शहरं
Join us  
Trending Stories
1
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
2
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
3
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
4
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं Qualifier 2 जिंकत दोन वेळा उंचावलीये ट्रॉफी! पंजाबला ते एकदाही नाही जमलं
6
Onion Price Hike : महाराष्ट्रात कांद्याचे भाव गगनाला भिडणार? नेमकं करण तरी काय?
7
Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?
8
'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट', केंद्रीय मंत्री चिराग पासवान विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत
9
सनातन धर्माला काहीही बोललं जातं तेव्हा हा राग कुठे जातो? शर्मिष्ठा पनोलीच्या अटकेवरून पवन कल्याण संतप्त
10
"पाकिस्तानने आधीच सिंधु पाणी कराराचे उल्लंघन केलेय", पाकच्या कांगाव्याला भारताकडून सडेतोड उत्तर!
11
विमान प्रवास होणार स्वस्त? विमान इंधनाच्या किमती सलग तिसऱ्यांदा घटल्या; काय आहेत सध्याचे दर?
12
अजित पवार यांना मोठा झटका, 7 आमदारांनी राम-राम ठोकला; या पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला
13
नातेवाईक बाहेर करत राहिले विरोध, पोलिसांनी ठाण्यात लावून दिलं लग्न, पोलीसच बनले वऱ्हाडी आणि...  
14
टाटा-रिलायन्सला सरकारी कंपनी ठरली सरस! आठवड्यात कमावला ५९,२३३ कोटी रुपयांचा नफा
15
३० कोटींची लॉटरी जिंकून पैसे गर्लफ्रेंडला दिले, दुसऱ्यासोबत फुर्र होऊन तिने बॉयफ्रेंडलाच कंगाल केले! 
16
भारताची नवीन 'रेड लाईन', पाकिस्तानात 300 KM घुसून हल्ले, CDS चौहान यांची मोठी माहिती
17
ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  
18
पुढील आठवड्यात शेअर बाजारात 'लिस्टिंगचा धमाका'! १० कंपन्या करणार दणक्यात पदार्पण, गुंतवणूकदारांची चांदी?
19
रोज ६,५०० तरुणांची तंबाखूसेवनाला सुरुवात, दरवर्षी १८ लाख जण गमावतात आपला जीव
20
"संविधानामुळेच आपला देश संकटकाळातही एकसंध"; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे विधान

ग्रामसेवक व प्रशासकाने समन्वय ठेवून कार्यवाही करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक ...

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासकाने आपसात समन्वय ठेवून त्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

तळोदा येथील सांस्कृतिक भवनात शुक्रवारी ग्रामीण भागातील पाणीटंचाई व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, सभापती यशवंत ठाकरे, गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. दरेवार, पंचायत समिती सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, वनक्षेत्रपाल नीलेश रोढे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी अमोल मेटकर, सानुबाई वळवी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई, घरकुले, वनपट्टे, या प्रश्नांची गावनिहाय आढावा तेथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून घेतला. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन हातपंप जीर्ण जलवाहिन्या, कूपनलिका यांची मागणी सरपंचांनी केली आहे. त्याचबरोबर अनेक पाड्यांमध्ये पाणी प्रश्न आजही असून, त्यांना झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. काही गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जीर्ण तारा, पोल, नवीन पोल नसल्यामुळे विजेची समस्या असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तब्बल तीन ते चार तास ही आढावा बैठक सुरू होती. आढावा घेतल्यानंतर आमदार पाडवी यांनी उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तेथे शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुविधा देण्यात येतील. शिवाय जेथे वीज, रस्ते हे प्रश्न आहेत तेथे माझ्या डोंगरी विकास निधीतून कामे घेण्यात येतील. परंतु यासाठी ग्रामसेवकांनी तसा प्रस्ताव तातडीने पाठवावा; जेणे करून त्यावर लगेच कार्यवाही करता येईल, असे सांगून तळोदा तालुक्यात जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त झाले आहे. त्यामुळे या प्रशासकांनी गावाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ग्रामसेवकांशी समन्वय ठेवून गावकऱ्यांशी संवाद साधावा. तसेही प्रशासकांना शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन प्रश्न सोडवावे. अनेक गावातील गावकऱ्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखून त्या सोडवण्याच्या प्रयत्न करावा. जेथील तक्रारी येतील तेथील कर्मचाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

सूत्रसंचालन ग्रामसेवक मधुकर कापुरे यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीत ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.