शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मानव विकासच्या बसअभावी विद्यार्थिनींचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 13:23 IST

तळोदा तालुका : बसेस व कर्मचा:यांचा अभाव; ठोस उपाययोजनांची गरज

तळोदा : शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील शालेय, महाविद्यालयीन मुलींना अपडाऊनसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून दिली असली तरी या मुलींना स्वतंत्र बसेसऐवजी इतर प्रवाशांसोबत प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. अर्थात यामागे पुरेशा बसेस आणि अपूर्ण कर्मचारीचे कारण सांगितले जात आहे. मात्र यावर पंचायत समिती प्रशासनाने व एस.टी. प्रशासनाने ठोस उपाययोजना करून मुलींना स्वतंत्र बसेस पुरविण्याची पालकांची अपेक्षा आहे.मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी राज्य शासनाने सन 2007-08 पासून संपूर्ण राज्यात मानव विकास मिशन ही योजना सुरू केली आहे. या योजनेत वेगवेगळ्या योजनेबरोबर विद्याथ्र्याना शैक्षणिक अभ्यास केंद्रे व ग्रामीण भागातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकण्यासाठी मोफत पास प्रवास ही योजनादेखील सुरू केली आहे. अक्कलकुवा बस आगाराकडूनही तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी चार बसेस सुरू केल्या आहेत. येथील बस स्थानक प्रमुखांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण तालुक्यातून न्यु हायस्कूल, शेठ के.डी. हायस्कू, नेमसुशिल विद्यालय, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजमध्ये साधारण 800 पेक्षा अधिक विद्यार्थिनी शिक्षणासाठी येतात. तळोदा-कोठार, तळोदा-तुळाजा, तळोदा-धनपूर व तळोदा-रामपूर अशा सात भागासाठी बस फे:यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्या-त्या परिसरातील मुली या बस फे:यांमध्ये तळोद्यात ये-जा करीत असतात. तथापि मुलींसाठी असलेल्या या बसेसमध्ये प्रवाशांनादेखील बसविले जात असते. साहजिकच मुलींनाही प्रवाशांसोबतच प्रवास करावा लागत आहे. या बसेसमध्ये जागा नसल्यास मुलींना उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याचे विद्यार्थिनी सांगतात, अशा वेळी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही सातत्याने निर्माण होत असतो.वास्तविक मानव विकास मिशनच्या योजनेतून विद्यार्थिनींना मोफत बस प्रवासात स्वतंत्र बस उपलब्ध करून त्यात फक्त मुलींनाच बसविण्याचे स्पष्ट नियमात म्हटले असतांना अक्कलकुवा बस प्रशासन सर्रास इतर प्रवाशांची वाहतूक त्या बसेसमध्ये करीत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनही दखल घ्यायला तयार नसल्याने बस प्रशासनाचेही फावले आहे. साहजिक हा प्रकार बिनबोभाटपणे सुरू आहे. या दोन्ही यंत्रणांच्या मासिक सभेत विद्यार्थिनींच्या बस फे:यांबाबत संबंधीतांकडून आढावा घेणे अपेक्षित असतांना केवळ औपचारिकताच पार पाडली जात असते. त्यामुळे अजूनही अक्कलकुवा बस प्रशासन विद्यार्थिनींना स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यास तयार नसल्याचे दिसून येते. अपूर्ण बसेसची संख्या व पुरेशा कर्मचा:यांअभावी स्वतंत्र बसेस उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे या यंत्रणेचे म्हणणे असले तरी त्यासाठी वरिष्ठ पातळीवर ठोस पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. स्थानिक प्रशासनाने सुद्धा याप्रकारणी संबंधीत प्रशासनास जाब विचारण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मुलींच्या सुरक्षिततेबाबत कायम प्रश्नचिन्ह निर्माण होईल. निदान याबाबत जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने तरीदखल घेण्याची पालकांची मागणी आहे.