शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गाचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम नोव्हेंबर २०२० पासून सुरू होण्याचे संकेत आहे. राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम नोव्हेंबर २०२० पासून सुरू होण्याचे संकेत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या एकेरीबाजुच्या दुरूस्तीला सुरूवात झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नागपुर-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी तीन टप्पे करण्यात आले आहेत. राज्याच्या हद्दीवरील बेडकीपाडा ते फागणेपर्यंतचा पहिला टप्पा असून, या अंतरात राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली होती. दीड वर्षापेक्षा अधिक काळापासून चौपदरीकरण रेंगाळले आहे. वाहनचालक व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या. महामार्गावर मोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांचे हाल होत होते. परिणामी इंधन, वेळ व पैशांचीदेखील नासाडी होत होती. अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली होती. कोंडाईबारी घाटात तर महामार्गच नामशेष होण्याच्या मार्गावर आला होता.राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती करण्यासाठी आमदार शिरिष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला होता. सबब महामार्ग दुरूस्तीच्या कामाची निविदा काढण्यात येवून त्यास मंजुरी देण्यात आली. लॉकडाऊन पूर्वी दुरूस्तीच्या कामास झालेली सुरूवात कोरोनामुळे थांबविण्यात आली होती. संचारबंदी नुकतीच उठविल्याने महामार्ग दुरूस्तीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे. राज्याच्या सरहद्दीपासून बेडकी येथून ही दुरूस्ती हाती घेण्यात आली आहे. शहरातील देवळफळी पावेतो ही दुरूस्ती झाली आहे.पावसाने उसंत दिल्याने हे काम जोमाने सुरू आहे. दुरुस्ती करतांना डांबराच्या थराचे कारपेट पसरविले जात आहे. डांबराचा वापरही योग्य प्रमाणात होत असल्याने वाहने धावत असल्यावरही रस्त्याची मजबुती दिसून येत आहे. दुरूस्तीच्या पाठोपाठ प्रथमच साईडपट्ट्या तयार होत असल्याने रस्त्याचा वापर करणारे अवाक होत आहेत. आतापावेतो साईडपट्ट्यांचे अस्तित्वच नसल्याने महामार्ग व साईडपट्ट्या यांचा दुरापास्त संबंधच नाही असा समज या महामार्गासाठी रूढ झाला होता. प्रथमच साईडपट्ट्या होत असल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.नवापूर तालुक्यातील बेडकीपाडापासून दहिवेलपर्यंत आणि दहिवेलपासून धुळेपर्यंत अश्या दोन टप्प्यात एकाच वेळी दुरूस्तीचे हे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी महामार्गाची दुरूस्ती होत असल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान महामार्गाचे रखडलेले प्रत्यक्ष चौपदरीकरणाचे काम दिवाळी दरम्यान सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली. यासाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, मुंबईच्या एका कंपनीला हे काम देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.