शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

शहरात साडेपाच तास भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 09:55 IST

ग्रामिण भागातही जनता हैराण : अनेक घटकांवार परिणाम, पिकांनाही फटका

ठळक मुद्देकजर्माफीचे अर्ज भरण्यासाठीही त्रासदायक.. सध्या शेतकरी कजर्माफीसाठी ग्रामिण भागात महाईसेवा केंद्र, आपले सरकार व इतर ठिकाणी कजर्माफीचे अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागत आहेत. अशा वेळीच वीज पुरवठा खंडित होत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात भारनियमनाचा जाच सुरू झाला आहे. ऐन भाद्रपद हिटमध्येच नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात किमान तीन ते साडेपाच तास भारनियमन केले जात आहे. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भारनियमन न करता दिवसातून दोन टप्प्यात ते केले जात आहे. दरम्यान, ग्रामिण भागात पाच ते 11 तास भारनियमन सुरू असून यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षभरात भारनियमन जवळपास बंदच केले होते. ग्रामिण भागात मात्र पाच ते सात तास भारनियमन काही फिडरवरून सुरू होते. आता मात्र, विजेचा तुटवडा जाणवू लागल्याने आणि मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे शहरीसह ग्रामिण भागातही मोठय़ा प्रमाणावर वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता हे भारनियमन गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. शहरी भागात साडेपाच तासनंदुरबार शहरात एकुण आठ फिडर आहेत. त्यातील वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण शिवाय वीज बील वसुलीचे प्रमाण याचा सरासरी विचार करून या फिडरांना ए.बी.सी. व डी. अशा कॅटेगरीत विभागण्यात आले आहे. नंदुरबारात ए. कॅटेगरीमध्ये एकही फिडर नाही तर बी. कॅटेगरीमध्ये एक, सी. मध्ये पाच तर डी. मध्ये दोन फिडर आहेत. यानुसार बी फिडरमध्ये किमान तीन तास भारनियमन केले जात आहे. सी कॅटेगरीमधील फिडरवरून पावणेचार तास तर डी कॅटेगरीमधील फिडरमधून साडेपाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. एकाच वेळी भारनियमन न करता सकाळ व दुपार अशा दोन भागात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी डी कॅटेगरीच्या फिडरमधील नागरिकांना साडेपाच तास भारनियमनाच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.ग्रामिण भागातही..ग्रामिण भागात देखील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. किमान पाच व जास्तीत जास्त 11 तासांचे भारनियमन ग्रामिण भागात सहन करावे लागत आहे. अनेक भागात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे शेतक:यांना विहिर, कुपनलिकांद्वारे पाणी द्यावे लागत आहे. अशा वेळी वीजपुरवठा राहत नसल्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता  आहे. अनेक समस्यागेल्या वर्ष, दिड वर्षापासून शहरी भागात भारनियमन केले जात नव्हते. त्यामुळे अनेकांच्या इन्व्हर्टचा उपयोग होत नसल्यामुळे ते बंद किंवा बॅटरी डिस्चार्ज अवस्थेत होत्या. आता अचानक भारनियमन सुरू केल्यामुळे नादुरूस्त इन्व्हर्टर आणि बॅटरीमुळे अनेकांना अंधारात राहावे लागत आहे. विशेषत: शासकीय कार्यालयांमधील अशा प्रकारची स्थिती दिसून येत  आहे.वीज वितरण कंपनीच्या बसस्थानकासमोरील कार्यालयात बुधवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास विजेअभावी कर्मचा:यांना अंधारात काम करावे लागत असल्याचे चित्र होते. अशीच स्थिती इतर शासकीय कार्यालयांची होती. संगणकांची बॅटरी बॅकअप देखील कमी राहत असल्यामुळे कामकाजही ठप्प होत आहे. काही कार्यालयांमध्ये डिङोल जनरेटर असले तरी सध्या डिङोलचे भाव देखील वाढल्याने ते घेण्यासाठी तेवढी शासकीय तरतूद होत नसल्यामुळे अशा जनरेटरचाही फायदा होत नसल्याची स्थिती     आहे. ग्रामिण भागातील लहान, मोठय़ा उद्योगांना या भारनियमनाचा फटका बसत आहे.