शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

शहरात साडेपाच तास भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 09:55 IST

ग्रामिण भागातही जनता हैराण : अनेक घटकांवार परिणाम, पिकांनाही फटका

ठळक मुद्देकजर्माफीचे अर्ज भरण्यासाठीही त्रासदायक.. सध्या शेतकरी कजर्माफीसाठी ग्रामिण भागात महाईसेवा केंद्र, आपले सरकार व इतर ठिकाणी कजर्माफीचे अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे अनेक ठिकाणी रांगा लागत आहेत. अशा वेळीच वीज पुरवठा खंडित होत

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरासह जिल्ह्यात भारनियमनाचा जाच सुरू झाला आहे. ऐन भाद्रपद हिटमध्येच नागरिकांना विजेच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरी भागात किमान तीन ते साडेपाच तास भारनियमन केले जात आहे. एकाच वेळी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भारनियमन न करता दिवसातून दोन टप्प्यात ते केले जात आहे. दरम्यान, ग्रामिण भागात पाच ते 11 तास भारनियमन सुरू असून यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वीज वितरण कंपनीने गेल्या वर्षभरात भारनियमन जवळपास बंदच केले होते. ग्रामिण भागात मात्र पाच ते सात तास भारनियमन काही फिडरवरून सुरू होते. आता मात्र, विजेचा तुटवडा जाणवू लागल्याने आणि मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळे शहरीसह ग्रामिण भागातही मोठय़ा प्रमाणावर वीज भारनियमन सुरू करण्यात आले आहे. कुठलीही पूर्वसुचना न देता हे भारनियमन गेल्या तीन दिवसांपासून सुरू करण्यात आले आहे. शहरी भागात साडेपाच तासनंदुरबार शहरात एकुण आठ फिडर आहेत. त्यातील वीज चोरी आणि गळतीचे प्रमाण शिवाय वीज बील वसुलीचे प्रमाण याचा सरासरी विचार करून या फिडरांना ए.बी.सी. व डी. अशा कॅटेगरीत विभागण्यात आले आहे. नंदुरबारात ए. कॅटेगरीमध्ये एकही फिडर नाही तर बी. कॅटेगरीमध्ये एक, सी. मध्ये पाच तर डी. मध्ये दोन फिडर आहेत. यानुसार बी फिडरमध्ये किमान तीन तास भारनियमन केले जात आहे. सी कॅटेगरीमधील फिडरवरून पावणेचार तास तर डी कॅटेगरीमधील फिडरमधून साडेपाच तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. एकाच वेळी भारनियमन न करता सकाळ व दुपार अशा दोन भागात भारनियमन केले जात आहे. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळाला असला तरी डी कॅटेगरीच्या फिडरमधील नागरिकांना साडेपाच तास भारनियमनाच्या जाचाला सामोरे जावे लागत आहे.ग्रामिण भागातही..ग्रामिण भागात देखील गेल्या पाच ते सहा दिवसांपासून मोठय़ा प्रमाणावर भारनियमन केले जात आहे. किमान पाच व जास्तीत जास्त 11 तासांचे भारनियमन ग्रामिण भागात सहन करावे लागत आहे. अनेक भागात पावसाने ताण दिला आहे. त्यामुळे शेतक:यांना विहिर, कुपनलिकांद्वारे पाणी द्यावे लागत आहे. अशा वेळी वीजपुरवठा राहत नसल्यामुळे पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता  आहे. अनेक समस्यागेल्या वर्ष, दिड वर्षापासून शहरी भागात भारनियमन केले जात नव्हते. त्यामुळे अनेकांच्या इन्व्हर्टचा उपयोग होत नसल्यामुळे ते बंद किंवा बॅटरी डिस्चार्ज अवस्थेत होत्या. आता अचानक भारनियमन सुरू केल्यामुळे नादुरूस्त इन्व्हर्टर आणि बॅटरीमुळे अनेकांना अंधारात राहावे लागत आहे. विशेषत: शासकीय कार्यालयांमधील अशा प्रकारची स्थिती दिसून येत  आहे.वीज वितरण कंपनीच्या बसस्थानकासमोरील कार्यालयात बुधवारी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास विजेअभावी कर्मचा:यांना अंधारात काम करावे लागत असल्याचे चित्र होते. अशीच स्थिती इतर शासकीय कार्यालयांची होती. संगणकांची बॅटरी बॅकअप देखील कमी राहत असल्यामुळे कामकाजही ठप्प होत आहे. काही कार्यालयांमध्ये डिङोल जनरेटर असले तरी सध्या डिङोलचे भाव देखील वाढल्याने ते घेण्यासाठी तेवढी शासकीय तरतूद होत नसल्यामुळे अशा जनरेटरचाही फायदा होत नसल्याची स्थिती     आहे. ग्रामिण भागातील लहान, मोठय़ा उद्योगांना या भारनियमनाचा फटका बसत आहे.