शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

चांदसैली घाटात संरक्षक कठडय़ांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 12:58 IST

कोठार ते धडगाव दरम्यानचा रस्ता : प्रवाशांचा जीव मुठीत घेवून प्रवास

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव ते कोठार दरम्यान असणा:या चांदसैली घाटात अनेक ठिकाणी रस्त्याची व संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे घाटातील वाट अधिकच बिकट ठरत असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.तीव्र चढाव व उतार, नागमोडी वळणे यामुळे सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात धोकेदायक घाट म्हणून चांदसैलीचा घाट ओळखला जातो. तळोद्याहून धडगांवकडे जातांना कोठारपासून पुढे घाटाला सुरूवात होते. नंदुरबारहून धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाट मार्गे अंतर कमी आहे. त्यामुळे बहुतेक वाहनधारक धडगांवला जाण्यासाठी चांदसैली घाटमार्गेच जाणे पसंत करतात. दिवसभर वाहनांची वर्दळ असणा:या या घाट मार्गात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता दरीच्या कडेला खचलेला आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलेले आहेत. तीव्र चढाव व उतारामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे हे भगदाड वाहधरकांच्या सहजासहजी लक्षात येत नाही. त्यामुळे अचानकपणे वाहने आदळली जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण असते. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.याशिवाय या घाटात सुमारे एक ते दोन वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या संरक्षक कठडय़ांची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांवर वाहने आदळली गेल्याने त्यांचीदेखील दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणच्या संरक्षक कठडय़ांच्या खालील जमीन खचल्याने संरक्षक कठळे उन्मळून पडले आहेत.            रस्त्याची व संरक्षक कठडय़ाच्या दुरवस्थेने घाटातील प्रवास करतांना प्रवाश्यांचा जीव टांगणीलाच    असतो.कोठारपासून पुढे धडगांवपर्यतच्या घाटातील रस्त्यात रस्ता दुरुस्ती व अन्य कामांसाठी  टाकण्यात आलेली खडी व मुरूम रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी वर्षभर तशीच पडलेली दिसून येते. घाटातील अरुंद रस्त्यावर खडी, मुरूम व रेती पसरत असल्यामुळे राहदारीस मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण होतात. शिवाय त्यामुळे दुचाकी घसरण्याचे प्रकार देखील सातत्याने घडून    येतात.चांदसैली घाटातील काही रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तळोदा उपविभागात तर काही रस्ता हा नंदुरबार उपविभागाच्या हद्दीत येतो. गेल्या अनेक वर्षापासून चांदसैली घाटातील रस्त्याची, संरक्षक कठडय़ांची दुरवस्था, संरक्षक कठडय़ांचा अभाव अश्या समस्या सातत्याने निर्माण होत आलेल्या आहेत. या समस्यांवर नेहमीच  तात्पुरती उपाययोजना करण्यात येते. मात्र कायमस्वरुपी उपाय केले जात नसल्यामुळे वर्षभर या घाटातून प्रवास करतांना प्रवाशांचा जीव टांगणीलाच असतो. वर्षभर विविध कारणांनी अपघातदेखील घडून येत असतात. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.