शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरही महिलांचा छळ; ‘सायबर’कडे २० तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

नंदुरबार : बदलत्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. वाढलेला हा वापर अनेक बाबींनी त्रासदायक ठरत असून जिल्ह्यात ...

नंदुरबार : बदलत्या काळात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. वाढलेला हा वापर अनेक बाबींनी त्रासदायक ठरत असून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सोशल मीडियातून महिलांचा छळ केल्याचे तब्बल १४ गुन्हे दाखल झाले असून सहा महिलांनी तक्रारीही दिल्या आहेत. सायबर सेलकडे आलेल्या या तक्रारी आणि गुन्ह्यांचा छडा लावून महिलांचा छळ करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

बदनामीच्या भीतीने तक्रारी करणे टाळतात..

गेल्या काही काळात महिलांकडून सोशल मीडियाचा वापर वाढवला गेला आहे. यातून नवीन ओळखी, मैत्री होते. परिणामी गैरकृत्य करणारे अशा महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्या छायाचित्रे आणि वैयक्तिक माहितीचा गैरवापर करतात. यात काही युवतींचा छळ झाला आहे; परंतु बदनामी होईल या भीतीने तक्रारी करण्यास टाळाटाळ केली जाते.

महिलांनी सोशल मीडियातून होणाऱ्या छळाला बळी न पडता, सरळ पोलिसात तक्रारी केल्या पाहिजेत. आपल्यावर अन्याय होतोय हे मांडले पाहिजे. बदनामी किंवा इतर बाबीची भीती बाळगू नये.

- मालती वळवी, महिला कार्यकर्ती, नंदुरबार.

महिलांनी अशा प्रकारे कोणी छळ करत असल्यास थेट सायबर सेल, पोलीस ठाणे यांना संपर्क करावा. गुन्हा करणारा कधीही मोकाट फिरु शकत नाही. तो सापडतोच हे लक्षात ठेवावे.

- योगिता बडगुजर, महिला कार्यकर्ती, नंदुरबार.

महिलांनी सायबर सेलला माहिती द्यावी

महिलांनी सोशल मीडियाचा वापर करताना दक्षता घेतली पाहिजे. कोणी त्रास देत असेल तर महिलांनी तातडीने सायबर सेलकडे धाव घेतली पाहिजे.

- रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी त्रास देत असल्यास लागलीच आपल्या हद्दीतील पोलीस ठाण्याशी संपर्क साधायला हवा.

महिला या सोशल मीडियाचा वापर खूप कमी प्रमाणात करतात. ज्या करतात त्यांची संख्या कमीच आहे.

सोशल मीडियाच्या तक्रारी असल्यास पोलिसांचा सायबर सेल हा स्वतंत्रपणे कार्यरत करण्यात आलेला आहे.