शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

युवा प्रयत्नांनी घडविली विकास वाटेची ‘ग्रामसंसद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:13 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा नागरी विकास होवून ते मुळ प्रवाहात राहावेत यासाठी हा संदेश उपयुक्त ठरतो. महात्मा गांधींच्या या संदेशाची प्रचिती बोळझळ, ता.नवापूर या गावात पाय ठेवल्यानंतर येतो. गावाच्या विकासाला डिजिटल प्रयत्नांची जोड देत राहुल गावीत या युवा सरपंचने ग्रामविकासाचा गाडा वेगवान ठेवला आहे.२४ जुलै २०१६ पासून बोकळझळ, ता.नवापूर या गावाची धुरा राहुल उदेसिंग गावीत हा ३३ वर्षीय युवक सरपंच सांभाळतो आहे. बी.एड.चे शिक्षण झाल्यानंतर एखाद्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून सहज रूजू होता येईल एवढे गुणही त्यांनी प्राप्त केले होते. परंतु ग्रामीण भागाचा किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो. त्या भूमिचा विकास करण्याची जबाबदारी आपणच घ्यावी म्हणून समाज कारणाचा वसा घेत गावात काम सुरू केले आहे. २०१६ मध्ये प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवून थेट सरपंच पदाला गवसनी घातली. सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी काय करता येईल याचा अ‍ॅक्शन प्लॅन ग्रामस्थांच्या संमतीने तयार करून घेतला. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी, वृक्षारोपण, शौचालय याची उभारणी कशी करावी यासाठी गावातील प्रत्येकाचे मत जाणून घेऊन ग्रामपंचायत व पेसा निधीतून कामे करून घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली. याची फलश्रृती म्हणजे गावाला आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हास्तराचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराची रक्कम ५० लाख रूपये असल्याने त्यातूनही ग्रामविकासासाठी काय करता येईल याचे नियोजन करून घेतले. गेल्या तीन वर्षांपासून गावाची समर्थपणे धुरा सांभाळणाऱ्या ३३ वर्षीय राहुल गावीत यांनी तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींचे सरपंच एकत्र करून अखिल भारतीय सरपंच परिषदेत त्यांचा समावेश करून घेतला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.पुढील काळात गावाचा विकास आणखी प्रगल्भपणे व्हावा यासाठी बोकळझळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळांचे सर्व वर्ग डिजिटल करून विद्यार्थ्यांना ई-लर्निंग करण्यासाठी ग्रामपंचायत साहित्य उपलब्ध करून देणार आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बालवयात डिजिटल माध्यमांची ओळख करून देण्यासाठी अंगणवाडीतही प्रगल्भ साधनांचा उपयोग केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षणासाठी बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संपूर्णपणे डिजिटल ग्रामपंचायत असलेल्या बोकळझळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तूर्तास विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येते. गावात शेती आणि रोजगार या संबंधी नियमित मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. गाव विकासासाठी झटणाºया या युवा सरपंचाला विचारणा केली असता गाव माझं आहे, लोकांनी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी त्यांचा विश्वास सार्थ करून विकासाचा वेग वाढता ठेवायचा आहे. यातून येथील येत्या पिढ्या ह्या समजदार आणि शिक्षित होणार आहेत.स्मार्ट व्हिलेज पुरस्कार पटकावल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या. याच दरम्यान, अंगणवाड्या सुशोभित करून बालकांच्या पोषणात कमतरता येणार नाही यासाठी लक्ष दिले. गावाच्या चौफेर विकासाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय ग्रामविकास विभागातर्फे बोकळझळ ग्रामपंचायतीला पंडित दिनदयाल उपाध्याय राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारी बोकळझळ ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव आहे. ग्रामपंचायतीला ग्रामसंसद असे नाव देत युवकांकडून गावाच्या विकासासाठी काय करून घेता येईल यासाठी येथे दर आठवड्याला त्यांच्या बैठकाही घेतात. २०१७ मध्ये रंगावली नदीला आलेल्या पुरात बोकळझळ ग्रामपंचायत व गाव बाधीत झाले होते. यातून अवघ्या दोन महिन्यात सावरण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे राबविला.