शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

तळोदा पं.स.चे हातपंप दुरूस्तीपथक चार महिन्यापासून वाहनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी खाजगी वाहनांचा आधार घेतांना प्रचंड हाल होत असतात. यामुळे ग्रामीण भागातील साधारण ९० हातपंप नादुरूस्त पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या नादुरूस्त हातपंपामुळे त्या भागात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी साधारण ६५० हातपंप बसवून दिले आहेत. या हातपंपाच्या दुरूस्तीसाठी पंचायत समितीला स्वतंत्र दुरूस्ती पथकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तथापि हे दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यापासून वाहनाविना आहे. कारण येथील वाहनाच्या परवाना नूतनीकरणासाठी आरटीओकडे दरवर्षी पाठविण्यात येतो. त्या वेळी आरटीओनी वाहन वापरण्या योग्य नसल्यामुळे वाहनच जमा करून घेतले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आपल्या गावातील हातपंप नादुरूस्त झाले तर खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत असतो. यासाठी त्यांना मोठी रक्कमदेखील मोजावी लागत असते. त्याचबरोबर दुरूस्ती पथकाची एक हजार रूपयांची फीदेखील भरावी लागते. साहजिकच नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची ग्रामपंचायतींच्या प्रशासनाची व्यथा आहे. या आर्थिक फटक्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमधील साधारण ९० हातपंप दुरूस्तीअभावी तसेच धुळखात पडले असल्याचेही म्हटले जात आहे. आहेत तेवढ्या हातपंपावरच काम भागविले जात असल्याने त्या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.वास्तविक येथील पंचायत समितीच्या ग्रामीण पुरवठा विभागाने नवीन वाहनासाठी गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय संबंधीतांकडून पाठपुरावादेखील केला जात आहे. तरीही आजतागायत पंचायत समितीला वाहन उपलब्ध झालेले नाही. इकडे वाहनासाठी ग्रामपंचायतीचे प्रचंड हाल होत आहे. स्वत: हमाली करत साहित्याची व कर्मचाऱ्यांची ने आण करावी लागत आहे. निदान जिल्हा परिषदेने नवीन वाहनाऐवजी करारावर तरी दुसरे वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याबाबतही कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सद्या वाढणाºया प्रचंड तापमानाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांना वाहन उपलब्ध करण्यासाठी कडक तंबी द्यावी, अशी ग्रामीण जनतेची मागणी आहे.पंचायत समितीला हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या दुरूस्ती पथकात तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात तांत्रिकी सहाय्यक, वेल्डर, फीटर व वाहनचालक अशी तीन कर्मचारी कार्यरत असतात. तथापि सद्या एकाच कर्मचाºयावर कामाचा भार पडत आहे. कारण नादुरूस्त हातपंप दुरूस्ती वा बसविण्यासाठी तांत्रिकी सहाय्यक फीटर हे दोन कर्मचारी महत्वाची असतात. परंतु या पथकातील महत्त्वाचा सहाय्यक गेल्या मार्च महिन्यात वयोनियतनमानामुळे सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे हातपंप दुरूस्तीची कामे एकाच कर्मचाºयाला करावी लागत आहे. एवढेच नव्हे ग्रामपंचायतींनी हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या एक हजार रूपयांचे चलन संबंधीत बँकेत भरणे, रजिस्टरमध्ये दुरूस्तीची नोंद करणे, साहित्यांची दुरूस्ती करणे याशिवाय दुरूस्तीची कामे करणे, अशी कामेही त्या कर्मचाºयाला सांभाळावे लागत असते. वास्तविक नवीन तांत्रिक सहाय्यकाच्या नियुक्तीबाबतही यंत्रणेने प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला आहे. परंतु याबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. तालुक्यातील हातपंपाची संख्या लक्षात घेऊन हे पद तत्काळ भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.