शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

शाळा सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:32 IST

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण ...

जयनगर : यावर्षी प्रथमच कोरोना महामारीच्या काळात शासनाने पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, शहादा ते उभादगड ही बसफेरीच बंद असल्याने आम्ही शाळेत जायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

राज्य शासनाने ४ ऑक्टोबरपासून पाचवी ते आठवीचे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक बसफेऱ्या बंद असल्यामुळे शाळा सुरू होणार असल्या तरी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. बसेस बंद असल्यामुळे नववी ते बारावीचे विद्यार्थी दुचाकी वाहनाने किंवा अवैध प्रवासी वाहनाने शहादा येथे महाविद्यालयात जात होते. मात्र, आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होत असल्याने सगळ्यांकडेच दोन दुचाकी वाहन असेल असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शहादा ते उभादगड ही बसफेरी बंद असल्यामुळे शाळेत जाता येणार नाहीये. जयनगर, धांद्रे, लोंढरे, निंभोरे, कहाटूळ येथील पाचवी ते आठवीच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी शहादा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. तर लोंढरे, धांद्रे बुद्रूक, निंभोरे, उभादगड, धांद्रे खुर्द येथील विद्यार्थी जयनगर येथील माध्यमिक विद्यालयात प्रवेशित आहेत. त्यांनाही बस नसल्यामुळे शाळेत जाता येणार नाही. शाळा चालू होणार असली तरी पूर्वीप्रमाणे शहादा - उभादगड बसफेरी अजून चालू झाली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून सध्या तरी वंचितच राहावे लागेल, असे चित्र आहे. त्यामुळे लवकरात लवकर शहादा ते उभादगड ही बसफेरी सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केली आहे.

शाळा चालू होत असल्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला असला तरी शाळेत जायला बस नसल्यामुळे शाळा उघडूनही विद्यार्थ्यांना शाळेत जाता येणार नाहीये. म्हणून शहादा ते उभादगड ही बस पूर्ववत चालू करावी.

- सुहास धनराज माळी, जयनगर, ता. शहादा, विद्यार्थी

कोरोना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर शासनाने थोडे दिवस मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. मात्र, बंद झालेली मंदिरे दुसरी लाट चालू झाल्यापासून शासनाने उघडण्यास परवानगी दिलेली नव्हती. आता मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी जयनगर येथे येण्यासाठी शहाद्याहून बसफेरी नसल्यामुळे श्री हेरंब गणेश देवस्थानात भाविकांना दर्शनास येण्यास अडचणीचे ठरणार आहे.

- हिरालाल माळी, अध्यक्ष, हेरंब गणेश देवस्थान ट्रस्ट, जयनगर