शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बेघरांना घरकुलांची प्रतिक्षा कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 11:17 IST

876 घरकुलांचे काम पुर्ण : लाभार्थी निवड करून वाटप करणार

ठळक मुद्देप्रधानमंत्री आवास योजना.. 4केंद्र सरकारने आता बेघरांसाठी नवीन योजना आणली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील बेघरांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यात दारिद्रय रेषेखालील, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पालिकेच्या 876 घरकुलांच्या वाटपाची अद्यापही प्रतिक्षा लागून आहे. घरकुलांचे काम जवळपास पुर्ण झाले असून पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आतच त्यांचे वाटप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पालिकेने लाभार्थ्ीची यादी निश्चित करतांना काही निकष ठरविले आहेत.        नंदुरबारातील बेघर लोकांना घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी दीड हजार घरकुलांचा प्रस्ताव पालिकेने पाठविला होता. त्यापैकी 1176 घरकुले बांधकाम प्रस्तावीत होते. प्रत्यक्षात 876 घरकुलांना मंजुरी मिळून त्यासाठी अनुदान दाखल झाले होते. घरकुलांच्या बांधकामासाठी जिल्हा प्रशासनाने नंदुरबारातील जिल्हा रुग्णालयासमोरील जागा तसेच धुळे रस्त्यावरील भोणे फाटय़ानजीकची जागा दिली होती. त्या ठिकाणी चार मजली इमारतीत घरकुलांचे बांधकाम करण्यात आले. परंतु मध्यंतरी अर्थात दीड वर्षापूर्वी बेघर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अनेकांनी या घरांचा ताबा घेतला होता. त्यामुळे पालिकेला मोठी कसरत करावी लागली होती. पालिकेतर्फे यापूर्वी शहरातील फोटोपास धारक झोपडपट्टीवासीयांना घरकुलांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी तीन ते चार वेळा मुदतवाढही देण्यात आली. परंतू फारसा प्रतिसाद मिळाला नाही. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा:या कुटूंबाचे घर ज्या भागात असेल ती जागा पालिकेच्या ताब्यात द्यावी लागणार होती. शिवाय लाभार्थी हिस्सा म्हणून 10 ते 12 हजार रुपये देखील भरावे लागणार होते. त्यामुळे या योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला होता.घरकुलांचा ताबादिड वर्षापूर्वी जवळपास 800 जणांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. बेघर संघर्ष समितीने आपल्या यादीनुसारच लाभार्थ्ीची निवड करावी अशी मागणी केली होती. परंतु पालिकेने काही नियम व अटी लक्षात घेवून लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला घरकुल मिळणार नाही असा समज करून अनेकांनी या घरकुलांचा ताबा घेतला होता. त्या ठिकाणी अनेक कुटूंबे जवळपास वर्षभर राहिली होती. पालिकेने पोलीस बळाचा वापर करूनही संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली नव्हती. अखेर जिल्हाधिका:यांनी मध्यस्थी करीत आणि पालिकेने पात्र लाभार्थ्ीनाच घरकुले दिली जातील असे जाहीर केल्यानंतर संबधीत कुटूंबे घरातून बाहेर निघाली आणि ताबा सोडला.काम पुर्णजवळपास एक वर्ष अनेक कुटूंबांनी या घरकुलांचा ताबा घेतलेला होता. त्यामुळे अपुर्ण कामे पुर्ण करता येत नव्हती. अखेर ताबा सोडल्यानंतर ठेकेदाराने तातडीने उर्वरित कामे पुर्ण केली. त्यात नळ फिटींग, किचन, लाईट फिटींग, रंगकाम आणि इतर कामांचा समावेश होता. ते आता पुर्ण करण्यात आले असून लवकरच ठेकेदार ही घरकुले पालिकेच्या ताब्यात देणार असल्याचे सांगण्यात आले.