शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

आरोग्य विभागाला मिळणार दहा व्हेंटीलेटर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 21:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला लवकरच १० व्हेंटीलेटर देण्यात येणार असून सॅनेटायझर व मास्कही पुरेशा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला लवकरच १० व्हेंटीलेटर देण्यात येणार असून सॅनेटायझर व मास्कही पुरेशा प्रमाणात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी दिले़ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते़यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी सांगितले की, जिल्ह्यात ५ व्हेंटीलेटर असून आणखी १० व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझार आणि एन-९५ मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. मनरेगाच्या माध्यमातून २८२ ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून ८ हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ४० टक्के पूर्ण झाले असताना यावर्षी विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते ८० ते ९० टक्के करण्याचा प्रयत्न आहे़ मोहिमेंतर्गत एकाही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यांच्या व रुग्णालय दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून नियमांचे पालन न करणाºया स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे़खासदार डॉ़ हीना गावीत यांनी सांगितले की, कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून जास्त जोखिमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात यावेत, राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी, बाहेरील जिल्ह्यातील नागरीक जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे़ बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात यावीत. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतून गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करण्यात यावी़जिल्ह्याच्या सीमेवर चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असून तैनात असलेल्या पोलीस कर्मचाºयांना सुरक्षा कीट आणि सॅनिटायझर देण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी बैठकीत दिली. बचत गटातील महिलांद्वारे १२ हजार मास्क बनविण्यात आले असून त्यांचे आशा कर्मचारी व वैद्यकीय कर्मचाºयांना वाटप करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली. बैठकीस कृषी, रोहयो, बँक, सहकार, बांधकाम आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी बाहेरून येणाºया मजूरांना आपल्या इतर गावात क्वॉरंटाईन करावे, यासाठी आश्रमशाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. इंडिया पोस्ट पेमेंट बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांच्या प्रतिनिधींची संख्या वाढवावी, नागरिकांना अन्नधान्य नियमानुसार योग्य प्रमाणात मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे, असे सांगितले.