शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सुकामेव्यासह ५० दिवसांचा किराणा किट मिळाले घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक पोषक घटक असलेला शिधा ५० दिवसांसाठी वाटप करण्यात आला आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाने हा उपक्रम जिल्ह्यात राबविला आहे.अमृत आहार योजनेअंतर्गत स्तनदा, गरोदर माता आणि सहा महिने ते सहा वर्षाच्या बालकांना पुरक पोषण आहार दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मात्र, आहार देण्याऐवजी थेट शिधा दिला जात आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने उच्च प्रतीचा शिधा आणि त्यात सुकामेवा देखील दिला जात आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी त्यासाठी शासनाच्या आदेशानंतर लागलीच कामाला लागून उच्च दर्जाचे साहित्य खरेदी करून ते वाटप देखील केले. यामुळे अमृत आहार योजनेतील सर्वच लाभार्थी महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.स्तनदा व गरोदर मातांची एकुण संख्या जिल्ह्यात २७ हजार ३०१ इतकी आहे. तर सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची संख्या १,४५,१५२ इतकी आहे. या सर्व लाभार्र्थींना एप्रिल व मे महिन्यातील ५० दिवसांसाठी शिधा वाटप करण्यात आला आहे. यात काजू, बदाम, मनुका व खारिक या सुकामेव्याचे एकत्रीत अर्धा किलोचे पाकिट, तीन किलो तांदुळ, पाच किलो गहू, एक किलो गुळ, एक किलो शेंगदाणे, प्रत्येकी ७५० ग्रॅम मसूर व हरभरा दाळ, २०० ग्रॅम मसाला, १०० ग्रॅम हळद व ५०० ग्रॅम मीठ व सव्वा लिटर सोयाबीन तेल यांचा यांचा समावेश आहे.याशिवाय सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना ३२ दिवसासाठी अर्धा किलो खजूर, प्रत्येकी ४०० ग्रॅम गुळ व शेंगदाणे देण्यात आले आहेत.कोरोनाच्या काळात एकीकडे सर्व कामधंदे बंद होते. त्यामुळे चिंतेची स्थिती होते. परंतु गरोदार, स्तनदा माता आणि बालकांना पुरक पोषण आहार अभावी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महिला व बालविकास विभागाने लागलीच नियोजन करीत पोषण आहार वेळेवर मिळेल याची काळजी घेतली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी अमृत आहार योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील मातांना आणि बालकांना वेळेवर आहार मिळू शकल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रत्येक माता आणि बालकांपर्यंत पुरक पोषण आहार पोहचावा यासाठी लॉकडाऊनच्या काळात मोठी कसरत झाली. परंतु महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत वेळेवर पोहच केले.