शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

त्रिस्तरीय रचनेनुसार आरोग्य यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने त्रिस्तरीय रचनेनुसार तयारी केलेली आहे. आवश्यक ते सर्व साधनसामुग्री तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संसर्गाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने त्रिस्तरीय रचनेनुसार तयारी केलेली आहे. आवश्यक ते सर्व साधनसामुग्री तयार असून नागरिकांनी प्रशानाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिस्तरीय रचनेनुसार सहा कोविड केअर सेंटर असून त्याची क्षमता ३३४ आहे. कोविड हेल्थ सेंटर पाच असून त्यांची क्षमता २१० आहे. कोविड हॉस्पिटल एक असून त्याची क्षमता १०० बेड्सची आहे. जिल्ह्यात तीन व्हेंटीलेटर उपलब्ध असून १० अतिरिक्त व्हेंटीलेटर्सची मागणी नोंदविण्यात आली आहे. मुबलक प्रमाणात औषधे, सॅनिटायझर, मास्क उपलब्ध आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी रिसोर्स मॅपिंग करण्यात आले आहे.जिल्ह्यातील २,१५० किराणा दुकाने व ६७३ औषध दुकाने सुरू असून नागरिकांसाठी पुरेसा साठा उपलब्ध आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत ५२ हजार ४३७ क्विंटल धान्य वाटप करण्यात आले होते. येत्या आठवड्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत तांदूळ वाटपासाठी ५,७०१ मे.टन तांदळाची वाहतूक सुरू आहे.केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी मे व जून महिन्याकरिता ९८३ मे.टन. गहू व ६३५ मे.टन तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. गरीबांना कमी दरात भोजन प्राप्त व्हावे यासाठी जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. एकूण ११ ठिकाणी केवळ पाच रुपयात भोजनाची थाळी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण मदत कार्यासाठी ४१ स्वयंसेवी संस्थाचे सहकार्य लाभले आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्या सुरू आहेत.जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी आवश्यक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. आतापर्यंत कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नसून हीच परिस्थिती कायम रहावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे डॉ.भारूड यांनी सांगितले. नागरिकांनी आणखी काही काळ धैर्याने घरातच राहून प्रशासनास सहकार्य करावे व जिल्हा कोरोनामुक्त ठेवण्यात मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.भविष्यातील संभाव्य आपत्तीला सक्षमतेने सामारे जाण्यासाठी जिल्ह्यातील रुग्णालये सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १२५ दवाखान्यात एकूण एक हजार ८४ बेड्स आहेत. एक विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्यात ५२ बेड्स उपलब्ध आहेत. या कक्षात ११ रुग्ण दाखल आहेत. याशिवाय जिल्ह्यातील विविध ठिकाणी सात क्वॉरंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले असून ३३४ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. २२ संशयित व्यक्तींना या कक्षांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर २४ व्यक्तींना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.बीएसएल-३ लक्षणांनी बाधित असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी १०० कर्मचारी व इतर पॅरामेडीकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात विदेशातून प्रवास करून आलेल्य ४८ प्रवासी आले होते. त्यांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांची तपासणी केली असता त्यांच्यात कोविड-१९ आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत.जिल्ह्यात बाहेरील राज्य व जिल्ह्यातील मजूरांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी १० निवारा गृह स्थापन करण्यात आली असून त्याची क्षमता ६१४ आहे. अकोला, जळगाव जिल्ह्यातील तसेच मध्य प्रदेश, गुजरात, प.बंगाल, राजस्थान आणि ओडीसा या राज्यातील १७७ व्यक्तींना दाखल करण्यात आले आहे. यापैकी कुठल्याही व्यक्तीत लक्षणे आढळून आलेली नाहीत. निवारा गृहामध्ये भोजन व वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. नंदुरबार शहरात तीन हजार लोकांना स्वयंसेवकांमार्फत भोजन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.बाहेरून येणाºया व्यक्तींमुळे संसर्ग होऊ नये यासाठी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. पोलीस विभागामार्फत १२ आंतरराज्य चेक पोस्ट तर १० जिल्हास्तरीय चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा पुरवठा करणाºया ३९७ वाहनांना परिवहन विभागाने वाहतूकीसाठी सुरक्षा पास दिले आहेत.