शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचे मोठे दिव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:33 IST

नंदुरबार : पाचवी ते आठवीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांना हायसे वाटले आहे. गेल्या शैक्षणिक ...

नंदुरबार : पाचवी ते आठवीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांना हायसे वाटले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात अवघे तीन महिने शाळेत जाण्यास मिळाले होते. यंदा तर शाळाच सुरू झाली नाही. सुरू होणार असलेल्या शाळांपैकी ५८ टक्के शाळा व विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी शाळांना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. दरम्यान, आठवी ते १२ वीचे वर्ग सुरू असले तरी त्यांच्यातील उपस्थिती ६० टक्क्यांपेक्षा अधिक जात नसल्याचे चित्र आहे.

आठवी ते १२ वीच्या वर्गानंतर आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ४ ऑक्टोबरपासून या वर्गांची घंटा वाजणार आहे. शाळेत पाठविण्यासंदर्भात पालकांवर निर्णय सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती किती आणि कशी राहील याबाबत मात्र शिक्षण विभागदेखील साशंक आहे.

एक दिवसाआड शक्य

अनेक शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त आहे. त्यामुळे एका बाकावर एक विद्यार्थी बसविले तर एका वर्गाला एक दिवसाआड बोलवावे लागणार आहे. त्याशिवाय नियोजन शक्य नाही हे स्पष्ट आहे. परिणामी, शाळा सुरू झाल्या तरी आठवड्यातून तीनच दिवस शाळेत जाण्यास मिळणार आहे.

वाहतुकीच्या साधनांचा अभाव

सद्य:स्थितीत जवळपास सर्वच आगारांच्या एस.टी. बस फेऱ्या ग्रामीण भागात अगदीच कमी आहेत. शहरी भागात रिक्षातून आणि स्कूलबसमधून वाहतूक करण्यासही परवानगी नाही. अशा वेळी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतुकीच्या साधनांच्या अभावाला तोंड द्यावे लागणार आहे. यामुळे शाळेतील त्यांच्या उपस्थितीवरही परिणाम राहणार आहे. गेल्या वर्षीदेखील हीच परिस्थिती निर्माण झाली होती.

नववी ते १२ वी उपस्थिती

सद्य:स्थितीत नववी ते १२ वीचे वर्ग सुरू असले तरी त्यातील विद्यार्थी उपस्थिती ६० टक्क्यांपेक्षा अधिक गेेलेली नाही. त्याला कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना येण्यासाठी बस उपलब्ध नसणे, शहरी भागात रिक्षा उपलब्ध नसणे व इतर कारणे आहेत. त्यामुळे पाचवी ते आठवीच्या वर्गातील उपस्थितीबाबतही साशंकताच आहे.

गणवेश सक्ती नको

गेल्या वर्षी गणवेशाची सक्ती नसली तरीही अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश घेण्यास भाग पाडले होते; परंतु अवघे तीन महिनेच शाळा सुरू राहिली. परिणामी, घेतलेले ड्रेस काहीही कामी आले नाहीत. यावर्षी ते ड्रेस वापरण्याजोगी नाहीत. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेशातच आले पाहिजे ही सक्ती करू नये, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

पुस्तके सर्व मिळालीच नाहीत

अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. त्यात शहरातील नामांकित शाळांचा देखील समावेश आहे. त्यातच बाजारात ती पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. एका विद्यार्थ्याला किमान दोन ते तीन विषयांची पुस्तके मिळालेली नाहीत. त्यामुळे ऑनलाइन आलेल्या अभ्यासावर त्या विषयाचे किती ज्ञान तो विद्यार्थी ग्राह्य करेल याबाबत शंकाच आहे. शाळा सुरू झाल्यानंतर तरी संबंधित विषयांची पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शाळांचे कर्तव्य आहे.