शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

जाचक अटींमुळे होमगार्ड जवान हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 12:12 IST

जिल्हाधिका:यांना निवेदन : कवायतीला अनुपस्थितीचे कारण देत 50 जवानांची सेवा समाप्त

नंदुरबार : होमगार्डसना कमी मानधन असूनही जास्त काम करावे लागते. अर्थात 40 टक्के कवायत आणि 40 टक्के बंदोबस्त अशा जाचक अटी घालून होमगार्ड जवानांना वेठीस धरले जात असल्याची खंत होमगार्ड जवानांनी जिल्हाधिका:यांकडे व्यक्त केली आहे.याबाबत दिलेल्या निवेदनात होमगार्ड जवानांनी आपल्या व्यथा व वेदना मांडल्या आहेत. होमगार्ड संघटनेची स्थापना 1946 मध्ये झाली. 71 वर्षापासून हे जवान मानधन तत्वावर काम करतात. होमगार्डच्या राज्याच्या महासमादेशकांनी 1 जानेवारी 2016 पासून नवीन नियम लागू केले. त्यामुळे नंदुरबारसह जिल्ह्यातील 90 टक्के व राज्यातील हजारो होमगार्डस्चे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.नंदुरबार पथकातील 50 होमगार्डला आठ ते 10 दिवसांच्या कालावधीत 40 टक्के परेड व 50 टक्के बंदोबस्ताच्या नावाखाली जाचक अटी लादून कमी केले.               त्यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वेळोवेळी बंदोबस्तात हजरदेखील झालेलो आहोत.  मानसेवी असल्याकारणाने आम्हा होमगार्डसना दुय्यम व्यवसाय करावा लागतो. जर आम्ही आजच्या स्थितीत पूर्णवेळ संघटनेकरीता दिला असता तर आमचे कुटुंब उघडय़ावर पडले असते. ही परिस्थिती निर्माण होऊ नये, या कारणाने आम्ही 40 टक्के        कवायत असो किंवा 40 टक्के बंदोबस्त अशा महासमादेशकांच्या जाचक अटी नियमांना बळी            ठरलो.होमगार्ड संघटनेत भरती होताना सांगण्यात येते की, तुम्हाला तुमचे काम करून जो वेळ मिळेल, त्यात देशसेवा म्हणून बंदोबस्त करा. जर एखादा होमगार्ड खाजगी अथवा शासकीय ठिकाणी कामाला असेल तर तो 40 टक्के कवायत व 40 टक्के बंदोबस्त करू शकत नाही. नंदुरबार जिल्ह्यात तीन वर्षात फक्त एक ते दोन उजळणी शिबिरे, अल्प काळाची अन् अल्प सूचनेने झाली. त्यामुळे शिबिर करता आले नाही.होमगार्डस्ना पोलीस भरतीतील नियमाप्रमाणे 1600 मीटर धावणे, गोळाफेक बंधनकारक आहे. जे होमगार्डस नवीन अथवा जवान आहेत ते मैदानी चाचणी देवू शकतात. परंतु ज्यांची 10 ते 25 वर्षे देशसेवा              झाली आहे व करीत आहेत असे होमगार्ड मैदानी चाचणीत कसे          उत्तीर्ण होणार?, पोलीस ही  शासनाची पगारी सुविधा घेणारी शासनाची बांधिल संघटना आहे. त्यांची तुलना आमच्या 400 रुपये मानधन घेणा:या संघटनेशी कशी करू शकता?महसमादेशकांनी ज्या नियमांनी होमगार्डना कमी केले आहे ते नियम सध्या त्यांच्यावर न लावता त्यांना परत कामावर घ्यावे. यापुढे तीन वर्षानी त्यांच्यावर ते नियम लावावेत, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नियम पालनात झालेली चूक सुधारण्यास संधी मिळेल व होमगार्डलादेखील शाश्वती वाटेल.