शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
4
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
5
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
8
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
9
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
10
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
11
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
12
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
13
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
14
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
15
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
16
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
17
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
18
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
19
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
20
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:24 IST

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून कारवाईचे सत्र सुरुच

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकी असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत आह़े त्यामुळे तळोद्यातील ग्रामीण भागात आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आह़े पिकांना देण्यासाठी तर सोडाच पण जनावरांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने आता ही जनावरे कोणाच्या दावणीला बांधावी? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांकडून विचारण्यात येत आह़े शहादा उपविभागाकडून थकबाकीपोटी तळोदा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े त्यामुळे पाणी असूनही केवळ वीजेअभावी शेतक:यांना नमते घ्यावे लागत आह़े तळोदा तालुक्यातील एकूण 43 पाणीपुरवठय़ाची जोडणी खंडीत करण्यात आली आह़े ग्रा़पं़कडे मोठी थकबाकीएकूण 1 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी या ग्रामपंचायतींकडे थकीत आह़े यात, प्रतापपूर, धनपूर, रोझवा, खेडले, त:हावद, गव्हाणीपाडा, खुषगव्हाण, लोभाणी, मोदलपाडा, बुधावल, सिव्रे, दलेलपुर, पिंपरपाडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आह़े तालुक्यातील इतरही मोठय़ा गावाच्या पाणीपुरवठय़ाची वीजजोडणी खंडीत करण्यात आली असल्याने शेतक:यांसमोर पिक जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े शेतशिवारे पडली ओस.ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती हा असतो़  त्यामुळे साहजिकच पाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतशिवारेदेखील आता ओस पडू लागली आहेत़ पाणीच नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत़ तसेच पिकही पाण्याविना करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पथदिव्यांचेही 5 कोटी थकीतपाणीपुरवठय़ा व्यतीरिक्त पथदिव्यांचीदेखील 5 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी तळोदा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडे बाकी आह़े त्यामुळे पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आली आह़े पाण्यासोबत आता गावातील वीजही गेली असल्याने शेतक:यांसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाले आह़े ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यास गावातील बहुतेक गावे हे अंधारात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतींमध्ये संभ्रममिळालेल्या माहितीनुसार वास्तविक वीज बिल जिल्हा परिषद भरत असत़े पण गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने बिल भरलेच नसल्याचे सांगण्यात येत आह़े म्हणून बहुतेक गावांना आता अंधारात राहण्याची वेळ येत आह़े दरम्यान, हे वीज बिल कोण भरणार यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावरुन दिसून येत आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन यातून मध्यममार्ग काढावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े