शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
2
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
3
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
4
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
5
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
6
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
7
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
8
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
9
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
10
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
11
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
12
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
13
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
14
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
15
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
16
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
17
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
18
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
19
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
20
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

गाड्या कमी तरीही जागेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा ...

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा देशातील इतर ठिकाणी जाणा-या प्रवाशांना रिझर्व्हेशन केल्यानंतर गाडी येईपर्यंत तिकीट कन्फर्म होत असल्याने सोय होत आहे.

उधना ते जळगाव रेल्वे मार्गावरच्या प्रमुख स्थानकांपैकी एक नंदुरबार आहे. गुजरात राज्यातून येणारे व जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. कोरोना संक्रमणानंतर मात्र या संख्येवर परिणाम झाला होता. जून २०२० पासून रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक निर्बंध असल्याने गर्दीवर नियंत्रण होते. यातून मुंबई किंवा इतर शहरांसाठी जाण्याकरिता जागेचे आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातून सर्वच प्रवासी जागा आरक्षित करण्यास प्राधान्य देत आहेत. यातून रेल्वेतून प्रवास करण्याची शिस्त लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान नंदुरबार रेल्वेस्थानकातून सुमारे ४० गाड्यांचे आरक्षण करता येते. यात सर्वाधिक प्राधान्य हे मुंबई, अहमदाबाद, सुरत व नागपूर या शहरांना देण्यात येते. या शहरांसाठी तिकिट काढण्यात आल्यानंतर गाडी येण्याच्या दिवसापर्यंत ते जागा निश्चित होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान यातून जळगाव केिंवा भुसावळ जातानाही रेल्वे रिझर्व्हेशन करुनच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चार्टवरुन दिसून आले.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून दिवसाला सात गाड्या नियमितपणे धावतात. तर ४० गाड्या ह्या साप्ताहिक धावतात. या सर्व गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे. यामुळे प्रवाशांची स्थानकात तपासणी केली जाते. मुंबई येथे जाण्यासाठी भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्सप्रेस, बांद्रा पटना आणि गोरखपूर ते बांद्रा अशा तीन गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षण केल्यानंतर काही तासात तिकीट कन्फर्म होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान उत्तर भारताकडे जाणा-या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, अकोला व नागपूर या भागात जाणा-यांनाही तिकिट कन्फर्म होत असल्याने अडचणी येत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. यामुळे प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईसाठी वेटिंगच नाही

नंदुरबार रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या ४० गाड्यांपैकी निम्मे गाड्या ह्या उत्तर भारतात तर निम्मे गाड्या दक्षिण भारताकडे रवाना होतात. मुंबई येथे जाण्यासाठी खास सोय म्हणून खान्देश एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. या गाडीला वेळीच रिझर्व्हेशन मिळत असल्याने अडचणी दूर झाल्या आहेत. प्रवाशांना बांद्रा-पटना व गोरखपूर-बांद्रा या साप्ताहिक गाड्यांचे ही रिझर्व्हेशन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरक्षण केल्यानंतर सीट मिळणारच

दरम्यान याबाबत नंदुरबार रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्टर सुभाष मंडल यांना संपर्क केला असता, गाड्यांची संख्या कमी असली तरी प्रवासी संख्या नियंत्रणात आहे. यातून प्रत्येकाला जागा मिळेल यासाठी नियोजन केले जाते. रेल्वेच्या ऑनलाईन सिस्टिममध्ये त्या-त्या शहरानुसार जागा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.