शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

कुपोषण, आरोग्य व शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 13:34 IST

नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 टक्के जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठीही प्रय} सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य ...

नंदुरबार : नुकत्याच करण्यात आलेल्या सव्र्हेक्षणात जिल्ह्यात साडेतीन हजार कुपोषीत बालके आढळून आली आहेत. या बालकांना कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ग्राम बाल विकास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय 100 टक्के जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यासाठीही प्रय} सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी ‘लोकमत’ संवाद उपक्रमात बोलतांना दिली.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली. यावेळी रोहयोचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील उपस्थित होते. ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. कार्यालय प्रमुख रमाकांत पाटील, मनोज शेलार उपस्थित होते. रणधीर सोमवंशी यांनी यावेळी जिल्हा परिषदेचे गतिमान प्रशासन, पेपरलेस कामकाज, कुपोषण, आरोग्य, शिक्षण यासह इतर विषयांवर चर्चा केली. त्यांनी सांगितले, पावसाळ्यात सातपुडय़ाच्या दुर्गम भागात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. त्यासाठी पावसाळ्याआधीच सर्व आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांना सज्ज ठेवण्यात आले आहेत. पुरेसा औषधीसाठा पोहचविण्यात आला आहे. आरोग्य कर्मचारी मुख्यालयी थांबतील यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. सातपुडय़ात कुपोषणाचा प्रश्न या काळात निर्माण होतो. ही बाब लक्षात घेता आरोग्य व महिला आणि बालकल्याण विभागातर्फे कुपोषीत बालकांचे सव्र्हेक्षण करण्यात आले आहे. कुपोषीत बालकांसाठी पहिल्या टप्प्यात धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यात 148 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. ही केंद्र 60 दिवस चालणार आहेत. कुपोषणाच्या सामान्य श्रेणीत आणण्यासाठी या केंद्रांमध्ये बालकांना पुरक पोषण आहार दिला जाणार आहे. तीन ते चार  कुपोषीत बालके आढळलेल्या अंगणवाडी केंद्रात देखील ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. लवकरच इतर तालुक्यात देखील ही केंद्र  लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून सॅम व मॅम बालकांनाही या केंद्रात सामावून घेण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे अनेक बालकांना त्याचा फायदा होणार आहे.सर्वच शाळा डिजीटल करणारजिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळा डिजीटल करण्यात येणार आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता व भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सद्य स्थितीत 900 शाळा डिजीटल झाल्या असून लवकरच 400 शाळा डिजीटल होणार आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पुर्ण झाली आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना देखील पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. ऑनलाईन बदल्यांच्या वेळी संवर्ग एक व दोनची माहिती भरतांना ज्यांनी चुकीची माहिती भरली असेल त्यांची माहिती घेतली जात आहे.महिला बचत गटजिल्ह्यात 2700 महिला बचत गट स्थापन करण्यात येणार आहेत. त्यांना बँकामार्फत 20 कोटी रुपयांचे भागभांडवल पुरविले जाणार आहे. या माध्यमातून 30 हजार कुटूंबांना जोडले जाणार आहे. पहिले सहा महिने भांडवल उभारल्यानंतर पहिले कर्ज किमान एक लाख रुपयांर्पयत बँकांमार्फत उपलब्ध करून दिले जाईल. याचा फायदा ग्रामिण व दुर्गम भागातील महिलांना स्वावलंभी करणे, या माध्यमातून स्थलांतर रोखण्याचा प्रय} राहणार असल्याचे रणधीर सोमवंशी यांनी सांगितले.रोजगार हमी योजनेंअंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 200 विहिरी पुर्ण करावयाच्या आहेत. गेल्या वर्षीच्या 158 विहिरी पुर्ण करण्यात आल्या आहेत. विहिर लाभार्थीना डीबीटी अंतर्गत निधी दिला जातो. तसेच 17 हजार घरकुलांची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या रोहयोची 22 हजार कामे सुरू आहेत. 14 वा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन, ग्रामिण पाणी पुरवठा, कृषी यासह इतर विविध विषयांवरही रणधीर सोमवंशी यांनी यावेळी चर्चा केली.