शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा पं.स.चे हातपंप दुरूस्तीपथक चार महिन्यापासून वाहनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : येथील पंचायत समितीचे हातपंप दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यांपासून वाहनविना आहे. ग्रामपंचायतींना हातपंप दुरूस्तीसाठी खाजगी वाहनांचा आधार घेतांना प्रचंड हाल होत असतात. यामुळे ग्रामीण भागातील साधारण ९० हातपंप नादुरूस्त पडल्याची सूत्रांची माहिती आहे. या नादुरूस्त हातपंपामुळे त्या भागात कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थ सांगतात. जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी तातडीने दखल घेऊन वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी साधारण ६५० हातपंप बसवून दिले आहेत. या हातपंपाच्या दुरूस्तीसाठी पंचायत समितीला स्वतंत्र दुरूस्ती पथकदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तथापि हे दुरूस्ती पथक गेल्या चार महिन्यापासून वाहनाविना आहे. कारण येथील वाहनाच्या परवाना नूतनीकरणासाठी आरटीओकडे दरवर्षी पाठविण्यात येतो. त्या वेळी आरटीओनी वाहन वापरण्या योग्य नसल्यामुळे वाहनच जमा करून घेतले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आपल्या गावातील हातपंप नादुरूस्त झाले तर खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत असतो. यासाठी त्यांना मोठी रक्कमदेखील मोजावी लागत असते. त्याचबरोबर दुरूस्ती पथकाची एक हजार रूपयांची फीदेखील भरावी लागते. साहजिकच नाहक आर्थिक भुर्दंड भरावा लागत असल्याची ग्रामपंचायतींच्या प्रशासनाची व्यथा आहे. या आर्थिक फटक्यामुळे अनेक ग्रामपंचायतींमधील साधारण ९० हातपंप दुरूस्तीअभावी तसेच धुळखात पडले असल्याचेही म्हटले जात आहे. आहेत तेवढ्या हातपंपावरच काम भागविले जात असल्याने त्या भागातील नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.वास्तविक येथील पंचायत समितीच्या ग्रामीण पुरवठा विभागाने नवीन वाहनासाठी गेल्या तीन महिन्यापासून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविला आहे. शिवाय संबंधीतांकडून पाठपुरावादेखील केला जात आहे. तरीही आजतागायत पंचायत समितीला वाहन उपलब्ध झालेले नाही. इकडे वाहनासाठी ग्रामपंचायतीचे प्रचंड हाल होत आहे. स्वत: हमाली करत साहित्याची व कर्मचाऱ्यांची ने आण करावी लागत आहे. निदान जिल्हा परिषदेने नवीन वाहनाऐवजी करारावर तरी दुसरे वाहन उपलब्ध करून देण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याबाबतही कार्यवाही केली जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांकडून व्यक्त केली जात आहे.याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सद्या वाढणाºया प्रचंड तापमानाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन संबंधितांना वाहन उपलब्ध करण्यासाठी कडक तंबी द्यावी, अशी ग्रामीण जनतेची मागणी आहे.पंचायत समितीला हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या दुरूस्ती पथकात तीन कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात तांत्रिकी सहाय्यक, वेल्डर, फीटर व वाहनचालक अशी तीन कर्मचारी कार्यरत असतात. तथापि सद्या एकाच कर्मचाºयावर कामाचा भार पडत आहे. कारण नादुरूस्त हातपंप दुरूस्ती वा बसविण्यासाठी तांत्रिकी सहाय्यक फीटर हे दोन कर्मचारी महत्वाची असतात. परंतु या पथकातील महत्त्वाचा सहाय्यक गेल्या मार्च महिन्यात वयोनियतनमानामुळे सेवानिवृत्त झाला आहे. त्यामुळे हातपंप दुरूस्तीची कामे एकाच कर्मचाºयाला करावी लागत आहे. एवढेच नव्हे ग्रामपंचायतींनी हातपंप दुरूस्तीसाठी दिलेल्या एक हजार रूपयांचे चलन संबंधीत बँकेत भरणे, रजिस्टरमध्ये दुरूस्तीची नोंद करणे, साहित्यांची दुरूस्ती करणे याशिवाय दुरूस्तीची कामे करणे, अशी कामेही त्या कर्मचाºयाला सांभाळावे लागत असते. वास्तविक नवीन तांत्रिक सहाय्यकाच्या नियुक्तीबाबतही यंत्रणेने प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला आहे. परंतु याबाबत गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. तालुक्यातील हातपंपाची संख्या लक्षात घेऊन हे पद तत्काळ भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.