि दुसरा हप्ता मिळाल्यानंतर पुढील हप्त्यांसाठी  फिरफिर करावी लागत असल्याने  जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी व मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी निधी येताच लाभार्थीच्या खात्यात वर्ग करण्याचे म्टटले होत़े पंचायत समितीने यानुसार कामकाज करत आलेला निधी लाभार्थीच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केल्याने योजना मार्गी लागली आह़े प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2017-18 या वर्षात पंचायत समितीला 3 हजार 44 घरे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होत़े याअंतर्गत 5 हजार 664 लाभार्थीनी अर्ज केले होत़े यात एकूण 3 हजार 113 लाभार्थीच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती़ योजनेला संपूर्ण वर्षात निधीचा पुरवठा झाल्याने लाभार्थीना मंजुरी देण्यात आलेल्या 1 लाख 20 हजार रुपयांच्या निधीचे पाच हप्ते पुरवण्यात आले होत़े यात 2 हजार 892 लाभार्थीना पहिला, 1 हजार 849 लाभार्थीना दुसरा, तर 20 लाभार्थीना तिसरा हप्ता वितरित करण्यात आला आह़े तालुक्यात 67 ग्रामपंचायत  क्षेत्रात या योजनेसाठी निधी वितरित करण्यात आला होता़ लाभार्थीच्या बँक खात्यावर वेळोवेळी घरबांधकामासाठी रक्कम मिळत गेल्याने बहुतांश लाभार्थीची घरे पूर्ण झाली आह़े तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 3 हजार 661 घरांना निधी देण्यात आला होता़ या सर्व घरांना निधी देण्यात आल्यानंतर घरे पूर्ण झाली होती़ एप्रिल 2017 पासून सुरू झालेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिक अहवालात 372 घरे बांधून पूर्ण झाल्याची माहिती आह़े