शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
2
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
3
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
4
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
5
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
6
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
7
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
8
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
9
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
10
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
11
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
12
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
13
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
14
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
15
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
16
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
17
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
18
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
19
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
20
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

उष्ण वा:याच्या झळांनी केळी उत्पादक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : सातत्याने खोलवर जात असलेल्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीने वैतागलेल्या शेतक:यांपुढे आता वेगाने वाहणा:या उष्ण वा:यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सातत्याने खोलवर जात असलेल्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीने वैतागलेल्या शेतक:यांपुढे आता वेगाने वाहणा:या उष्ण वा:यांनी संकट उभे केलं आहे. कारण या वा:यांनी शेतक:यांच्या परीपक्वकेळीच्या बागा उध्वस्त केल्याचे चित्र आहे. विशेषत: मोड, बोरद, तळवे, आमलाड, प्रतापपूर, मोहीदा परिसरातील बागांना याचा फटका बसल्याचे म्हटले जात आहे. शेतक:यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिरावल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत करावी, अशी या नुकसानग्रस्त शेतक:यांची मागणी आहे.गेल्या वर्षी तळोदा तालुक्यात सरासरीच्या 50 टक्केही पाऊस झाला नाही. तरीही ज्या ठिकाणी पुरेसे पाणी होते अशा ठिकाणी शेतक:यांनी केळी, पपई या सारखी नगदी पिके लावलीत. साधारण तीन ते चारे हेक्टर क्षेत्रात लावणी करण्यात आली आहे. त्यातही केळीचे क्षेत्र अधिक आहे. दिवाळीपासूनच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. त्यातही मार्चपासूनच भूगर्भातील पाण्याचा पातळीत घट होत आहे. त्यातही मार्चपासूनतर ती पार खोलवर गेली आहे. कुपनलिकेत कृषीपंपाचे पाईप खाली उतरवून शेतकरी प्रचंड वैतागला आहे. अशा विदारक स्थितीत कसे बसे केळीचे पीक वाचवून परिपक्वतेच्या मार्गावर नेले आहे. परंतु अलिकडे 45 डिग्री तापमानाबरोबरच वेगवान उष्णवारे सुरू झाल्यामुळे त्याचा फटका केळीच्या बागांना बसत आहे. कारण वा:यांमुळे निसवाड झालेली केळीची झाडे मोडून पडत आहेत. विशेषत: कढेल, खेडला, मोड, बोरद, तळवे, आमलाड, मोहिदा, प्रतापपूर भागात हा प्रकार अधिक दिसून येत असल्याचे म्हटले जात आहे. कुठे 20 टक्के, कुठे 50 तर कुठे 17 टक्के बागांना याचा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.वास्तविक अत्यंत दुष्काळी परिस्थितीतही शेतक:यांना सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन पीक वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे त्याच्या माथी कर्जाचा बोजा वाढला आहे. आधीच खरीप हंगामातील इतर पिकांच्या घटीचा फटका त्याला बसला होता. यातून कसा बसा सावरत केळीवर आशा पल्लवीत होत्या. तथापि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका त्यांना बसल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली. प्रशासनाने याप्रकरणी दखल घेऊन अशा शेतक:यांची चौकशी करून आपल्या महसुली कर्मचा:यांना पंचनाम्याचे आदेश देऊन शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी शेतक:यांची मागणी आहे.गेल्या सात ते आठ दिवसांपासून सुरू असलेल्या वेगवान उष्ण वा:यांमुळे तालुक्यातील कढेल शिवारातील रामदास फकिरा शिंदे या शेतक:यांची परिपक्वझालेली केळीची बाग भुईसपाट झाली आहे. साधारण तीन एकर क्षेत्र होते. त्यातील 70 टक्के पिकाला वा:याचा फटका बसला आहे. या शेतक:याने टिश्यूचे बी आणून लागवड केली होती. त्यात महागडय़ा रासायनिक खतांचा वापर केला होता. पाण्याचेही सुयोग्य नियोजन करून केळीची बाग फुलविली होती. साधारण तीन लाख रुपये खर्च केला होता. मात्र निसर्गाच्या आपदेमुळे संपूर्ण खर्च वाया गेला आहे. निदान शासनाने तरी आर्थिक मदत द्यावी, अशी शेतक:यांची अपेक्षा आहे.