शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

गोगापूर परिसरात वादळी पावसाने नुकसान, घरांचे पत्रे उडाली; जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात ...

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गोगापूरसह तिधारे, लोहारे, जवखेडा परिसराला जोरदार फटका बसला. त्यात गोगापूर येथील नारायण राजपुरोहित यांच्या किराणा दुकानाचे पत्रे उडून दुकानात पावसाचे पाणी घुसून किराणा सामानाची नासधूस झाली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. जवळच असलेले वीज खांब उन्मळून पडले असून परिसरातील घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला हरभरा पाण्यामुळे ओला झाला. याची माहिती मिळताच पं.स. सदस्य गणेश पाटील, योगेश पाटील, सरपंच विजय सोनवणे, गोपाळ पावरा, जितू पाटील, उपसरपंच ऋषीकेश पाटील यांनी परिसरात पाहणी केली.

केळी पिकाला पुन्हा फटका

वादळी पावसामुळे गोगापूर, जवखेडासह परिसरात केळी पिकासह पपई पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तहसीलदारांची भेट

शहादा तालुक्यातील लोहारा येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक वादळाला सुरुवात झाली. या वादळामुळे १० ते १५ घरांचे पत्रे उडून तसेच भिंत पडून नुकसान झाले आहे. अनेक झाडांसह १५ ते २० विजेचे खांबही उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे कुठेही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मोठे झाले आहे. सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे थोड्या प्रमाणात राहिलेले केळी पीक संपूर्ण भुईसपाट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा आहे.

-संतोष नामदेव ठाकरे, शेतकरी, जवखेडा, ता.शहादा

गोगापूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे घरांची पत्रे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाईची रक्कम द्यावी.

-गणेश पाटील, पं.स. सदस्य, ब्राह्मणपुरी गण