शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
2
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
4
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
5
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
6
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
7
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
8
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
9
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
10
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
11
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
12
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
13
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
14
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
15
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
16
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
17
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
18
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
20
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार

गाड्या कमी तरीही जागेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:29 IST

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा ...

नंदुरबार : गेल्या वर्षापासून रेल्वे प्रवास हा अत्यंत सुकर झाल्याचे सध्या दिसून येत आहे. प्रवाशांची संख्या घटल्याने मुंबई किंवा देशातील इतर ठिकाणी जाणा-या प्रवाशांना रिझर्व्हेशन केल्यानंतर गाडी येईपर्यंत तिकीट कन्फर्म होत असल्याने सोय होत आहे.

उधना ते जळगाव रेल्वे मार्गावरच्या प्रमुख स्थानकांपैकी एक नंदुरबार आहे. गुजरात राज्यातून येणारे व जाणारे प्रवासी मोठ्या संख्येने या मार्गाचा वापर करतात. कोरोना संक्रमणानंतर मात्र या संख्येवर परिणाम झाला होता. जून २०२० पासून रेल्वे सेवा सुरु झाल्यानंतर प्रवासी गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी अनेक निर्बंध असल्याने गर्दीवर नियंत्रण होते. यातून मुंबई किंवा इतर शहरांसाठी जाण्याकरिता जागेचे आरक्षण करणे सक्तीचे करण्यात आले आहे. यातून सर्वच प्रवासी जागा आरक्षित करण्यास प्राधान्य देत आहेत. यातून रेल्वेतून प्रवास करण्याची शिस्त लागल्याचे समोर आले आहे. दरम्यान नंदुरबार रेल्वेस्थानकातून सुमारे ४० गाड्यांचे आरक्षण करता येते. यात सर्वाधिक प्राधान्य हे मुंबई, अहमदाबाद, सुरत व नागपूर या शहरांना देण्यात येते. या शहरांसाठी तिकिट काढण्यात आल्यानंतर गाडी येण्याच्या दिवसापर्यंत ते जागा निश्चित होत असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान यातून जळगाव केिंवा भुसावळ जातानाही रेल्वे रिझर्व्हेशन करुनच प्रवास करण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चार्टवरुन दिसून आले.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून दिवसाला सात गाड्या नियमितपणे धावतात. तर ४० गाड्या ह्या साप्ताहिक धावतात. या सर्व गाड्यांना नंदुरबार येथे थांबा आहे. यामुळे प्रवाशांची स्थानकात तपासणी केली जाते. मुंबई येथे जाण्यासाठी भुसावळ ते बांद्रा खान्देश एक्सप्रेस, बांद्रा पटना आणि गोरखपूर ते बांद्रा अशा तीन गाड्या आहेत. या गाड्यांमध्ये आरक्षण केल्यानंतर काही तासात तिकीट कन्फर्म होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. दरम्यान उत्तर भारताकडे जाणा-या गाड्यांमधून जळगाव, भुसावळ, अकोला व नागपूर या भागात जाणा-यांनाही तिकिट कन्फर्म होत असल्याने अडचणी येत नसल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. यामुळे प्रवासी संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

मुंबईसाठी वेटिंगच नाही

नंदुरबार रेल्वेस्थानकातून जाणाऱ्या ४० गाड्यांपैकी निम्मे गाड्या ह्या उत्तर भारतात तर निम्मे गाड्या दक्षिण भारताकडे रवाना होतात. मुंबई येथे जाण्यासाठी खास सोय म्हणून खान्देश एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. या गाडीला वेळीच रिझर्व्हेशन मिळत असल्याने अडचणी दूर झाल्या आहेत. प्रवाशांना बांद्रा-पटना व गोरखपूर-बांद्रा या साप्ताहिक गाड्यांचे ही रिझर्व्हेशन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.

आरक्षण केल्यानंतर सीट मिळणारच

दरम्यान याबाबत नंदुरबार रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्टर सुभाष मंडल यांना संपर्क केला असता, गाड्यांची संख्या कमी असली तरी प्रवासी संख्या नियंत्रणात आहे. यातून प्रत्येकाला जागा मिळेल यासाठी नियोजन केले जाते. रेल्वेच्या ऑनलाईन सिस्टिममध्ये त्या-त्या शहरानुसार जागा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.