शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

गाड्या कमी तरीही जागेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा ...

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा देशातील इतर ठिकाणी जाणा-या प्रवाशांना रिझर्व्हेशन केल्यानंतर गाडी येईपर्यंत तिकीट कन्फर्म होत असल्याने सोय होत आहे.

उधना ते जळगाव रेल्वे मार्गावरच्या प्रमुख स्थानकांपैकी एक नंदुरबार आहे. गुजरात राज्यातून येणारे व जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. कोरोना संक्रमणानंतर मात्र या संख्येवर परिणाम झाला होता. जून २०२० पासून रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक निर्बंध असल्याने गर्दीवर नियंत्रण होते. यातून मुंबई किंवा इतर शहरांसाठी जाण्याकरिता जागेचे आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातून सर्वच प्रवासी जागा आरक्षित करण्यास प्राधान्य देत आहेत. यातून रेल्वेतून प्रवास करण्याची शिस्त लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान नंदुरबार रेल्वेस्थानकातून सुमारे ४० गाड्यांचे आरक्षण करता येते. यात सर्वाधिक प्राधान्य हे मुंबई, अहमदाबाद, सुरत व नागपूर या शहरांना देण्यात येते. या शहरांसाठी तिकिट काढण्यात आल्यानंतर गाडी येण्याच्या दिवसापर्यंत ते जागा निश्चित होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान यातून जळगाव केिंवा भुसावळ जातानाही रेल्वे रिझर्व्हेशन करुनच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चार्टवरुन दिसून आले.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून दिवसाला सात गाड्या नियमितपणे धावतात. तर ४० गाड्या ह्या साप्ताहिक धावतात. या सर्व गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे. यामुळे प्रवाशांची स्थानकात तपासणी केली जाते. मुंबई येथे जाण्यासाठी भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्सप्रेस, बांद्रा पटना आणि गोरखपूर ते बांद्रा अशा तीन गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षण केल्यानंतर काही तासात तिकीट कन्फर्म होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान उत्तर भारताकडे जाणा-या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, अकोला व नागपूर या भागात जाणा-यांनाही तिकिट कन्फर्म होत असल्याने अडचणी येत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. यामुळे प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईसाठी वेटिंगच नाही

नंदुरबार रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या ४० गाड्यांपैकी निम्मे गाड्या ह्या उत्तर भारतात तर निम्मे गाड्या दक्षिण भारताकडे रवाना होतात. मुंबई येथे जाण्यासाठी खास सोय म्हणून खान्देश एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. या गाडीला वेळीच रिझर्व्हेशन मिळत असल्याने अडचणी दूर झाल्या आहेत. प्रवाशांना बांद्रा-पटना व गोरखपूर-बांद्रा या साप्ताहिक गाड्यांचे ही रिझर्व्हेशन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरक्षण केल्यानंतर सीट मिळणारच

दरम्यान याबाबत नंदुरबार रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्टर सुभाष मंडल यांना संपर्क केला असता, गाड्यांची संख्या कमी असली तरी प्रवासी संख्या नियंत्रणात आहे. यातून प्रत्येकाला जागा मिळेल यासाठी नियोजन केले जाते. रेल्वेच्या ऑनलाईन सिस्टिममध्ये त्या-त्या शहरानुसार जागा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.