शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:28 IST

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात मे महिन्यात विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोरखी, होराफळी, वालंबा, ...

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात मे महिन्यात विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मोरखी, होराफळी, वालंबा, खडकापाणी या परिसरात कृषी सहायक सचिन राजपूत यांच्याकडून ग्रामपातळीवर पाड्यापाड्यांवर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी तंत्रज्ञान देण्यात येत आहे. यात बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असून, त्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले आहे. भात, मका, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, उडीद या पिकांच्या बियाण्यांची बीजप्रक्रिया केल्यास उत्पन्नात १५ टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येत असल्याचे सांगण्यात आले, तसेच भात पिकावरील करपा रोगाच्या व्यवस्थापनासाठी मिठाच्या पाण्याची बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. जे शेतकरी सोयाबीनसाठी घरचे बियाणे वापरतील त्यांना उगवण क्षमता चाचणी करण्याबाबत सूचित करून तसे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहेत. माती परीक्षण आधारित खत व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्चात बचत होऊन जोमदार पीक येते व जमिनीचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. जमिनीत जे अन्नद्रव्ये मुबलक आहे, अशा खताचा अनावश्यक खर्च टाळता येतो, तसेच खतांमध्ये विद्राव्य खते देणे, शिफारशीप्रमाणे खते देणे, फवारणी करून खते देणे आदींचा अवलंब केल्यास १० टक्क्यांपर्यंत खताची बचत होऊ शकते, असे सांगण्यात आले.

बीबीएफ (रुंद, सरी वरंबा) तंत्रज्ञानाबाबतही शेतकऱ्यांना अवगत करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने बीबीएफ यंत्राद्वारे उताराला आडवी पेरणी केल्यास मूलस्थानी जलसंधारण होण्यास मदत होते. आंतरपीक पद्धतीचा अवलंब केल्यास अधिकचे उत्पन्न घेता येते. बियाण्यांत २० ते२५ टक्के बचत होऊन उत्पन्नात ३० टक्के वाढ दिसून येते. वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवला जात असल्याने, पर्जन्यमान खंडाच्या कालावधीतही पाण्याच्या ताणाची तीव्रता कमी होते. जास्त पाऊस झाल्यास या पद्धतीमधील सरीमधून अतिरिक्त पाणी वाहून जाण्यास मदत होते व पीक घनता योग्य ठेवण्यास मदत होते. पिकांची जोमदार वाढ होऊन पीक कीड-रोगास बळी पडत नाही. भात पिकासाठी चारसूत्री पद्धतीचा अवलंब केल्यास फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले.

यावेळी कोरोना नियमांचे पालन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पोटे, उपविभागीय कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी नीलेश गढरी व मंडळ कृषी अधिकारी आर.एम. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम घेण्यात येत आहे. खरिपाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन मिळत असल्याने, परिसरातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.