शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

युवा प्रयत्नांनी घडविली विकास वाटेची ‘ग्रामसंसद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 12:13 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा ...

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खेड्याकडे चला असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला आहे. ग्रामीण जीवनाचा नागरी विकास होवून ते मुळ प्रवाहात राहावेत यासाठी हा संदेश उपयुक्त ठरतो. महात्मा गांधींच्या या संदेशाची प्रचिती बोळझळ, ता.नवापूर या गावात पाय ठेवल्यानंतर येतो. गावाच्या विकासाला डिजिटल प्रयत्नांची जोड देत राहुल गावीत या युवा सरपंचने ग्रामविकासाचा गाडा वेगवान ठेवला आहे.२४ जुलै २०१६ पासून बोकळझळ, ता.नवापूर या गावाची धुरा राहुल उदेसिंग गावीत हा ३३ वर्षीय युवक सरपंच सांभाळतो आहे. बी.एड.चे शिक्षण झाल्यानंतर एखाद्या शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक म्हणून सहज रूजू होता येईल एवढे गुणही त्यांनी प्राप्त केले होते. परंतु ग्रामीण भागाचा किंवा आपण ज्या ठिकाणी राहतो. त्या भूमिचा विकास करण्याची जबाबदारी आपणच घ्यावी म्हणून समाज कारणाचा वसा घेत गावात काम सुरू केले आहे. २०१६ मध्ये प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवून थेट सरपंच पदाला गवसनी घातली. सरपंच म्हणून निवड झाल्यानंतर गावाच्या विकासासाठी काय करता येईल याचा अ‍ॅक्शन प्लॅन ग्रामस्थांच्या संमतीने तयार करून घेतला. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, गटारी, वृक्षारोपण, शौचालय याची उभारणी कशी करावी यासाठी गावातील प्रत्येकाचे मत जाणून घेऊन ग्रामपंचायत व पेसा निधीतून कामे करून घेत ती यशस्वीरित्या पूर्ण केली. याची फलश्रृती म्हणजे गावाला आॅगस्ट २०१७ मध्ये जिल्हास्तराचा स्मार्ट व्हिलेज पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराची रक्कम ५० लाख रूपये असल्याने त्यातूनही ग्रामविकासासाठी काय करता येईल याचे नियोजन करून घेतले. गेल्या तीन वर्षांपासून गावाची समर्थपणे धुरा सांभाळणाऱ्या ३३ वर्षीय राहुल गावीत यांनी तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींचे सरपंच एकत्र करून अखिल भारतीय सरपंच परिषदेत त्यांचा समावेश करून घेतला. परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत.पुढील काळात गावाचा विकास आणखी प्रगल्भपणे व्हावा यासाठी बोकळझळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाºया जिल्हा परिषद शाळांचे सर्व वर्ग डिजिटल करून विद्यार्थ्यांना ई-लर्निंग करण्यासाठी ग्रामपंचायत साहित्य उपलब्ध करून देणार आहे. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना बालवयात डिजिटल माध्यमांची ओळख करून देण्यासाठी अंगणवाडीतही प्रगल्भ साधनांचा उपयोग केला जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शिक्षणासाठी बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहाय्य देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संपूर्णपणे डिजिटल ग्रामपंचायत असलेल्या बोकळझळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तूर्तास विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येते. गावात शेती आणि रोजगार या संबंधी नियमित मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जात आहेत. गाव विकासासाठी झटणाºया या युवा सरपंचाला विचारणा केली असता गाव माझं आहे, लोकांनी जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी त्यांचा विश्वास सार्थ करून विकासाचा वेग वाढता ठेवायचा आहे. यातून येथील येत्या पिढ्या ह्या समजदार आणि शिक्षित होणार आहेत.स्मार्ट व्हिलेज पुरस्कार पटकावल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल केल्या. याच दरम्यान, अंगणवाड्या सुशोभित करून बालकांच्या पोषणात कमतरता येणार नाही यासाठी लक्ष दिले. गावाच्या चौफेर विकासाच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय ग्रामविकास विभागातर्फे बोकळझळ ग्रामपंचायतीला पंडित दिनदयाल उपाध्याय राष्टÑीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार प्राप्त करणारी बोकळझळ ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव आहे. ग्रामपंचायतीला ग्रामसंसद असे नाव देत युवकांकडून गावाच्या विकासासाठी काय करून घेता येईल यासाठी येथे दर आठवड्याला त्यांच्या बैठकाही घेतात. २०१७ मध्ये रंगावली नदीला आलेल्या पुरात बोकळझळ ग्रामपंचायत व गाव बाधीत झाले होते. यातून अवघ्या दोन महिन्यात सावरण्याचा प्रयोगही त्यांनी यशस्वीपणे राबविला.