शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:58 IST

कोठार ते धडगाव दरम्यानचा रस्ता : प्रवाशांचा जीव मुठीत घेवून प्रवास

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव ते कोठार दरम्यान असणा:या चांदसैली घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची व संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातील वाट अधिकच बिकट ठरत असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तीव्र चढाव व उतार, नागमोडी वळणे यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट ओळखला जातो. तळोद्याहून धडगांवकडे जातांना कोठारपासून पुढे घाटाला सुरूवात होते. नंदुरबारहून धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाट मार्गे अंतर कमी आहे. त्यामुळे बहुतेक वाहनधारक धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्गेच जाणे पसंत करतात. दिवसभर वाहनांची वर्दळ असणा:या या घाट मार्गात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता दरीच्या कडेला खचलेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेले आहेत. तीव्र चढाव व उतारामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे हे भगदाड वाहधरकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे अचानकपणे वाहने आदळली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.याशिवाय या घाटात सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांवर वाहने आदळली गेल्याने त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांच्या खालील जमीन खचल्याने संरक्षक कठळे उन्मळून पडले आहेत.            रस्त्याची व संरक्षक कठडय़ाच्या दुरवस्थेने घाटातील प्रवास करतांना प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच    असतो.कोठारपासून पुढे धडगांवपर्यतच्या घाटातील रस्त्यात रस्ता दुरुस्ती व अन्य कामांसाठी  टाकण्यात आलेली खडी व मुरूम रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वर्षभर तशीच पडलेली दिसून येते. घाटातील अरुंद रस्त्यावर खडी, मुरूम व रेती पसरत असल्यामुळे राहदारीस मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. शिवाय त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार देखील सातत्याने घडून    येतात.चांदसैली घाटातील काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही रस्ता हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षापासून चांदसैली घाटातील रस्त्याची, संरक्षक कठडय़ांची दुरवस्था, संरक्षक कठडय़ांचा अभाव अश्या समस्या सातत्याने निर्माण होत आलेल्या आहेत. या समस्यांवर नेहमीच  तात्पुरती उपाययोजना करण्यात येते. मात्र कायमस्वरुपी उपाय केले जात नसल्यामुळे वर्षभर या घाटातून प्रवास करतांना प्रवाशांचा जीव टांगणीलाच असतो. वर्षभर विविध कारणांनी अपघातदेखील घडून येत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.