शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

उष्ण लहरींमुळे नंदुरबारातील नागरिक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:42 IST

तापमान वाढ : प्रशासनाने उपाय योजना करण्याबाबत अवर सचिवांच्या सूचना

लोकमत ऑनलाईननंदुरबार : अती उष्ण लहरींमुळे नंदुरबारसह संपूर्ण खान्देशात चांगलाच उकाडा जाणवू लागला आह़े येत्या काही दिवसातसुध्दा हीच स्थिती राहणार असल्याचे कुलाबा येथील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारसह जळगाव व धुळे येथील तापमानाने चाळीशी पार केली आह़े त्यामुळे वाढत्या उष्णतेने नागरिक चांगलेच होरपळून निघत आहेत़ मार्च महिन्यांमध्येच तापमान 40 अंश सेल्शिअस इतके नोंदविले गेले होत़े एप्रिलच्या सुरुवातीला 41 अंशार्पयत तापमान पोहचले आह़े पूर्व भागातून येणा:या अति उष्ण व कोरडय़ा वा:यांमुळे तापमानात वाढ झाली असून येत्या काही दिवसांत तापमानाची स्थिती अशीच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान राज्याचे अवर सचिव श्रीरंग घोलप यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिका:यांना पत्र पाठविले असून त्यात त्यांनी उष्णतेच्या काळात जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापनाने घ्यावयाची काळजी याबाबत सूचना केल्या आहेत़ यात, भारतीय हवामान खात्याने या वर्षी राज्यासह देशात विविध भागात उष्णतेची लाट मोठय़ा प्रमाणात जानवणार असल्याचा इशारा दिला आह़े त्याच बरोबर नेहमीपेक्षा यंदा प्रकर्षाने उष्णता जानवणार असल्याचेही त्यांनी म्हटले आह़े यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांना उष्णतेच्या लाटेसाठी नोडल अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना तालुकास्तरावर नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात यावे अशा सूचना या वेळी देण्यात आल्या आहेत़ त्याच बरोबर स्थानिक माध्यमांचा वापर करुन उष्णतेच्या लाटेसाठी काय करु व काय करु नये याबाबत जनजागृती अभियान राबविण्याचाही सूचना या वेळी देण्यात आल्या आह़े दुपारी उष्णता जास्त असल्याने जिल्ह्यातील मंदिरे, सार्वजनिक इमारती, उद्याने दुपारी उघडी ठेवावी जेणे करुन वाटसरुंना आश्रय मिळू शकेल असेही सांगितले आह़े नागरिकांनी दुपारी विनाकारण बाहेर पडू नये असे सांगितले आह़े