शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

जात पंचायतची तक्रारीसाठी अंनिसकडून हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST

नंदुरबार जिल्ह्यातही छुप्या पद्धतीने जात पंचायती सक्रिय आहेत. अनेकदा जात पंचायतीबाबत तक्रारी समोर आलेल्या आहेत. जात पंचायतीमार्फत व्यक्ती ...

नंदुरबार जिल्ह्यातही छुप्या पद्धतीने जात पंचायती सक्रिय आहेत. अनेकदा जात पंचायतीबाबत तक्रारी समोर आलेल्या आहेत. जात पंचायतीमार्फत व्यक्ती व कुटुंबावर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात येतात. ते अनिष्ट व अघोरी प्रकारचे असतात. असे असले तरी जात पंचायतीच्या प्रभावामुळे अनेक प्रकरणे दाबली जातात. या पार्श्वभूमीवर जात पंचायतीच्या मनमानीला आवर घालण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जात पंचायत मूठमाती अभियान मागील अनेक वर्षांपासून सुरू असून या अभियानांतर्गत ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात येणार आहे.

जात पंचायतीच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या कुटुंब व व्यक्तीने या हेल्पलाईनवर संपर्क करून आपली तक्रार नोंदविल्यास त्या कुटुंबाला संपूर्ण कायदेशीर मदत महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात येणार आहे. शिवाय जर कुटुंबाला वाळीत टाकणे किंवा इतर अमानवी, अमानुष त्रास जात पंचायतीकडून दिला गेला असेल तर त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाईसाठीही अंनिसच्या वतीने संपूर्ण मदत केली जाणार आहे.

जात पंचायतीच्या त्रासाच्या विरोधात तक्रारीसाठी तसेच सामाजिक बहिष्कार कायद्यासंदर्भात मदत व मार्गदर्शनसाठी डॉ.डी.बी. शेंडे (९४२२३६७९२३), बलदेव वसईकर (९८५०४४८५४९), वसंत वळवी (९३२५७१४७७०)या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे, जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा प्रधान सचिव कीर्तीवर्धन तायडे यांनी कळविले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात चार ते पाच गुन्हे

जात पंचायतीच्या निर्णयांच्या विरोधात महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्याने अस्तित्वात आलेल्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठीही कृती कार्यक्रम राबविला जाणार आहे. त्या अंतर्गत पोलीस प्रशासन, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांचे प्रशिक्षणदेखील घेण्यात येणार आहे. या कायद्यान्वये राज्यात चार वर्षात केवळ १०० गुन्हे दाखल झाले असून नंदुरबार जिल्ह्यातही चार ते पाच गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात येते.

सरकारने सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याची नियमावली अजून बनवली नाही. तर अंमलबजावणीसाठी सरकारने काहीही प्रयत्न केले नाहीत. लॉकडाऊनमध्ये जात पंचायती अधिक सक्रिय झाल्याचे दिसल्याने जागरूक रहाणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे हेल्पलाईन यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

-विनायक सावळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती