शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

‘आरोग्यमयी’ गोळ्यांनी दूर होणार जिल्ह्यातील लहान बालकांचा ‘जंतदोष’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने आरोग्य विभागाने विविध लसीकरण व मोहिमांना प्रारंभ केला आहे. यातून येत्या २१ सप्टेंबर ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आल्याने आरोग्य विभागाने विविध लसीकरण व मोहिमांना प्रारंभ केला आहे. यातून येत्या २१ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी १ ते १९ वर्षांपर्यंतच्या पाच लाख मुलांना जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जाणार आहेत. आरोग्य विभागाकडून यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण येत्या काळात होणार आहे.

२१ सप्टेंबर जिल्ह्यात ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळास्तरांवर, घरोघरी आशा व अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आशांची पथके निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. २१ रोजी ज्या बालकांचे लसीकरण होणार नाही त्यांचे लसीकरण येत्या २८ सप्टेंबर रोजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली गेली आहे. त्यानुसार तयारी सुरु झाली आहे.

काय आहे जंतदोष?

कृमी या जंतदोषामुळे अनेकांच्या चेहऱ्यांवर पांढरे चट्टे येतात. यातून ॲनेमियाचे प्रमाण वाढते. मुलांची भूक मंदावते याचाच परिणाम त्याच्या शारीरिक व मानसिक वाढीवर होत असतो. त्यातून त्याला विविध आजार उद्भवू शकतात. अशावेळी या गोळ्या दिल्यानंतर जंतदोष होत नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

वयाच्या १९ वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या

१ ते १९ वर्षांपर्यंतच्या मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जातात. यात १ ते ३ वर्षांपर्यंतच्या मुलांना गोळीची पावडर करून तिचे पाणी दिले जाते. तर ३ वर्षांपुढील मुलांना एक गोळी त्यांना चावून खायला सांगितली जाते. ही गोळी गोड असल्याने लहान मुलांना सहज खाता येते. दर सहा महिन्यात गोळ्या वाटपाचा कार्यक्रम आरोग्य विभागाकडून राबवला जाताे.

गोळ्यांसाठी कोणाकडे संपर्क साधायचा?

जंतदोषापासून बालकांना दूर ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आरोग्य विभागाकडून २१ सप्टेंबर रोजी मोहिमेंतर्गत गोळ्यांचे वाटप होणार आहे. प्राथमिक आराेग्य केंद्र, उपकेंद्र, आशा व अंगणवाडी सेविका यांच्याकडून या गोळ्या उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोविडमुळे शाळा व अंगणवाडी बंद असल्याने मोहिमेवर थोडा परिणाम झाला होता; मात्र घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. २१ व २८ रोजी या गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.

- डॉ. महेंद्र चव्हाण,

जिल्हा आरोग्य अधिकारी.

या गोळ्यांच्या घरोघरी वाटपाची मोहीम ही दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागाकडून राबविली जात असते. त्या पार्श्वभूमीवर याबाबत जनजागृतीही केली जाते. पूर्वी शाळांमध्ये सप्टेंबर महिन्यात मोहिमा आखून कामकाज होत होते, परंतु कोरोनामुळे सर्वकाही ठप्प होते. शाळा अद्यापही पूर्णपणे सुरु झाल्या नसल्याने घरोघरी गोळ्या वाटप होतील.