शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

शहादा तालुक्यातील ग्रामपंचायतीनी लाॅकडाऊनमधील विवाह नोंदणीला दिली तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST

बामखेडा : विवाह नोंदणी अत्यावश्यक असताना अद्यापही बहुतांश नागरिक याबाबतीत उदासीन आहेत. दर वर्षी होणारे विवाह आणि त्यांची शासकीय ...

बामखेडा : विवाह नोंदणी अत्यावश्यक असताना अद्यापही बहुतांश नागरिक याबाबतीत उदासीन आहेत. दर वर्षी होणारे विवाह आणि त्यांची शासकीय दप्तरी होणारी नोंदणी याची आकडेवारी निराशाजनक आहे. वैवाहिक दाम्पत्य व कुटुंबातील सदस्य विवाह नोंदणीला फारसे महत्त्व देत नाहीत. स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे कुटुंब याला अपवाद नाहीत. जे काही जागृत नागरिक होते त्यांनीही या कोरोनाच्या संचारबंदीत विवाह नोंदणीला अपवाद वगळता तिलांजली दिल्याचे चित्र आहे. यात प्रशासनाला देखील स्वारस्य दिसत नाही. विवाह नोंदणी महत्वाची असताना नागरिक आणि प्रशासन दोन्हीही घटक याबाबतीत उदासीन आहेत. विवाह नोंदणी करण्याविषयी जागरूकता आवश्यक आहे.

विवाह नोंदणी करणे ही बाब कायद्यानुसार बंधनकारक आहे. विशेष म्हणजे विवाह नोंदणी करीता सोयीचे व्हावे म्हणून स्थानिक ग्रामपंचायत मध्येच ठरवून दिलेले पुरावे सादर करीत विवाह नोंदणी करणे कायद्याने अनिवार्य आसताना कोरोनातील लाॅकडाऊनमध्ये जमाव बंदी आसताना सुध्दा अनेक विवाह झाले. परंतु पुराव्याअभावी विवाह नोंदणीला तिलांजली दिल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. सन २०१९ मध्ये तालुक्यातील झालेल्या विवाहाच्या काही नोंदी पंचायत समितीकडे आल्या. तर सन २०२० मध्ये झालेल्या विवाहांपैकी एकाही विवाहाची नोंद पंचायत समितीकडे आलेली नाही. याप्रकरणी संबंधित प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आसल्याचे बोलो जात आहे.

कोरोणा विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बाबीवर लाॅकडाऊन घोषीत केला होता. ही संचारबंदी ऐन लग्न समारंभाच्या दिवसामध्ये आल्याने अनेक उपवर वर-वधूंकडील कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली. परंतु प्रशासनाने पुढे टप्प्या टप्पाने लाॅकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली आणि ५० व्यक्तींच्या समुहाला लाॅकडाऊनचे नियम पाळत विवाह-समारंभाला सवलत दिली.

या दरम्यान मोठ्या प्रमाणात अनेक गावामध्ये लाॅकडाऊनचे ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवित मोठ्या जोमाने विविह-समारंभ साजरे झाले. परंतु स्थानिक ग्रामपंचायत अंतर्गत विवाह नोंदणीला मोठ्या प्रमाणात तिलांजली दिल्याचे दिसून आले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये विवाह नोंदणी करावयाची असल्यास प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार विवाह नोंदणी करीता.

मुद्रांक पेपरवर घोषणापत्र, वर-वधूचे आधार कार्ड, शाळेचा दाखला, वर-वधू यांचे वय अनुक्रमे २१ व १८ आणि विवाहाची लग्न पत्रिका अनिवार्य आहे. परंतु लाॅकडाऊन दरम्यान जेवढे विवाह झाले. त्यापैकी बहुतांश विवाह हे लग्ण पत्रिकाविनाच पार पाडल्या गेल्याने ग्रामपंचायत कार्यालयातील विवाह नोंदणी करीता मुख्य अडसर हा लग्न पत्रिकांचा येत आसल्याने लाॅकडाऊन दरम्यान झालेल्या विवाह नोंदणीला तिलांजली मिळाल्याचे दिसून येत आहे.

बाल विवाहाचे भिजत घोंगडे कायम

ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये आजही वधूचे वय वर्षे १८ होण्याआधीच विवाह उरकला जात आहे. अशा विवाहाची नोंदणी करणे ग्रामपंचायतीकडून जाणीवपूर्वक टाळले जाते. हि बाब स्थानिक प्रशासनाला माहिती असताना सुध्दा स्थानिक प्रशासन मूगगिळून गप्प बसते. आशामुळे प्रशासनाच्या धोरणाला खीळ बसत आसल्याचे बोलले जाते.

एकच पत्रिका छापण्याची आता होते घाई

ग्रामपंचायतमध्ये विवाहाच्या नोंदणी करण्यासाठी लग्नपत्रिका महत्वाची धरली जाते. परंतु लाॅकडाऊन दरम्यान झालेल्या बहुतांश विवाहधारकांनी लग्न पत्रिकाच छापल्या नसल्याने हल्ली एक लग्न पत्रिका छापण्या करीता हजार रूपयापर्यंत रक्कम आकारली जात आहे. यामुळे छपाईधारकांना थोडे फार सुगीचे दिवस आलेले आहेत.