शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्यातील शेतकरी हवालदिल : वीज खंडित केल्याने पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 12:24 IST

महावितरणच्या शहादा उपविभागाकडून कारवाईचे सत्र सुरुच

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 18 : महावितरणच्या शहादा उपविभागाकडून थकबाकी असलेल्या गावांच्या पाणीपुरवठय़ाची वीज खंडित करण्यात येत आह़े त्यामुळे तळोद्यातील ग्रामीण भागात आता पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आह़े पिकांना देण्यासाठी तर सोडाच पण जनावरांना पिण्यासाठीही पाणी नसल्याने आता ही जनावरे कोणाच्या दावणीला बांधावी? असा प्रश्न शेतकरी व पशुपालकांकडून विचारण्यात येत आह़े शहादा उपविभागाकडून थकबाकीपोटी तळोदा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आह़े त्यामुळे पाणी असूनही केवळ वीजेअभावी शेतक:यांना नमते घ्यावे लागत आह़े तळोदा तालुक्यातील एकूण 43 पाणीपुरवठय़ाची जोडणी खंडीत करण्यात आली आह़े ग्रा़पं़कडे मोठी थकबाकीएकूण 1 कोटी 88 लाख रुपयांची थकबाकी या ग्रामपंचायतींकडे थकीत आह़े यात, प्रतापपूर, धनपूर, रोझवा, खेडले, त:हावद, गव्हाणीपाडा, खुषगव्हाण, लोभाणी, मोदलपाडा, बुधावल, सिव्रे, दलेलपुर, पिंपरपाडा आदी ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आलेला आह़े तालुक्यातील इतरही मोठय़ा गावाच्या पाणीपुरवठय़ाची वीजजोडणी खंडीत करण्यात आली असल्याने शेतक:यांसमोर पिक जगवण्याचा प्रश्न निर्माण झाला आह़े शेतशिवारे पडली ओस.ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती हा असतो़  त्यामुळे साहजिकच पाण्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे शेतशिवारेदेखील आता ओस पडू लागली आहेत़ पाणीच नसल्याने शेतीची सर्व कामे ठप्प पडली आहेत़ तसेच पिकही पाण्याविना करपू लागली असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़े पथदिव्यांचेही 5 कोटी थकीतपाणीपुरवठय़ा व्यतीरिक्त पथदिव्यांचीदेखील 5 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी तळोदा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींकडे बाकी आह़े त्यामुळे पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आली आह़े पाण्यासोबत आता गावातील वीजही गेली असल्याने शेतक:यांसमोर आता दुहेरी संकट निर्माण झाले आह़े ग्रामपंचायतींनी वीज बिल न भरल्यास गावातील बहुतेक गावे हे अंधारात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े ग्रामपंचायतींमध्ये संभ्रममिळालेल्या माहितीनुसार वास्तविक वीज बिल जिल्हा परिषद भरत असत़े पण गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेने बिल भरलेच नसल्याचे सांगण्यात येत आह़े म्हणून बहुतेक गावांना आता अंधारात राहण्याची वेळ येत आह़े दरम्यान, हे वीज बिल कोण भरणार यावरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे यावरुन दिसून येत आह़े त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने यात हस्तक्षेप करुन यातून मध्यममार्ग काढावा अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त करण्यात येत आह़े