शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सातपुड्यात आरोग्यवर्धक रानभाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चवदारच नव्हे तर औषधी गुणधर्माच्या पौष्टिक रानभाज्या सातपुड्यात मिळत आहे. त्या रानावनात उगलेल्या असल्याने धडगाव व मोलगी भागात अगदी निशुल्क उपलब्ध होत आहे. निशुल्क मिळत असल्याने या भाज्यांची खरी किंमत कळत नाही, परंतु त्या अनेक आजारांवर उपायकारक आहे. या भाज्यांची प्रशासकीय पातळीवर विकासाच्या दिशेने दखल घेणे अपेक्षीत आहे.सातपुड्यात अनेक औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती, झुडूपे आढळून येतात, त्यापैकी बहुतांश वनस्पतींचा पाला, फुले, फळे यांचा खाद्यान्न म्हणून वापर होत आहे. या खाद्यान्नाचा आदिवासींमधील विविध मौखिक साहित्यांमध्ये उल्लेख होतांना दिसत आहे. प्रामुख्याने डाब राजमंडलच्या कहाण्या, गितांसह पारंपरिक लग्नगिते, होळी गीतांमध्येही होत आहे. या भाज्यांचा पिढ्यानपिढ्यान अन्न म्हणून अवलंब केला जात आहे. त्यामुळे या भाज्यांचा शोध आदिवासींच्या पूर्वजांनीच लावला असावा, हे सिद्ध होत आहे. सुरुवातीला मानव अन्न हे जंगल व आसपासच्या परिसरातून मिळत असे. यात कंदमुळे, जंगलातून अपोआप मिळणारी फळे व रानभाज्यांचा समावेश होतो. माणसाने शेती करायला सुरुवात केली, त्याच्या खान-पानाच्या सवयी बदलल्याचे दिसून येत आहे.शहरी भागात कृषीव्यवस्थेच्या बदलामुळे कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची अशा भाज्या मिळत असल्या तरी सातपुड्यातील आदिवासी बांधव ऋतू व काळानुरुप पोवाळ्या (सनाय), माटला, उखीवळा, आंबाडा, शेल्टा, शेवगा पाला, उंबरपाला, सिंचपाला, मोखं, सिरीवाटा यासह अनेक वनस्पतींचा पाला, फुले, मुळे व फळे दैनंदिन आहारातील खाद्यान्न म्हणून वापर करीत आहे. या भाज्यांसाठी धडगाव मोलगी भागात सहज मिळत असून त्यासाठी आदिवासी बांधवांना कुठलीही किंमत मोजावी लागत नाही. त्यात कंदवर्गीय, झुडूपवर्गीय, वेलवर्गीय, वृक्षवर्गीयांसह आळंबीही उपलब्ध होते. परंतु आळंबी काही अंशी कालबाह्य देखील ठरत आहे. या भाज्यांच्या विकासासाठी उपाययोजना होणे आवश्यक आहे.रानभाज्यांचा प्रशासकीय पातळीवर दखल घेत त्यातील औषधी गुणधर्म पडताळून पाहणे गरजेचे आहे. रानभाज्या या ठराविक मातीत व वातावरणातच उपलब्ध होतात. त्यामुळेया नैसर्गिक संपत्तीतील जैवविविधता ओरबाडली जाणार नाही, याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. या भाज्या रानभाज्या असल्या तरी त्यांचीही शेती करता येऊ शकते का? या दिशेने प्रशासनाचे पाऊल पडल्यास या भाज्या निश्चितच विकासाच्या वाटेवर येतील पर्यायाने प्रत्येक घटकातील बांधवांना पौष्टीक तथा औषधी गुणधर्म असलेल्या भाज्या उपलब्ध होतील. त्यातून आरोग्यदायी समाज निर्माण होईल. शिवाय दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना त्यातून रोजगार देखील उपलब्ध होऊ शकेल.काही भाज्या शेतात नव्हे जंगलातच वाढतातसातपुड्यात आढळून येणाऱ्या वनस्पतींपैकी बहुतांश वनस्पती या रानातच वाढतात. त्याची शेती केल्यास किंवा त्याची बागेत लागवड केल्यास त्या वाढत नाही. त्यामुळे सातपुड्यातील आदिवासी बांधव काही भाज्यांचा साठा करीत नाही. किंवा त्यांच्या बियाही साठवून ठेवत नाही. प्रशासकीय पातळीवर या भाज्यांचा विकास करतांना अशा काही भाज्यांचीही निवड होणे काळाची गरज आहे.