शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

सुकामेव्यासह ५० दिवसांचा किराणा किट मिळाले घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना प्रत्येकी अर्धा किलो सुकामेव्यासह इतर आवश्यक पोषक घटक असलेला शिधा ५० दिवसांसाठी वाटप करण्यात आला आहे. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाने हा उपक्रम जिल्ह्यात राबविला आहे.अमृत आहार योजनेअंतर्गत स्तनदा, गरोदर माता आणि सहा महिने ते सहा वर्षाच्या बालकांना पुरक पोषण आहार दिला जातो. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मात्र, आहार देण्याऐवजी थेट शिधा दिला जात आहे. यासाठी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने उच्च प्रतीचा शिधा आणि त्यात सुकामेवा देखील दिला जात आहे. या विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी त्यासाठी शासनाच्या आदेशानंतर लागलीच कामाला लागून उच्च दर्जाचे साहित्य खरेदी करून ते वाटप देखील केले. यामुळे अमृत आहार योजनेतील सर्वच लाभार्थी महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.स्तनदा व गरोदर मातांची एकुण संख्या जिल्ह्यात २७ हजार ३०१ इतकी आहे. तर सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची संख्या १,४५,१५२ इतकी आहे. या सर्व लाभार्र्थींना एप्रिल व मे महिन्यातील ५० दिवसांसाठी शिधा वाटप करण्यात आला आहे. यात काजू, बदाम, मनुका व खारिक या सुकामेव्याचे एकत्रीत अर्धा किलोचे पाकिट, तीन किलो तांदुळ, पाच किलो गहू, एक किलो गुळ, एक किलो शेंगदाणे, प्रत्येकी ७५० ग्रॅम मसूर व हरभरा दाळ, २०० ग्रॅम मसाला, १०० ग्रॅम हळद व ५०० ग्रॅम मीठ व सव्वा लिटर सोयाबीन तेल यांचा यांचा समावेश आहे.याशिवाय सात महिने ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना ३२ दिवसासाठी अर्धा किलो खजूर, प्रत्येकी ४०० ग्रॅम गुळ व शेंगदाणे देण्यात आले आहेत.कोरोनाच्या काळात एकीकडे सर्व कामधंदे बंद होते. त्यामुळे चिंतेची स्थिती होते. परंतु गरोदार, स्तनदा माता आणि बालकांना पुरक पोषण आहार अभावी त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महिला व बालविकास विभागाने लागलीच नियोजन करीत पोषण आहार वेळेवर मिळेल याची काळजी घेतली.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांनी अमृत आहार योजनेवर लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाच्या संकटाच्या काळात देखील मातांना आणि बालकांना वेळेवर आहार मिळू शकल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.जिल्ह्यातील दुर्गम भागात प्रत्येक माता आणि बालकांपर्यंत पुरक पोषण आहार पोहचावा यासाठी लॉकडाऊनच्या काळात मोठी कसरत झाली. परंतु महिला व बालविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत वेळेवर पोहच केले.