शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
3
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
4
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
5
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
6
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
7
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
8
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
9
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
10
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
11
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
12
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
13
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
15
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
16
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
17
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
18
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
19
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
20
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने धडगाव व मोलगी भागात अगदी निशुल्क उपलब्ध होत आहे. निशुल्क मिळत असल्याने या भाज्यांची खरी किंमत कळत नाही, परंतु त्या अनेक आजारांवर उपायकारक आहे. या भाज्यांची प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दखल घेणे अपेक्षीत आहे.सातपुड्यात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, झुडूपे आढळून येतात, त्यापैकी बहुतांश वनस्पतींचा पाला, फुले, फळे यांचा खाद्यान्न म्हणून वापर होत आहे. या खाद्यान्नाचा आदिवासींमधील विविध मौखिक साहित्यांमध्ये उल्लेख होतांना दिसत आहे. प्रामुख्याने डाब राजमंडलच्या कहाण्या, गितांसह पारंपरिक लग्नगिते, होळी गीतांमध्येही होत आहे. या भाज्यांचा पिढ्यानपिढ्यान अन्न म्हणून अवलंब केला जात आहे. त्यामुळे या भाज्यांचा शोध आदिवासींच्या पूर्वजांनीच लावला असावा, हे सिद्ध होत आहे. सुरुवातीला मानव अन्न हे जंगल व आसपासच्या परिसरातून मिळत असे. यात कंदमुळे, जंगलातून अपोआप मिळणारी फळे व रानभाज्यांचा समावेश होतो. माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्याच्या खान-पानाच्या सवयी बदलल्याचे दिसून येत आहे.शहरी भागात कृषीव्यवस्थेच्या बदलामुळे कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची अशा भाज्या मिळत असल्या तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव ऋतू व काळानुरुप पोवाळ्या (सनाय), माटला, उखीवळा, आंबाडा, शेल्टा, शेवगा पाला, उंबरपाला, सिंचपाला, मोखं, सिरीवाटा यासह अनेक वनस्पतींचा पाला, फुले, मुळे व फळे दैनंदिन आहारातील खाद्यान्न म्हणून वापर करीत आहे. या भाज्यांसाठी धडगाव मोलगी भागात सहज मिळत असून त्यासाठी आदिवासी बांधवांना कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. त्यात कंदवर्गीय, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीयांसह आळंबीही उपलब्ध होते. परंतु आळंबी काही अंशी कालबाह्य देखील ठरत आहे. या भाज्यांच्या विकासासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.रानभाज्यांचा प्रशासकीय पातळीवर दखल घेत त्यातील औषधी गुणधर्म पडताळून पाहणे गरजेचे आहे. रानभाज्या या ठराविक मातीत व वातावरणातच उपलब्ध होतात. त्यामुळेया नैसर्गिक संपत्तीतील जैवविविधता ओरबाडली जाणार नाही, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. या भाज्या रानभाज्या असल्या तरी त्यांचीही शेती करता येऊ शकते का? या दिशेने प्रशासनाचे पाऊल पडल्यास या भाज्या निश्चितच विकासाच्या वाटेवर येतील पर्यायाने प्रत्येक घटकातील बांधवांना पौष्टीक तथा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या उपलब्ध होतील. त्यातून आरोग्यदायी समाज निर्माण होईल. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना त्यातून रोजगार देखील उपलब्ध होऊ शकेल.काही भाज्या शेतात नव्हे जंगलातच वाढतातसातपुड्यात आढळून येणाऱ्या वनस्पतींपैकी बहुतांश वनस्पती या रानातच वाढतात. त्याची शेती केल्यास किंवा त्याची बागेत लागवड केल्यास त्या वाढत नाही. त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव काही भाज्यांचा साठा करीत नाही. किंवा त्यांच्या बियाही साठवून ठेवत नाही. प्रशासकीय पातळीवर या भाज्यांचा विकास करतांना अशा काही भाज्यांचीही निवड होणे काळाची गरज आहे.