आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि केंद्रीय शालेय शिक्षण मंत्रालय तर्फे शालेय आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे. राज्यातील औरंगाबाद, बीड, धुळे, गडचिरोली, जळगांव, नांदेड, नंदुरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या नऊ जिल्ह्यातील इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या ९ हजार ६०० शाळाचे मुख्याध्यापक व दोन शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत. २२ ते २५ फेब्रुवारी असे चार दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात एकुण ११ सत्र होणार असुन या सत्रात तज्ञ मार्गदर्शकांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. बुधवारी तिसऱ्या दिवसाच्या सातव्या सत्रात नंदुरबार डायटच्या प्रा. डाॅ. वनमाला पवार यांनी अंमली पदार्थाच्या गैरवापरास प्रतिबंध व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. भारतात सुमारे ३४ लाख लोक अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यसनामुळे कुटुंब उध्वस्त होते त्यासाठी समाज विकसीत झाला पाहिजे. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी शिक्षक आणि पालकांची भूमिका महत्वाची ठरू शकते असेही वनमाला पवार यांनी सांगितले.
ऑनलाईन प्रशिक्षण वर्गात वनमाला पवार यांचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:39 IST