शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
3
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
4
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
5
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
6
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
7
"जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
8
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
9
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
10
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
12
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
13
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
14
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
15
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
16
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
17
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
18
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
19
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"
20
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!

शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ...

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, शहादा ते उभादगड ही बसफेरीच बंद असल्याने आम्ही शाळेत जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्यामुळे शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. बसेस बंद असल्यामुळे नववी ते बारावीचे विद्यार्थी दुचाकी वाहनाने किंवा अवैध प्रवासी वाहनाने शहादा येथे महाविद्यालयात जात होते. मात्र, आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने सगळ्यांकडेच दोन दुचाकी वाहन असेल असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहादा ते उभादगड ही बसफेरी बंद असल्यामुळे शाळेत जाता येणार नाहीये. जयनगर, धांद्रे, लोंढरे, निंभोरे, कहाटूळ येथील पाचवी ते आठवीच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी शहादा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर लोंढरे, धांद्रे बुद्रूक, निंभोरे, उभादगड, धांद्रे खुर्द येथील विद्यार्थी जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात प्रवेशित आहेत. त्यांनाही बस नसल्यामुळे शाळेत जाता येणार नाही. शाळा चालू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे शहादा - उभादगड बसफेरी अजून चालू झाली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून सध्या तरी वंचितच राहावे लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहादा ते उभादगड ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केली आहे.

शाळा चालू होत असल्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला असला तरी शाळेत जायला बस नसल्यामुळे शाळा उघडूनही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. म्हणून शहादा ते उभादगड ही बस पूर्ववत चालू करावी.

- सुहास धनराज माळी, जयनगर, ता. शहादा, विद्यार्थी

कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने थोडे दिवस मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, बंद झालेली मंदिरे दुसरी लाट चालू झाल्यापासून शासनाने उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. आता मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी जयनगर येथे येण्यासाठी शहाद्याहून बसफेरी नसल्यामुळे श्री हेरंब गणेश देवस्थानात भाविकांना दर्शनास येण्यास अडचणीचे ठरणार आहे.

- हिरालाल माळी, अध्यक्ष, हेरंब गणेश देवस्थान ट्रस्ट, जयनगर