शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ...

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, शहादा ते उभादगड ही बसफेरीच बंद असल्याने आम्ही शाळेत जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्यामुळे शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. बसेस बंद असल्यामुळे नववी ते बारावीचे विद्यार्थी दुचाकी वाहनाने किंवा अवैध प्रवासी वाहनाने शहादा येथे महाविद्यालयात जात होते. मात्र, आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने सगळ्यांकडेच दोन दुचाकी वाहन असेल असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहादा ते उभादगड ही बसफेरी बंद असल्यामुळे शाळेत जाता येणार नाहीये. जयनगर, धांद्रे, लोंढरे, निंभोरे, कहाटूळ येथील पाचवी ते आठवीच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी शहादा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर लोंढरे, धांद्रे बुद्रूक, निंभोरे, उभादगड, धांद्रे खुर्द येथील विद्यार्थी जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात प्रवेशित आहेत. त्यांनाही बस नसल्यामुळे शाळेत जाता येणार नाही. शाळा चालू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे शहादा - उभादगड बसफेरी अजून चालू झाली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून सध्या तरी वंचितच राहावे लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहादा ते उभादगड ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केली आहे.

शाळा चालू होत असल्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला असला तरी शाळेत जायला बस नसल्यामुळे शाळा उघडूनही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. म्हणून शहादा ते उभादगड ही बस पूर्ववत चालू करावी.

- सुहास धनराज माळी, जयनगर, ता. शहादा, विद्यार्थी

कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने थोडे दिवस मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, बंद झालेली मंदिरे दुसरी लाट चालू झाल्यापासून शासनाने उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. आता मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी जयनगर येथे येण्यासाठी शहाद्याहून बसफेरी नसल्यामुळे श्री हेरंब गणेश देवस्थानात भाविकांना दर्शनास येण्यास अडचणीचे ठरणार आहे.

- हिरालाल माळी, अध्यक्ष, हेरंब गणेश देवस्थान ट्रस्ट, जयनगर