शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

गोगापूर परिसरात वादळी पावसाने नुकसान, घरांचे पत्रे उडाली; जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात ...

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गोगापूरसह तिधारे, लोहारे, जवखेडा परिसराला जोरदार फटका बसला. त्यात गोगापूर येथील नारायण राजपुरोहित यांच्या किराणा दुकानाचे पत्रे उडून दुकानात पावसाचे पाणी घुसून किराणा सामानाची नासधूस झाली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. जवळच असलेले वीज खांब उन्मळून पडले असून परिसरातील घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला हरभरा पाण्यामुळे ओला झाला. याची माहिती मिळताच पं.स. सदस्य गणेश पाटील, योगेश पाटील, सरपंच विजय सोनवणे, गोपाळ पावरा, जितू पाटील, उपसरपंच ऋषीकेश पाटील यांनी परिसरात पाहणी केली.

केळी पिकाला पुन्हा फटका

वादळी पावसामुळे गोगापूर, जवखेडासह परिसरात केळी पिकासह पपई पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तहसीलदारांची भेट

शहादा तालुक्यातील लोहारा येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक वादळाला सुरुवात झाली. या वादळामुळे १० ते १५ घरांचे पत्रे उडून तसेच भिंत पडून नुकसान झाले आहे. अनेक झाडांसह १५ ते २० विजेचे खांबही उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे कुठेही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मोठे झाले आहे. सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे थोड्या प्रमाणात राहिलेले केळी पीक संपूर्ण भुईसपाट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा आहे.

-संतोष नामदेव ठाकरे, शेतकरी, जवखेडा, ता.शहादा

गोगापूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे घरांची पत्रे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाईची रक्कम द्यावी.

-गणेश पाटील, पं.स. सदस्य, ब्राह्मणपुरी गण