शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

नंदुरबारात गॅस लिकेजमुळे घर जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गॅस लिकेज झाल्याने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना नंदुरबारातील देसाईपुरा भागात शनिवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गॅस लिकेज झाल्याने लागलेल्या आगीत घर जळून खाक झाल्याची घटना नंदुरबारातील देसाईपुरा भागात शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान, नागरिकांनी मदतकार्य करून आगीवर नियंत्रण मिळविले.देसाईपुरा भागात विजय प्रकाश चौधरी यांच्या मालकीचे घर आहे. हे घर त्यांनी भाडय़ाने दिले आहे. भाडेकरू बाहेर गेले असता अचानक गॅस लिकेज झाला. सायंकाळी घरातील महिला आली असता दिवाबत्तीसाठी त्यांनी काडीपेटी पेटवताच सिलिंडरने लागलीच पेट घेतला. क्षणार्धात सिलिंडर उंच उडून छताला ठोकला गेला. महिला वेळीच बाहेर निघाल्याने जीवीत हाणी झाली नाही. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. परिणामी घरातील सर्व सामान जळून खाक झाला. स्थानिक नागरिकांनी मिळेल त्या साधनांनी आगीवर नियंत्रण मिळविले. पालिकेचा अगिAशमन बंब देखील लागलीच घटनास्थळी दाखल झाला. परंतु अरुंद गल्ली असल्यामुळे अडथळे येत होते. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेवून बंदोबस्त ठेवला. रात्री उशीरार्पयत पोलिसातत अगिAउपद्रवान्वये नोंद करण्याचे काम सुरू होते.प्रकाशा येथे घरातत साठवलेला कापूस जळालाजिल्हा परिषद सदस्य रामचंद्र पाटील यांच्या नवीन घरात साठवलेला कापसाला लागलेल्या आगीत 15 ते 20 क्विंटल कापूस जळून खाक झाला. दरम्यान, ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य केल्याने सुमारे सव्वाशे क्विंटल आगीपासून वाचला.सकाळी 11 वाजता घरातून धूर निघत असल्याचे काही जणांच्या लक्षात आले. तातडीने लागलीच कापूस काढण्यास सुरुवात करण्यात आली. ग्रामस्थांनी देखील धाव घेतली. या ठिकाणी तब्बल दीडशे क्विंटल कापूस ठेवण्यात आला   होता. आगीने रौद्र रूप धारण केले असते तर मोठा अनर्थ झाला      असता. परंतु ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर लावून लागलीच कापूस घरातून काढण्यात आला. आगीत 15 ते 20 क्विंटल कापूस जळाल्याचे सांगण्यात आले.  प्रकाशाचे मंडलाधिकारी बी.ओ.पाटील व तलाठी डी.एम.चौधरी यांनी पाहणी करून सदर माहिती तहसीलदार यांना दिली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. उशीरार्पयत पोलिसात नोंद झाली नव्हती.